शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

गेल्या आठ महिन्यांपासून भाटघर वीजनिर्मिती केंद्र बंद; आतापर्यंत ११ कोटींचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 14:33 IST

मुसळधार पावसामुळे भाटघर येथील वीजनिर्मिती केंद्रात शिरले होते पाणी

ठळक मुद्देकेंद्रात दुरुस्तीच्या कामाला सुरुवात, दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

भोर : मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाटघर येथील विद्युत मंडळाच्या महापारेषण व वितरण कंपनीच्या वीजनिर्मिती केंद्रात पाणी शिरल्यामुळे यावर्षी वीजनिर्मिती केंद्र मागील आठ महिने बंद आहे. यामुळे आतापर्यंत ४० मिलियन युनिटचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत ११ कोटींचे नुकसान झाले आहे आणि कदाचित यात वाढ होऊ शकते. वीजनिर्मिती केंद्रात अशा प्रकारचे नुकसान पहिल्यांदाच झाले आहे. सध्या दुरुस्तीचे काम सुरू असून पुढील दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याचा अंदाज व्यक्त केला जात असला, तरी काम पूर्ण होईल की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.पाच ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसामुळे भाटघर येथील वीजनिर्मिती केंद्रात पाणी जाऊन मागील आठ महिन्यांपासून वीजनिर्मिती केंद्र बंद असून मागील चार वर्षांत वीजनिर्मिती केंद्र बंद पडण्याची ही पहिलीच घटना असून त्यामुळे आतापर्यंत सरासरी ४० मिलीयन युनिटच्या विजेचे आणि सुमारे ११ कोटींचे नुकसान झाले असून त्यात वाढही होऊ शकते. मात्र हे सर्व अंदाज वीज केंद्राच्या दुरुस्तीच्या कामानंतरच नुकसानीचा अंदाज येणार असल्याचे भाटघर वीज उपकेंद्राचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विश्वास देशपांडे व भाटघर विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता सुनील वाल्हेकर यांनी सांगितले.सध्या भाटघर येथील वीजनिर्मिती केंद्राच्या दुरुस्तीचे युद्धपातळीवर काम सुरू असून पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे.मे अखेर काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मागील वर्षी ३ ते ५ आॅगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे ४ आॅगस्टला भाटघर धरण पूर्ण भरल्यावर पाणी येथील वीजनिर्मिती केंद्राच्या पहिल्या दोन मजल्यांवर शिरल्यामुळे रोहित्र पॅनल जळाले. जनरेटर पाण्यात गेले, त्यामुळे भोर शहरासह सुमारे ६० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर भोरच्या अग्निशमन बंबाने व वीज वितरण महापारेषण कंपनी एक आठवडाभर वीज केंद्रातील पाणी बाहेर काढत होते. यावेळी सलग तीन-चार दिवस आमदार संग्राम थोपटे घटनास्थळी राहून वीजनिर्मिती कंपनीला मदतकार्य करून कामकाजाची माहिती घेत होते.........

पर्यायी व्यवस्था : ६० गावांचा वीजपुरवठा होणार पूर्ववतवीज वितरण कंपनीच्या वीज मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांनी युद्धपातळीवर पर्यायी व्यवस्था करून शहरासह ग्रामीण भागातील ६० गावांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत केला. यातून निर्माण झालेली वीज १३२ केव्ही कामथडी आणि शिरवळ केंद्राला पुरवली जाते. साधारणपणे धरणातील पाणी दरवर्षी आॅक्टोबर ते मेअखेरपर्यंत दुष्काळी भागातील पिकांसाठी व पिण्यासाठी सोडले जाते. त्या कालावधीत वीजनिर्मिती केली जाते............* पावसाच्या पाण्यामुळे वीजनिर्मिती कें द्रातील जनरेटर, तळाचे टर्बाईन, बॅटरी, कॉम्पॅक्टर, आॅईल, वायरिंग यासारखे पूरक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जनरेटर बाहेर काढायला एक महिना लागला असून जनरेटर, हिटिंग, ड्राइंगचे काम सुरू असून त्याच्या दुरुस्तीसाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

* काम पूर्ण झाल्यावरच झालेले नुकसान व खर्च याची महिती कळू शकणार आहे. दरवर्षी ४० मिलियन युनिटची वीजनिर्मिती केली जाते. मागील वर्षी ५४ मिलीयन युनिट वीजनिर्मिती झाली होती आणि यावर्षी अधिक वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

* पावसामुळे सर्वच अंदाज फेल ठरले असून वीजनिर्मिती केंद्राच्या दुरुस्तीचे अवघड काम पारेषण व वितरण कंपनीवर येऊन पडले आहे. 

टॅग्स :bhor-acभोरelectricityवीजRainपाऊस