शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
4
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
5
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
6
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
7
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
8
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
9
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
10
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
11
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
12
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
13
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
14
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
15
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
16
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
17
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
18
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
19
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
20
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

BJP च्या चारशेपार नव्हे तीनशेच्या आतच जागा! महाराष्ट्रात समसमान जागा येतील

By श्रीकिशन काळे | Updated: May 4, 2024 17:14 IST

पवार म्हणाले, २०१४ आणि २०१९ ला प्रादेशिक पक्षांना मान्यता नव्हती. या निवडणूकीत स्थानिक पातळीवरच्या लीडरशीपला स्वत:ची प्रभाव क्षमता निर्माण केली आहे...

पुणे : ‘‘सध्या महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांना समसमान म्हणजे २४-२४ जागा मिळतील. तर देशात भाजपला जवळपास २५० जागा मिळू शकतील, कारण उत्तरेकडे त्यांच्या विरोधी लाट असून, दक्षिणेकडे दिलासा देणारी लाट आहे. परिणामी भाजपची गाडी चारशे पार नव्हे तर तीनशेच्या आत अडकणार आहे, असा अंदाज ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांनी सांगितला. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात ते बोलत होते. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी उपस्थित होते.

पवार म्हणाले, २०१४ आणि २०१९ ला प्रादेशिक पक्षांना मान्यता नव्हती. या निवडणूकीत स्थानिक पातळीवरच्या लीडरशीपला स्वत:ची प्रभाव क्षमता निर्माण केली आहे. तेजस्वी यादव यांना आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना प्रतिसाद मिळतोय. प्रादेशिक पातळीवरील लीडरशीप गेल्या दहा वर्षांत हतबल होती, ती आता मजबूत झाली आहे. त्याचे प्रमाण निवडणूकीनंतर कळेल.

लोक सांगत आहेत की, आम्हाला नेता कोण आहे, याचे काहीही देणे घेणे नाही. उमेदवार कोण हे देखील देणेघेणे नाही. पुढच्या विधानसभेच्या दृष्टीने लोकं विचार करत आहेत. त्यावर देवाणघेवाण व चर्चा होत आहे. स्थानिक नेत्याची विश्वासाहर्ता लोकांमध्ये चालत आहे. लोकसभेला लोकांनी प्रमाण मानले नाही, ते विधानसभेनुसार चालत आहेत.

भाजपला चारशेपेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. आता देशात दोन टप्पे झालेत. राज्यानूहार आकडेवारी केली तर महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार आणि राजस्थान या राज्यात समजा भाजपला फटका बसला तर १० टक्के म्हटले तर ४० जागा जातील. दिल्ली, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश या ठिकाणी मिळून १० जागा गेल्या तर एकूण ५० जागा कमी होतील. ३०३ मधून त्या कमी केल्या तर २५० पर्यंत त्यांच्या जागा होतील.

नेते बदलले तर...

नेता दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर त्याच्या बरोबर लोकं जातात का? तर इतर निवडणूकीपेक्षा ही निवडणूक वेगळी आहे. आता जनता नेत्याबरोबर फार कमी जात आहे. भाजपसोबत दोन मराठे चेहरे आहते. ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार. पण हे दोघे सोबत असले तरी राज्यातील सर्व जागा काही ते जिंकू शकत नाही. कारण नेते गेले तर जनता जायला तयार नाही. पण त्या नेत्यांसोबत काही लोकं नक्कीच जातील. एक नेता फुटला तर काही हजार मतदार फुटतात. त्या नेत्याकडे कोणती तरी सहकारी संस्था, कारखाना, शिक्षण संस्था असते. त्यातून काही हजार मते तिकडे जातात, असे पवार म्हणाले.

सध्या खुद्द पंतप्रधानांनी शिवसेनेबद्दलची भूमिका बदलली आहे. उध्दव ठाकरे यांच्याबद्दल नरेंद्र मोदी चांगले बोलायला लागले आहेत किंवा ते त्यांना मदतीला घेतील. सरते शेवटी हिंदुत्वाची भावना एकच होती. त्यांचे मुद्दे समान होते. त्यामुळे ते पुढे एकत्र येतील का? असे वाटत आहे. संघाच्या लोकांबद्दल उध्दव ठाकरेंबद्दल प्रेम होते. या प्रेमाच्या पोटातून भविष्यात काय पॅटर्न घडेल हे आता सांगू शकत नाही.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४