शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

भाजपाला यशवंत कारखाना चालूच करायचा नाही; शिवाजीराव आढळराव यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 13:19 IST

यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्याबाबत भाजप जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यांना कारखाना चालूच करायचा नाही, असा आरोप खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. 

ठळक मुद्दे'संचालक मंडळात भाजपाचेच लोक, त्यातील काहींना कारखान्यातील माहिती देखील नाही'मांजरी बुद्रुक येथील रेल्वे उड्डाणपुलाचे सुमारे ५० कोटी रूपयांचे काम लवकरच होणार सुरू

मांजरी : यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्याबाबत भाजप जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यांना कारखाना चालूच करायचा नाही, असा आरोप खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. हडपसर मांजरी येथील विकास कामांची पाहणी करण्यासाठी ते आले होते, त्यावेळी ते बोलत होते. माजी नगरसेवक तानाजी लोणकर, विजय देशमुख, शहर उपप्रमुख समीर तुपे, दिलीप कवडे, अमित घुले, शंकर घुले, सूरज घुले आदी उपस्थित होते. आढळराव पुढे म्हणाले, की कारखाना चालू करण्यासाठी आम्ही आग्रही होतो, परंतु भाजपा सरकारने आम्हाला विश्वासात न घेता पसस्पर कारखान्याचे प्रशासकीय मंडळ स्थापन केले. त्या प्रशासकीय मंडळात शिवसेनेच्या प्रतिनिधींपैकी एकाही व्यक्तीला संचालक म्हणून घेतले नाही. संपूर्ण संचालक मंडळात भाजपाचेच लोक घेतले आहे. त्यातील काहींना कारखान्यातील माहिती देखील नाही. त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे, अशी टीका खासदार आढळराव यांनी केली. मांजरी बुद्रुक येथील रेल्वे उड्डाणपुलाचे सुमारे ५० कोटी रूपयांचे काम जीएसटीमुळे लांबणीवर पडले होते. तो प्रश्न मिटल्याने आता येत्या दोन महिन्याच्या आत हे काम सुरू होईल. महादेवनगर-मांजरी रस्त्याचे रूंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम वेगोने सुरू आहे. गेल्या दोन वर्षापासून त्या कामाचा आपण पाठपुरावा केला आहे. पुनावाला ग्रुपच्या कॉपोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटीमधून हे काम साकारत आहे. मतदार संघातील इतर मोठ्या गावातील कचरा व इतर कामांच्या बाबतही पुनावाला ग्रुपशी आपली चर्चा सुरू आहे. गेल्या दोन महिन्यात तीन-चार वेळा पालिका आयुक्तांशी चर्चा करून हडपसर मतदार संघातील कचरा, पाणी, पालखी रस्ता, पुलांची बांधणी, वाहतूक आदी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे ही कामेही पुढील काळात मार्गी लागणार आहे.दरम्यान, आढळराव यांनी मांजरी रस्त्याच्या कामाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. पुणे-सोलापूर महामार्गावर वाहत असलेले ड्रेनेज, महामार्गाच्या पट्ट्यात आवश्यक असलेले पार्किंग आदी प्रश्न नागरिकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी लागलीच महामार्ग अभियंत्यांना फोन लावून हे प्रश्न सोडविण्यास सांगितले.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाShiv Senaशिवसेना