भोर प्रशासनाचा मोठा निर्णय! गर्दी टाळण्यासाठी रायरेश्वर, रोहिडेश्वर किल्यांवर पर्यटनाला बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 03:04 PM2021-06-14T15:04:31+5:302021-06-14T15:04:37+5:30

दरवर्षी पावसाळ्यात या गडांवर पर्यटक मोठ्या प्रमाणत गर्दी करतात, कोरोना आणि गडांवरील अपघात टाळण्यासाठी घेतला निर्णय

Big decision of Bhor administration! Tourism ban on Raireshwar, Rohideshwar forts to avoid congestion | भोर प्रशासनाचा मोठा निर्णय! गर्दी टाळण्यासाठी रायरेश्वर, रोहिडेश्वर किल्यांवर पर्यटनाला बंदी

भोर प्रशासनाचा मोठा निर्णय! गर्दी टाळण्यासाठी रायरेश्वर, रोहिडेश्वर किल्यांवर पर्यटनाला बंदी

googlenewsNext
ठळक मुद्देसेल्फी काढताना होणाऱ्या धावपळी पाय घसरुन पडणे, दरडी डोक्यात पडणे, पाण्यात बुडणे अशा घटनांकडे पर्यटक दुर्लक्ष करू लागले

भोर: सध्या पावसाळा सुरू झाला आहे. यामुळे दुर्गभ्रमंतीसाठी अनेक पर्यटक किल्यांवर येतात. मात्र, दाट धुके, वादळी पाऊस, वारा यामुळे दुर्घटना होत असतात. तसेच कोरोना मुळे गडकिल्यांवरील गर्दी टाळण्यासाठी भोर तालुका प्रशासनाने रायरेश्वर, रोहिडेश्वर किल्यावर पर्यटनाला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे तहसिलदार अजित पाटील यांनी सांगितले.

मागील आठवड्यात वेल्हे तालुक्यातील तोरणा किल्यावर काही पर्यटकांनी उपद्रव केल्याने वेल्हे प्रशासनाने राजगड व तोरणा किल्यावर बंदी घातली होती. तर वाई आणि भोर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या केंजळ गडावर फिरायला गेलेला दहा वर्षाचा मुलगा पाय घसरुन पडल्याने जखमी झाला होता. अशा घटना वारंवार घडतात. या घटना होऊ नये या साठी प्रशासनाने दुर्गभ्रंमतीवर बंदी घातली आहे. वेल्हेतालुक्यातील किल्यावरील पर्यटनाला बंदी घातल्याने अनेक पर्यटक भोर तालुक्यातील रायरेश्वर व रोहिडेश्वर किल्यावर एकच गर्दी करु लागले होते. त्यामुळे सोमवारपासून भोर तालुक्यातीला किल्यावर पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे.

भोर तालुक्यात दर वर्षी पावसाळयात धबधब्यावर भिजण्यासाठी आणि पर्यटनास वरंध घाट, आंबाडखिंड घाट भाटघर आणी निरादेवघर धरणावरही पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. सेल्फी काढताना होणाऱ्या धावपळी पाय घसरुन पडणे, दरडी डोक्यात पडणे, पाण्यात बुडणे अशा घटना घडू शकतात. मात्र, याकडे पर्यटक दुर्लक्ष करत असतात. यामुळे या गोष्टींचा विचार करुन भोर तालुका प्रशासनाने तालुक्यात किल्यावर आणी पर्यटन स्थळांवर पर्यटनास बंदी घातली आली आहे.

वरंघ घाट व आंबाडखिडघाट परिसरात पडतात दरडी

भोर तालुक्यात पावसाळयात हिरवेगार डोंगर वृक्ष वेली डोगरातुन फेसाळत पडणारे धबधबे आहेत. हे मनमोहक दृष्य पाहण्यासाठी तालुक्यातील व बाहेरील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र, डोंगरी भाग असल्याने पावसाळयात भोर महाड रस्त्यावरील वरंध घाट व भोर मांढरदेवी रस्त्यावरील आंबाडखिड घाटात मोठ्या प्रमाणात दरडी पडतात. यामुळे अनेकदा रस्ता बंद होतो. यातून अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

Web Title: Big decision of Bhor administration! Tourism ban on Raireshwar, Rohideshwar forts to avoid congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.