शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
3
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
4
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
5
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
6
घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
7
शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
8
धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?
9
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
10
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
11
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
12
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
13
तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
14
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत आर माधवन स्पष्टच बोलला, म्हणाला- "आम्ही आता म्हातारे झालोय..."
16
लोकसंख्यावाढीसाठी गर्भनिरोधकं केली महाग!
17
सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा, Vodafone-Idea चे शेअर्स वधारले; AGR वर मिळू शकते गुड न्यूज
18
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
19
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
20
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
Daily Top 2Weekly Top 5

भामा - आसखेड प्रकल्प, केळगाव व चिंबळी येथील जमिनींवरील राखीव क्षेत्राचे शेरे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 01:39 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शेतकऱ्यांमध्ये आनंद

ठळक मुद्देमागील पंधरा ते वीस वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश

शेलपिंपळगाव : भामा - आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी केळगाव व चिंबळी (ता. खेड) गावातील जमिनींवरील राखीव क्षेत्र असलेले शेरे रद्द करण्यात आले आहेत. उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्याकडून तसा आदेशही प्राप्त झाल्याची माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली. शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे संबंधित दोन्ही गावातील शेतकऱ्यांमधून स्वागत होत आहे.            पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.१५) जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित विभाग व संबंधित शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. सदरच्या बैठकीत राज्यातील पाठबंधारे प्रकल्पांच्या लाभ क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत व भविष्यातही अशा सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता नाही. त्यामुळे भामा आसखेड प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील मौजे केळगाव व चिंबळी गावातील स्लॅबपात्र शेतकऱ्यांची त्यांच्या ७/१२ वरील युक्त प्रकल्पांचे शेरे ०५ आॅगस्ट २०१९ च्या शासन निर्णयानुसार कमी करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली होती.         यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मौजे केळगाव व चिंबळी गावातील जमिनींवरील शेरे कमी करण्याची मागणी मान्य करून तसे आदेश तहसीलदार खेड यांना देण्यात आले आहेत.......................   भामा आसखेड प्रकल्पातील सिंचनासाठी असणारे पाणी पिण्याच्या पाणी वापरासाठी आरक्षित झाले आहे. सदरचा प्रकल्प हा शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या धरणातून पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास पाणी मिळणार आहे. परंतु शेतकऱ्यांनी पाईपलाईनचे काम थांबविल्यामुळे प्रकल्पपूर्तीस विलंब होत आहे. त्यामुळे सदर गावातील इतर हक्कातील पुनर्वसनासाठी पात्र असे शेरे कमी करणे आवश्यक असल्याने मौजे केळगाव व चिंबळी गावातील जमिनींवरील शेरे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

.........................मागील पंधरा ते वीस वर्षांपासून सदर गावातील जमिनींवरील इतर हक्कातील पुनर्वसनासाठी पात्र असे शेरे कमी करण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. शासनाने उर्वरित गावांचाही प्रश्न मार्गी लावावा. यासाठीही पाठपुरावा सुरूच राहील.     - दिलीप मोहिते - पाटील, आमदार खेड.

टॅग्स :KhedखेडDamधरणFarmerशेतकरीNavalkishor Ramनवलकिशोर राम