शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

‘भीमाशंकर’कडून एफआरपीची रक्कम मिळणार

By admin | Updated: April 26, 2016 01:50 IST

उसाला एफआरपीप्रमाणे रक्कम बँकेत येत्या चार-पाच दिवसांत देणार असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

अवसरी : आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रयनगर, पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०१५-१६मध्ये गाळप केलेल्या उसाला एफआरपीप्रमाणे रक्कम बँकेत येत्या चार-पाच दिवसांत देणार असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या  सभेत देय एफआरपी लवकर देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. भीमांशकर सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०१५-१६मध्ये गाळप केलेल्या उसासाठी १,८०० रुपये प्रतिमेट्रिक टन याप्रमाणे अ‍ॅडव्हान्स देण्यात आलेला आहे. गळीत हंगाम २०१५-१६साठी २,२१५.३५ रुपये प्रतिमेट्रिक टन निव्वळ एफआरपी येत असून, त्यांपैकी कारखान्याने केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निर्यात कोट्याप्रमाणे साखर निर्यात केलेली असल्याने ४५ रुपये प्रतिमेट्रिक टनाप्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्र शासनाकडून अनुदान स्वरूपात परस्परवर्ग होणार आहे. एफआरपीच्या ८० टक्के १,८०० प्रतिमेट्रिक टन रक्क म वर्ग के लेली असल्याने संपूर्ण एफआरपी अदा करण्यासाठी ३७० रुपये प्रतिमेट्रिक टन देय राहतात. कारखान्याने दि. ३१ मार्च २०१६ पर्यंत गाळप के लेल्या ६,५२,९४० मेट्रिक टन उसासाठी १,८०० रुपये प्रतिमेट्रिक टन याप्रमाणे ११७ कोटी ५२ लाख ९३ हजार रुपये रक्कम ऊसउत्पादकांच्या खाती वर्ग केलेली आहे. तसेच, ३१ मार्च २०१६अखेर गाळप केलेल्या ६,५२,९४० मेट्रिक टन उसासाठी २०० रुपये प्रतिमेट्रिक टन याप्रमाणे १३ कोटी ५ लाख ८८ हजार रुपये ऊसउत्पादकांच्या खाती वर्ग केली जाणार आहे. १ एप्रिल २०१६पासून गाळप होणाऱ्या उसाला एकत्रित २,००० रुपये प्रतिमेट्रिक टन याप्रमाणे ऊसउत्पादक शेतकऱ्यांना रक्कम अदा केली जाणार असल्याची माहिती बेंडे यांनी दिली. (वार्ताहर)