शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

विरारमधील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून खटल्यात भाई ठाकूरसह तिघे निर्दोष

By विवेक भुसे | Updated: May 24, 2023 16:04 IST

विरार येथील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे यांचा ९ ऑक्टोबर १९८९ रोजी नालासोपारा रेल्वे स्थानकावर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता...

पुणे : विरार येथील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे खून प्रकरणात जयेंद्र उर्फ भाई ठाकूर याच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी दिले. ‘टाडा’कायद्याअंतर्गत दाखल असलेला देशातील शेवटच्या खटल्याचा निकाल न्यायालयाने दिला. दुबे खून प्रकरणात १७ आरोपींना अटक करण्यात आली होती. या खटल्यात न्यायालयाने ६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जयंत उर्फ भाई विष्णू ठाकूर, दीपक ठाकूर, गजानन पाटील अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या खटल्यात नरेंद्र भालचंद्र भोईर, ज्ञानेश्वर पाटील, उल्हास राणे, पॅट्रीक तुस्कानो, राजा जाधव, माणिक पाटील यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

विरार येथील बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे यांचा ९ ऑक्टोबर १९८९ रोजी नालासोपारा रेल्वे स्थानकावर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. त्यावेळी या सर्व परिसरात भाई ठाकूर याची दहशत होती. या प्रकरणात पोलिसांनी टाडा (टेररिस्ट अँड डिस्ट्रप्टीव्ह ॲक्टव्हीज (प्रिव्हेंन्शन)ॲक्ट) नुसार कारवाई केली होती. दुबे खून खटल्यात २००४ मध्ये टाडा कायद्यातील विविध कलमे तसेच बेकायदा शस्त्रात्र बाळगल्या प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले होते.

या खटल्यात सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील ॲड. सतीश मिश्रा यांनी बाजू मांडली. बचाव पक्षाकडून ॲड. सुदीप पासबोला, ॲड. सुधीर शहा, ॲड. रोहन नहार, ॲड. प्रीतेश खराडे, ॲड. सचिन पाटील, ॲड. रोहित तुळपुळे यांनी बाजू मांडली. बचाव पक्षाकडून करण्यात आलेला ग्राह्य धरुन न्यायालयाने भाई ठाकूर याच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.

देशातील शेवटचा टाडा खटलादेशातील या शेवटच्या टाडा खटल्याची सुनावणी २००५ मध्ये सुरु झाली होती. सरकार पक्षाने ८० हून अधिक साक्षीदार तपासले. या प्रकरणात एकूण १७ आरोपी होती. सध्या ५ आरोपींविरुद्ध सुनावणी सुरु होती. सुनावणी दरम्यान दोघांचे निधन झाले.

त्यात भाई ठाकूर, त्याचा भाऊ दीपक ठाकूर आणि गजानन पाटील हे तीन आरोपी होते. भाई ठाकूर विरुद्ध 302, 120 ब आणि टाडा आणि इतर दोन आरोपी विरुद्ध फक्त टाडा चा गुन्हा दाखल होता. कोर्टाने कुठलाही कट, जमीन बळकावणे दहशतवादी कारवायांचा भाग असू शकत नाही असे निरीक्षण नोंदवित तिघांची विशेष न्यायाधीश एस.आर नावदंर यांनी निर्दोष मुक्तता केली. या केसमध्ये एकूण ११० साक्षीदार होते. १९८९ च्या या खटल्यामध्ये या तिघांची नावे नव्हती. १९९३ ला टाडा लावला तेव्हा या तिघांच्या नावाचा समावेश करण्यात आला, अशी माहिती बचाव पक्षाचे वकील ॲड. रोहन नहार यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय