शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रातील भाजपा सरकार शेतकरी विरोधी सरकार : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 10:12 IST

नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे संशोधन आणि कार्य शेतकऱ्यांना मार्गदर्शक...

नारायणगाव (पुणे) : शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून विषमुक्त अन्न धान्य पिकवणे गरजेचे आहे , कृषी प्रक्रियेवरील उद्योगधंद्यांना चालना द्यावी , शेतकरी हा संशोधक आहे , त्यांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळले पाहिजे , असे आवाहन शेतकऱ्यांचा फायदा होईल असा कोणताही निर्णय केंद्र सरकार घेत नाही , केंद्रातील भाजपा सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नारायणगाव येथे केली.

नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा , शिवजन्मभूमीची आम्रगाथा, आंबा उत्पादन मार्गदर्शिका पुस्तक प्रकाशन आणि ग्लोबल कृषी महोत्सव २०२३ समारोप समारंभ प्रसंगी विरोधी पक्षनेते अजित पवार हे बोलत होते. याप्रसंगी श्रीमती एस. आर. केदारी बालकमंदिर, अण्णासाहेब नवरे तांत्रिक शिक्षण केंद्र या नूतन इमारतींचा उद्घाटन अजित पवार , माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. यावेळी आ. अतुल बेनके, ॲड संजय काळे, बाळासाहेब बेंडे-पाटील, देवदत्त निकम, दिंगबर दुर्गाडे, पांडुरंग पवार, बापूसाहेब भुजबळ, अशोक घोलप, कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिल मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे ,उपाध्यक्ष सुजित खैरे, कार्यवाह रवींद्र पारगावकर , सर्व संचालक , केव्हीके प्रमुख डॉ. प्रशांत शेटे, शास्त्रज्ञ राहुल घाडगे आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की , शेतकऱ्याचा प्रवास अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक ते भूमिहीन या दिशेने सुरू आहे. शेतकऱ्यांनी राजकारणाकडे लक्ष न देता शेतीवर लक्ष केंद्रित करावे , कृषी महोत्सवासाठी जिल्ह्यातील संस्थांनी पुढाकार घेऊन कृषी विज्ञान केंद्रांना हातभार लावण्याची गरज आहे. भविष्यात ऊसतोडणीसाठी मजूर मिळणे कठीण असल्याने साखर कारखान्यांना हार्वेस्टर देण्यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करून केंद्राने साखर निर्यातीला परवानगी द्यावी , अशी टीका केली.

छगन भुजबळ म्हणाले की, ग्रामोन्नती मंडळ या संस्थेचा पारदर्शक कारभार असून या संस्थेची प्रगती वेगाने होत आहे .या भागातील शेतकरी प्रयोगशील आणि वाखाणण्याजोगी आहे , असे गौरवोद्गार भुजबळ यांनी काढले .

प्रास्ताविकात अनिल मेहेर म्हणाले की, द्राक्ष निर्यातीसाठी केंद्र सरकारने विशेष उपाययोजना कराव्यात , शेतमाल वितरण व्यवस्था व्हावी , नव्या आदेशानुसार आता सहापट पाणीपट्टी आकारणीचा निर्णय रद्द करावा , जुन्नर तालुका बिबट प्रवण क्षेत्र असल्याने शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करावा अशी मागणी करून कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे काम करीत असल्याचे नमूद करीत. सूत्रसंचालन प्रा. महेबूब काझी , प्रा. सुनील ढवळे यांनी केले . रवींद्र पारगावकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBJPभाजपा