शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

महाभारत घडण्यास भीष्म कारणीभूत - डॉ. सदानंद मोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 02:33 IST

‘महाभारत घडण्यास भीष्म कारणीभूत आहेत. त्यांना वेळोवेळी निर्णायक भूमिका घेण्याची संधी मिळाली होती. त्यांनी ज्येष्ठतेचा लाभ घेत निर्णय घेणे अपेक्षित होते; परंतु निर्णायक भूमिका घेण्यात केलेल्या कुचराईमुळे अनेक युद्धे झाली.

पुणे : ‘महाभारत घडण्यास भीष्म कारणीभूत आहेत. त्यांना वेळोवेळी निर्णायक भूमिका घेण्याची संधी मिळाली होती. त्यांनी ज्येष्ठतेचा लाभ घेत निर्णय घेणे अपेक्षित होते; परंतु निर्णायक भूमिका घेण्यात केलेल्या कुचराईमुळे अनेक युद्धे झाली. चुकीच्या निर्णयामुळे इतिहासाला कशी चुकीची दिशा मिळू शकते, याचे महाभारत आणि भीष्म उत्तम प्रतीक आहे. भीष्म हे महाभारताचे सक्रिय साक्षीदार होते. त्यांनी घेतलेल्या अतार्किक भूमिकेमुळे महाभारत घडले, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसतर्फे लेखक रवींद्र शोभणे यांच्या महाभारत कथांवर आधारित ‘उत्तरायण’ या कादंबरीचे प्रकाशन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, लेखक भारत सासणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, रवींद्र शोभणे, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसचे अशोक कोठावळे आदी मान्यवर उपस्थित होते.भारत सासणे आणि प्रा. मिलिंद जोशी यांनी ‘उत्तरायण’ या कादंबरीवर भाष्य केले. मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसचे अशोक कोठावळे यांनी प्रास्ताविक केले. सायली लाखे-पिदळी यांनी सूत्रसंचालन केले.साहित्यकृती अस्मितेचा विषयकोत्तापल्ले म्हणाले, ‘‘आपण महाभारत किंवा रामायणासारख्या कलाकृतींकडे इतिहास म्हणून पाहतो. त्यामुळे लगेच हे साहित्य एका समाजाचे प्रतिनिधित्व करायला लागते आणि त्यामुळे ती साहित्यकृती त्यांच्या अस्मितेचा विषय होऊन जातो. परंतु, जागतिक पातळीवर या कलाकृतीला महाकाव्य या दृष्टिकोनातून पाहिले जात असेल, तर भारतीयांनी त्याही दृष्टिकोनाचा आदर केला पाहिजे. या महाकाव्यांवर आधारित पौराणिक नाटके पारंपरिक दृष्टिकोनावर आधारित होती. या महाकव्यांचा विश्लेषणात्मक मूल्यांतून अभ्यास होणे अपेक्षित होते. लोकचळवळी बळावल्या तसा महाभारतातील कर्ण या पात्रास केवळ महाभारतातील पात्र म्हणून महत्त्व न राहता तो समाजातील उपेक्षित वर्गाचा प्रतिनिधी म्हणूनही पुढे येऊ लागला.’’

टॅग्स :Sadanand Moreसदानंद मोरेcultureसांस्कृतिक