शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! पुणे जिल्ह्यात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव; मुळशी तालुक्यातील नांदे येथे कोंबड्यांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 17:08 IST

संसर्ग झालेल्या परिसरातील एक किलोमीटर अंतरावरील सर्व कोंबड्या करणार नष्ट

ठळक मुद्देसंपूर्ण तालुक्यामध्ये घबराटीचे वातावरण

पिरंगुट : कोरोना महामारी ने संपूर्ण जगाला वेठीस धरले असताना आता कोरोना बरोबरच बर्ड फ्लू चे ही संकट भारता समोर उभे ठाकले आहे.तेव्हा या बर्ड फ्लू चा शिरकाव हा नुकताच पुणे जिल्ह्यामध्ये झाला असून पुणे जिल्ह्यातील पहिला विषाणू हा मुळशी तालुक्यामधील नांदे येथे नुकताच आढळून आला आहे.येथील काही कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लू या विषाणूमुळे झाल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर शिवाजी विधाते यांनी दिली आहे त्यामुळे नांदे परिसरासह संपुर्ण मुळशी तालुक्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुळशी तालुक्यातील सुस-नांदे रस्त्यावरती एका खाजगी कुटुंबाने राहत्या घरा लगत घरगुती स्वरूपाचा कोंबडी पालन व्यवसाय सुरु केलेला आहे.तेव्हा काही दिवसांपूर्वी त्यांच्या या छोट्या पोल्ट्रीतील चार ते पाच कोंबड्या मृत्युमुखी पडल्या होत्या.परंतु तो प्रकार त्या वरतीच न थांबता त्यांच्या दररोज चार ते पाच कोंबड्यांचा मृत्यू होऊ लागला.तेव्हा या बाबतीत त्यांना काहीतरी वेगळी शंका वाटू  लागली म्हणून पोल्ट्री मालकाने मागील चार दिवसापूर्वीच आपल्या मृत्य कोंबड्याची तपासणी ही औंध येथील प्रयोगशाळेमधड करून घेतली होती.परंतु दुर्दैवाने त्या तपासणीदरम्यान त्या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यू च्या विषाणू मुळे झाला नसल्याचा अहवाल त्यांना आला.मात्र तरीही त्या पोल्ट्रीतील कोंबड्या मरण्याचे न थांबता त्यांच्या मरण्याचे प्रमाण हे वाढतच राहिले.तेव्हा मात्र त्या मृत कोंबड्याचे आणखी काही नमुने हे तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेकडे पाठविण्यात आले.तर त्याचा अहवाल हा नुकताच रात्री उशिरा आला असून त्यामध्ये  ज्या कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे तो मृत्यू हा बर्ड फ्लूच्या विषाणूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे तेव्हा या आलेल्या या अहवालामुळे संपूर्ण मोशी तालुक्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे

 या सर्व घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने नांदे येथील संसर्ग झालेल्या सर्व कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे याबाबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शिवाजी विधाते म्हणाले की नांदे गावातील शिंदेमळा येथील एका शेतकऱ्याच्या घरगुती कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले असून त्या ठिकाणी जवळपास तीनशे कोंबड्या असून त्या सर्वांची विल्हेवाट लावण्यात येईल याच बरोबर संसर्ग झालेल्या या भागाच्या एक किलोमीटर अंतरावरील सर्व कोंबड्या देखील नष्ट केल्या जात आहे.तसेच या परिसरातील दहा किलोमीटर परिघातील कोंबड्यांची खरेदी विक्री तसेच वाहतूकही तातडीने बंद केली जात आहे.

"नांदे गावातील या दुर्दैवी घटनेनंतर ग्रामपंचायतीने तातडीने मदतीची पावली उचलली असून त्यांच्या वतीने जेसीबी व अन्य आवश्यक सामग्री ही उपलब्ध करून देण्यात आली आहेत.याविषयी माजी सरपंच प्रशांत रानवडे यांनी सांगितले की, आम्ही नांदेगाव परिसरातील सर्व नागरिकांना व ग्रामस्थांना आमच्या वतीने सूचना देण्याचे काम सुरू केले असून.जेसीबीच्या साह्याने तातडीने खड्डा घेऊन संसर्ग झालेल्या सर्व कोंबड्यांची विल्हेवाट लावली जाणार आहे.

टॅग्स :pirangutपिरंगुटBird Fluबर्ड फ्लूDeathमृत्यूcollectorजिल्हाधिकारीbirds sanctuaryपक्षी अभयारण्य