शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

सैन्यदलाच्या कर्तृत्वावर सत्ताधाऱ्यांचा पाेळी भाजून घेण्याचा प्रयत्न : आनंदराज आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 19:45 IST

रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

पुणे : विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका झाली याचा आनंद असला तरी या सुटकेचे राजकारण केले गेले याचा खेद वाटतो. पाकिस्तानच्या कुरापतींना चोख उत्तर देणाऱ्या सैन्यदलाच्या कर्तृत्वावर आपली पोळी भाजून घेण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न अश्लाघ्य आहे, अशा शब्दातं  रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

यवतमाळ येथे प्रचार सभेत असलेल्या पंतप्रधानांनी जवळच असलेल्या बुलडाणा येथील शहीद जवानांच्या अंत्ययात्रेला उपस्थित रहायला हवे होते. मात्र, ही असंवेदना दाखविणारे पंतप्रधान केवळ  ‘मन की बात’ ऐकविण्यातच मश्गुल आहेत. आता निवडणुकीमध्ये जनता त्यांना ‘जन की बात’दाखवून देईल, असा इशारा आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. वंचित बहुजन आघाडीच्या सभांनाचांगला प्रतिसाद मिळत असून राजकारणातील ही पोकळी आघाडी भरून काढेल, असा विश्वास व्यक्त करीत प्रस्थापित नेत्यांविरूद्ध महाराष्ट्रातील जनता मतदान करेल. आंबेडकरी चळवळ मजबूत व्हावी या उद्देशातून रिपब्लिकन सेनेने वंचित बहुजन आघाडीकडे जागांची मागणी केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोदी लाट ओसरली असून ‘एकला चलो रे’ ही परिस्थिती राहिली नसल्याने भाजपला नाकदुऱ्या काढून शिवसेनेला बरोबर घेणे भाग पडले आहे. या दोन पक्षांची युती झाली असली तरी एकी झाली नसल्यामुळे परस्परांचे उमेदवार पाडण्याचेच काम केले जाईल, याकडे आंबेडकर यांनी लक्ष्य वेधले.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला