शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

Bharatiya Mazdoor Sangh: भारतीय मजदूर संघ केंद्राच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 14:22 IST

याआधी ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन ही कम्यूनिस्टांची व इंटक ही काँग्रेस प्रणित कामगार संघटनाही केंद्र सरकारच्या याच निर्णयाविरोधात न्यायालयात गेली आहे

पुणे: देशातील दारूगोळा उत्पादन ४१ कंपन्यांचे खासगीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय मजदूर संघाने (Bharatiya Mazdoor Sangh) सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. भामसं ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील देशातील सर्वात मोठी कामगार संघटना आहे.

याआधी ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन ही कम्यूनिस्टांची व इंटक ही काँग्रेस प्रणित कामगार संघटनाही केंद्र सरकारच्या याच निर्णयाविरोधात न्यायालयात गेली आहे. केंद्र सरकारने या कंपन्यांच्या खासगीकरणाचा निर्णय घेताना घटनात्मक हक्कांचा भंग केला असल्याचा या संघटनांचा दावा आहे. यापैकी मद्रास उच्च न्यायालयातील दाव्यात न्यायाधिशांनी सरकारने कामगार संघटनांचे म्हणणे ऐकून घ्यावे असा आदेश दिला आहे. अन्य दाव्यांची सुनावणीही लवकर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान केंद्र सरकारने या ४१ कंपन्यांचे उत्पादनानुसार वर्गीकरण करून त्यांच्या ७ स्वतंत्र कंपन्या स्थापन केल्याचा अध्यादेशही जारी केला आहे. त्यात आता देशी तसेच परदेशी कंपन्यांनी गुंतवणूक करू शकतात. या कंपन्यांच्या १०० पेक्षा जास्त उत्पादनांच्या खरेदीचे लष्करावर असलेले बंधनही केंद्र सरकारने काढून टाकले असून त्यामुळे कंपन्यांची स्थिती रोडावली आहे. लष्कराला लागणाऱ्या दारूगोळ्याची निर्मिती करणाऱ्या या कंपन्यांना ब्रिटिशांपासूनचा २०० वर्षांचा इतिहास आहे. तेव्हापासून झालेल्या प्रत्येक युद्धात या कंपन्यांनी लष्कराला दारूगोळा तयार करून दिला आहे. आजमितीस या सर्व कंपन्यांमध्ये मिळून ८० हजार पेक्षा जास्त कामगार काम करतात.एकूण ४१ पैकी ११ कंपन्या महाराष्ट्रात आहेत.

केंद्र सरकारने नियोजनबद्धतेने त्यांचे खासगीकरण केल्याचा कामगार संघटनांचा आरोप आहे. तिनही संघटनांना एकत्र येऊन संपाचा इशारा दिला होता, सरकारने संप केल्यास, करण्यासाठी प्रवृ्त केल्यास १५ ते २५ हजार रूपयांचा दंड, त्याशिवाय शिक्षा असा अध्यादेश जारी करून कामगार संघटनांना संपाची बंदीच केली. त्याविरोधातही एआयडीईएफ तसेच इंटक यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. 

अन्य क्षेत्रातील कामगारांना असलेला संपाचा अधिकार आम्हाला नाकारणे हे अयोग्य आहे. मुळातच संरक्षण क्षेत्रातील अशा कंपन्या परदेशी कंपन्यांसाठी खुल्या करून देणे योग्य नाही. मात्र कामगारांचा संपाचा अधिकार काढून घेणे याला आमचा तीव्र विरोध आहे.

संजय मेनकुदळे, सदस्य, भामसं केंद्रीय कार्यकारिणी

टॅग्स :PuneपुणेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय