शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

भामा - आसखेड प्रकल्प, केळगाव व चिंबळी येथील जमिनींवरील राखीव क्षेत्राचे शेरे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 01:39 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शेतकऱ्यांमध्ये आनंद

ठळक मुद्देमागील पंधरा ते वीस वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश

शेलपिंपळगाव : भामा - आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी केळगाव व चिंबळी (ता. खेड) गावातील जमिनींवरील राखीव क्षेत्र असलेले शेरे रद्द करण्यात आले आहेत. उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्याकडून तसा आदेशही प्राप्त झाल्याची माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली. शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे संबंधित दोन्ही गावातील शेतकऱ्यांमधून स्वागत होत आहे.            पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.१५) जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित विभाग व संबंधित शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. सदरच्या बैठकीत राज्यातील पाठबंधारे प्रकल्पांच्या लाभ क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत व भविष्यातही अशा सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता नाही. त्यामुळे भामा आसखेड प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील मौजे केळगाव व चिंबळी गावातील स्लॅबपात्र शेतकऱ्यांची त्यांच्या ७/१२ वरील युक्त प्रकल्पांचे शेरे ०५ आॅगस्ट २०१९ च्या शासन निर्णयानुसार कमी करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली होती.         यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मौजे केळगाव व चिंबळी गावातील जमिनींवरील शेरे कमी करण्याची मागणी मान्य करून तसे आदेश तहसीलदार खेड यांना देण्यात आले आहेत.......................   भामा आसखेड प्रकल्पातील सिंचनासाठी असणारे पाणी पिण्याच्या पाणी वापरासाठी आरक्षित झाले आहे. सदरचा प्रकल्प हा शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या धरणातून पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास पाणी मिळणार आहे. परंतु शेतकऱ्यांनी पाईपलाईनचे काम थांबविल्यामुळे प्रकल्पपूर्तीस विलंब होत आहे. त्यामुळे सदर गावातील इतर हक्कातील पुनर्वसनासाठी पात्र असे शेरे कमी करणे आवश्यक असल्याने मौजे केळगाव व चिंबळी गावातील जमिनींवरील शेरे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

.........................मागील पंधरा ते वीस वर्षांपासून सदर गावातील जमिनींवरील इतर हक्कातील पुनर्वसनासाठी पात्र असे शेरे कमी करण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. शासनाने उर्वरित गावांचाही प्रश्न मार्गी लावावा. यासाठीही पाठपुरावा सुरूच राहील.     - दिलीप मोहिते - पाटील, आमदार खेड.

टॅग्स :KhedखेडDamधरणFarmerशेतकरीNavalkishor Ramनवलकिशोर राम