शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

महाभारत घडण्यास भीष्म कारणीभूत - डॉ. सदानंद मोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 02:33 IST

‘महाभारत घडण्यास भीष्म कारणीभूत आहेत. त्यांना वेळोवेळी निर्णायक भूमिका घेण्याची संधी मिळाली होती. त्यांनी ज्येष्ठतेचा लाभ घेत निर्णय घेणे अपेक्षित होते; परंतु निर्णायक भूमिका घेण्यात केलेल्या कुचराईमुळे अनेक युद्धे झाली.

पुणे : ‘महाभारत घडण्यास भीष्म कारणीभूत आहेत. त्यांना वेळोवेळी निर्णायक भूमिका घेण्याची संधी मिळाली होती. त्यांनी ज्येष्ठतेचा लाभ घेत निर्णय घेणे अपेक्षित होते; परंतु निर्णायक भूमिका घेण्यात केलेल्या कुचराईमुळे अनेक युद्धे झाली. चुकीच्या निर्णयामुळे इतिहासाला कशी चुकीची दिशा मिळू शकते, याचे महाभारत आणि भीष्म उत्तम प्रतीक आहे. भीष्म हे महाभारताचे सक्रिय साक्षीदार होते. त्यांनी घेतलेल्या अतार्किक भूमिकेमुळे महाभारत घडले, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसतर्फे लेखक रवींद्र शोभणे यांच्या महाभारत कथांवर आधारित ‘उत्तरायण’ या कादंबरीचे प्रकाशन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, लेखक भारत सासणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, रवींद्र शोभणे, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसचे अशोक कोठावळे आदी मान्यवर उपस्थित होते.भारत सासणे आणि प्रा. मिलिंद जोशी यांनी ‘उत्तरायण’ या कादंबरीवर भाष्य केले. मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसचे अशोक कोठावळे यांनी प्रास्ताविक केले. सायली लाखे-पिदळी यांनी सूत्रसंचालन केले.साहित्यकृती अस्मितेचा विषयकोत्तापल्ले म्हणाले, ‘‘आपण महाभारत किंवा रामायणासारख्या कलाकृतींकडे इतिहास म्हणून पाहतो. त्यामुळे लगेच हे साहित्य एका समाजाचे प्रतिनिधित्व करायला लागते आणि त्यामुळे ती साहित्यकृती त्यांच्या अस्मितेचा विषय होऊन जातो. परंतु, जागतिक पातळीवर या कलाकृतीला महाकाव्य या दृष्टिकोनातून पाहिले जात असेल, तर भारतीयांनी त्याही दृष्टिकोनाचा आदर केला पाहिजे. या महाकाव्यांवर आधारित पौराणिक नाटके पारंपरिक दृष्टिकोनावर आधारित होती. या महाकव्यांचा विश्लेषणात्मक मूल्यांतून अभ्यास होणे अपेक्षित होते. लोकचळवळी बळावल्या तसा महाभारतातील कर्ण या पात्रास केवळ महाभारतातील पात्र म्हणून महत्त्व न राहता तो समाजातील उपेक्षित वर्गाचा प्रतिनिधी म्हणूनही पुढे येऊ लागला.’’

टॅग्स :Sadanand Moreसदानंद मोरेcultureसांस्कृतिक