शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

भाजप हिंदू धर्माचे नाव घेते पण सरकार मात्र अधर्माने चालवते; गोपाळ तिवारींचा आरोप

By राजू इनामदार | Updated: April 28, 2023 21:22 IST

सत्य, न्याय, निती ही हिंदू धर्माची मुलभूत मुल्य आहेत, हिंदुत्वाचे नाव घेत भाजप ही मुल्यच पायदळी तुडवत आहेत

पुणे: काँग्रेसच्या वॉरंटी गँरंटीबद्दल बोलणारे पंतप्रधान फक्त २ वेळा झालेत, काँग्रेस १०वेळा निवडून आली आहे, काँग्रेसची लाईफ टाईम गँरंटी आहे असे मत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांंनी केली. राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने लोकशाहीचे भाजपकडून होत असणारे अवमुल्यन यावर पत्रकार परिषद घेण्यात आली.

त्यात बोलताना तिवारी यांनी भारतीय जनता पक्ष हिंदू धर्माचे नाव घेत आहे, पण सरकार मात्र अधर्माने चालवत आहे असा आरोप केला. संसदेत प्रवेश करताना पायऱ्यांवर डोके ठेवणारे पंतप्रधान मोदी प्रत्यक्ष संसदेत मात्र लोकशाहीतील कोणतेही संकेत पाळत नाहीत. सत्य,न्याय, निती ही हिंदू धर्माची मुलभूत मुल्य आहेत, हिंदुत्वाचे नाव घेत भाजप ही मुल्यच पायदळी तुडवत आहेत असे ते म्हणाले. सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेबाबत भाजपवर आरोप केले आहेत. त्याचा खुलासा करण्याची जबाबदारी घ्यायला ते तयार नाहीत हिंदू धर्माचे नाव घेत सत्तेवर आले पण त्यांचा हिंदू धर्म सत्तेपूरताच आहे. देशातील जवानांचे बळी जात असताना हे करत तरी काय होते. त्यांचेच राज्पाल असलेल्या सत्यपाल मलिक यांच्या एकाही आऱोपाला उत्तर द्यायचे धाडस त्यांच्यात नाही  काँग्रेसने नूकसान सोसूनही लोकशाही मुल्य जपली, वाढवली. पण भाजपला ते जमत नाही. त्यांना देशातील लोकशाही संपवायची आहे असे तिवारी म्हणाले.

राजीव गांधी स्मारक समिती या सर्व गोष्टी घेऊन जनतेसमोर जाणार आहे. युक्रांद ,काँग्रेस वकिल सेल हे बरोबर आहेत. आम्ही लवकरच स्वाक्षरी मोहिम सुरू करत आहोत. जनतेमध्ये या विषयावर जाग्रुती करणार आहोत असे यावेळी सांगण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार