शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Bharat Bandh : पुण्यात बंदला हिंसक वळण, पीएमपीची बस जाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 10:13 IST

पुण्यात भारत बंदला हिंसक वळण लागले आहे.

पुणे -  पुण्यात भारत बंदला हिंसक वळण लागले आहे.  या बंद दरम्यान कोथरुड डेपोमध्ये पीएमपी बस पेटवून देण्याची घटना पहाटे घडल्याची माहिती मिळत आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून याबाबतचे व्हिडीओ तातडीने व्हायरल केल्याने बंद पार्श्वभूमीवर ही बस पेटली नसून पेटविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान कुमठेकर रोडवर मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी सात वाजता एका पीएमपी बसवर दगडफेक करुन तिच्या काचा फोडल्याचं समोर आलं आहे. 

बसचे चालक व वाहक यांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे ते चिंचवड ही बस पार्किंगमधून टेस्टींग करुन बाहेर आणली व हजेरी लावण्यासाठी पुन्हा डेपोमध्ये गेलो होतो. त्यादरम्यान रस्त्यावर असणाऱ्या बसने पेट घेतला. त्यात संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.बसचा पुढील बॉनेटच्या बाजूचा भाग पेटला होता. बसला आग लागली तर ती अशा प्रकारे पेटत नाही़ त्यामुळे भारत बंदच्या पार्श्वभूमीवर कोणीतरी ती पेटवून दिली अशी शंका व्यक्त केली जात आहे.

अग्निशामक दलाला या घटनेची माहिती सकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी मिळाली. त्यानंतर तातडीने गाडी घटनास्थळी जाऊन त्यांनी आग विझविली. पण तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती. दरम्यान, कुमठेकर रोडवर सकाळी सात वाजता एका बसवर दगडफेक करुन काचा फोडण्यात आल्या. या दोन घटना वगळता आतापर्यंत शहरात शांतता असून सकाळी दूध व अन्य साहित्यांची विक्री करणारी दुकाने तसेच पीएमपी बस, रिक्षांची वाहतूक सुरू आहे़.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदPuneपुणे