शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे भाजपा म्हणजे ‘ब्रिटिश भ्रष्ट जुमला पार्टी’ : सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 20:20 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन झाल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी खा. डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते....

इंदापूर (पुणे) : देश व राज्यातील शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणणारे भाजपा सरकार म्हणजे ‘ब्रिटिश भ्रष्ट जुमला पार्टी’ आहे, अशी टीका खा. सुप्रिया सुळे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चानिमित्ताने बोलताना केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन झाल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी खा. डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते.

खा. सुळे म्हणाल्या की, केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणाचा फटका राज्य व देशातील शेतकऱ्यांना बसत आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम सामान्यांच्या जगण्यावर होत आहे. शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टाने पिकवलेल्या कांद्याला तुटपुंजा दर मिळत आहे. निर्यात होणाऱ्या कांद्यावरचे शुल्क वाढवून, कांद्याची निर्यात बंद करण्याचा प्रकार केंद्र सरकारने केला आहे. टोमॅटोला चांगला दर मिळत असताना नेपाळमधून टोमॅटोची आयात करण्यात आल्याने देशातील टोमॅटोचे दर कमी झाले आहेत. त्याचा फटका टोमॅटो उत्पादकांना बसतो आहे. देशातील कापूस उत्पादकांकडे दुर्लक्ष करत इस्रायलमधून कापूस आयात केला. तूर आणि उडीद पिकांबद्दलही तसेच धोरण स्वीकारल्याने उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. देशात खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खताच्या पिशवीतील पाच किलो खत काढून घेत अडचणीत भर टाकली आहे. या गोष्टी नेमक्या कोणी केल्या हे सर्वांना माहीत आहे, असे त्या म्हणाल्या.

सध्या सरकारमधील सगळे मंत्री पोपटासारखे बोलू लागले आहेत. मात्र, एकही मंत्री राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोंड उघडत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला ठणकावून सांगताना दिसत नाहीत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल आस्था राहिलेली नाही. म्हणूनच आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण खा. अमोल कोल्हे यांच्यासमवेत कांदे घेऊन गेलो होतो. कांद्याच्या प्रश्नाबाबत आम्हाला फक्त दोन मिनिटे बोलायचे आहे, असे आम्ही सांगितले. तथापि, या सरकारमधील लोकांनी आम्हा दोघांनाही बाहेर जाण्यास सांगितले, असे सांगून खा. सुळे म्हणाल्या की, शेतकऱ्यांच्या व सामान्यांच्या प्रश्नांबाबत संसदेत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आमचे निलंबन करण्यात आले. आम्ही दोघेही उच्चशिक्षित आहोत. लोकांच्या अडीअडचणी व प्रश्नांसाठी आम्ही राजकारणात आलो आहोत, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारूद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने, अशोक घोगरे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, महिला तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर, शहराध्यक्ष रेश्मा शेख, अक्षय कोकाटे, बाळासाहेब कोकाटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीतील शिवसेना व काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

इंदापूरकरांचा हिरमोड

मालिकांमध्ये तडफदारपणे छ. संभाजीराजे यांची भूमिका करणारे, या भूमिकेची अमीट छाप जनमानसावर टाकणारे खा. डॉ. अमोल कोल्हे पहिल्यांदाच इंदापूर शहरात आले होते. पुणे-सोलापूर महामार्गावरील बाबा चौकातून निघणाऱ्या त्यांच्या पदयात्रेची सांगता जुन्या तहसील कार्यालयापाशी होणार होती. वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीतच जुने तहसील कार्यालय होते. त्यामुळे खा. डॉ. कोल्हे यांनी किमान गढीचे दर्शन तरी घ्यावे, अशी इंदापूरकरांची इच्छा होती. मात्र, निमगाव केतकीकडे जाण्याच्या ओढीने खा. सुप्रिया सुळे, खा. डॉ. कोल्हे हे गढीसमोरून झपाट्याने पुढे गेल्याने इंदापूरकरांचा हिरमोड झाला.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेPuneपुणे