शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

भामा आसखेड पुनर्वसनाचा तिढा कायम; जमिनीच्या बदल्यात पैशाचा ग्रामस्थांनी धुडकावला प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 13:51 IST

भामा आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ‘जमिनीच्या बदल्यात जमीन’ देणे शक्य नसल्याने ‘जमिनीच्या बदल्यात रोख रक्कम’ देण्याचा प्रस्ताव  नुकत्याच झालेल्या बैठकीत ग्रामस्थांसमोर ठेवण्यात आला; मात्र हा प्रस्ताव ग्रामस्थांनी धुडकावून लावला.

ठळक मुद्देधरणग्रस्त ग्रामस्थांशी सुरू असलेल्या बैठकीत अंतिम तोडगा नाहीजमीन उपलब्ध होत नसल्यामुळे मोबदला म्हणून ग्रामस्थांना रोख रक्कम देण्याचा प्रस्ताव : काळे

पुणे : भामा आसखेड धरणग्रस्तांच्या एकूण संख्येचा विचार करता त्यांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाकडे मुबलक जमीन उपलब्ध नाही. त्यामुळे ‘जमिनीच्या बदल्यात जमीन’ देणे शक्य नसल्याने ‘जमिनीच्या बदल्यात रोख रक्कम’ देण्याचा प्रस्ताव  नुकत्याच झालेल्या बैठकीत ग्रामस्थांसमोर ठेवण्यात आला; मात्र हा प्रस्ताव ग्रामस्थांनी धुडकावून लावला. परिणामी, भामा आसखेडच्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा तिढा अजूनही कायम आहे. जिल्हा प्रशासनासह पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने धरणग्रस्तांना जमिनीच्या बदल्यात जमीन देण्याचा प्रस्ताव समोर ठेवला होता; मात्र निळवंडे  येथील सर्व धरणग्रस्तांना ‘जमिनीच्या बदल्यात रोख रक्कम’ हे सूत्र अंमलात आणले गेले. त्यानुसार भामा आसखेड धरणग्रस्तांना रोख रकमेच्या स्वरूपात मोबदला देण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरविले. त्यासंदर्भातील पत्रही पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांना पाठविण्यात आले; तसेच सुमारे ४५० धरणग्रस्तांना द्यावयाच्या रकमेचे मूल्यांकन करण्याचे कामही सुरू करण्यात आले; मात्र यासंदर्भात धरणग्रस्त ग्रामस्थांशी सुरू असलेल्या बैठकीत अंतिम तोडगा निघत नसल्यामुळे जिल्हा प्रशासनासह दोन्ही महापालिकांपुढील समस्या वाढणार असल्याचे दिसून येत आहे.पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असल्यामुळे धरणाच्या परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळू शकणार नाही. तसेच, या प्रकरणात काही जमीनमालक न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यास आणखी काही कालावधी जाणार असल्याचे बोलले जात आहे.

भामा आसखेड हे धरण शंभर टक्के पिण्याच्या पाण्यासाठी राखीव आहे; तसेच सध्या या धरणातून बंदिस्त जलवाहिनीमधून दोन्ही महापालिकांसाठी पाणी नेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांना विनंती केल्यामुळे सध्या काम सुरळीतपणे सुरू आहे. परंतु, अद्याप पुनर्वसनाच्या मुद्द्यावर ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात एकमत झालेले नाही. ग्रामस्थ जमिनीच्या बदल्यात जमिनीची मागणी करत आहेत. परंतु, जमीन उपलब्ध होत नसल्यामुळे मोबदला म्हणून ग्रामस्थांना रोख रक्कम देण्याचा प्रस्ताव आहे. - रमेश काळे, अप्पर जिल्हाधिकारी

टॅग्स :Puneपुणे