शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

आदित्य ठाकरेंचा एक फोन खणाणला आणि बारामतीतल्या बिहारी कामगारांना जेवणाचा घास मिळाला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 18:09 IST

कुटुंबियांची माणुसकीची तळमळ झाली अधोरेखित

ठळक मुद्देबारामती एमआयडीसीत अडकले २० कामगार कामगारांचा शोध घेवुन त्यांना एका महिन्याचे जेवणाचे सर्व साहित्य

- प्रशांत ननवरे-बारामती : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनमध्ये उपासमारीची वेळ आलेल्या बारामती एमआयडीसीत काम करणाऱ्या बिहारी कामगारांनी थेट बिहारच्या नेत्यांना संपर्क साधला. त्यानंतर बिहारी नेत्यांनी हा विषय शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सांगितला. ठाकरे यांनी त्याची दखल घेत बारामतीच्या शिवसैनिकांना बिहारींना मदत करण्याबाबत सूचना दिल्या.शिवसैनिकांनी तात्काळ धाव देत बिहारी कामगारांना मदतीचा हात दिला आहे.त्यामुळे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. त्याला एमआयडीसी देखील अपवाद नाही.मात्र, एमआयडीसीत काम करणारे परप्रांतीय कामगार लॉकडाऊनमध्ये चांगलेच फसले आहेत. शिवसेना नेत्यांची,शिवसेना कार्यकर्त्यांच्या कार्यतत्परतेमुळे परप्रांतीय कामगारांना आधार मिळाला आहे.शिवसेना जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र काळे यांनी हा प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बिहारचे काही कामगार बारामतीमधील कंपनीत काम करीत आहेत.परंतु, कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे त्यांना काम बंद करून घरातच थांबावे लागले, त्यामुळे ते खूप अडचणीत होते.कामगारांची लॉकडाऊनमुळे उपासमार होत होती. पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी हा विषय गांभीर्याने घेत बारामतीचे अ‍ॅड. राजेंद्र काळे यांना मोबाईलवर संपर्क साधत संबंधितांना मदतीच्या सुचना दिल्या, ताबडतोब परप्रांतीय कामगारांना भेटण्यासाठी सांगितले. काळे यांच्यासह बारामतीच्या शिवसैनिकांनी तत्काळ त्या कामगारांचा शोध घेतला.त्या कामगारांची व्यथा जाणुन घेत  त्यांना धीर दिला ,त्याची विचारपूस केली. तसेच त्यांना येणा अडचणी सोडविल्या. त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.त्यानंतर कामगारांची गैरसोय दूर केल्याची माहिती बिहारमधील नेते कुणाल सिकंद यांना फोन करुन दिली. सिकंद यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दाखविलेल्या तत्परतेबाबत आभार व्यक्त केले. या घटनेमुळे ठाकरे कुटंबीय यांची लोकांसाठी असलेली तळमळ पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.———————————————बारामती एमआयडीसीत २० कामगार अडकले आहेत.त्यांना लॉकडाऊनमुळे घरातुन बाहेर पडता येत नव्हते.त्यांच्याकडे स्वयंपाकाची साधने नव्हती. त्यांच्या मदतीसाठी आदित्य ठाकरेंनी मला संपर्क साधत मदतीच्या सूचना दिल्या.त्याप्रमाणे चौधरीवस्ती येथे त्या कामगारांचा शोध घेवुन त्यांना एका महिन्याचे जेवणाचे सर्व साहित्य देण्यात आले आहे.वैद्यकीय अडचणी आहेत का,याची माहिती घेवुन सोशलडीस्टन्स पाळण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. अ‍ॅड.राजेंद्र काळे, शिवसेना, जिल्हाध्यक्ष. ———————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीAaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBiharबिहारMIDCएमआयडीसी