शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

भादलवाडी तलावाने तळ गाठला, पाण्यासाठी होतेय पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 1:36 AM

पाण्यासाठी पायपीट : तलावात पाणी सोडण्याची मागणी

पळसदेव : पळसदेव परिसरातील भादलवाडी तलावाने तळ गाठला आहे. यामुळे या परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या तलावात पाणी सोडण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. पाऊस पडेना, तलावात पाणी येत नाही, त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पश्चिम भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. उभी पिके जळून गेली आहेत. रात्री कडाक्याची थंडी अन् दिवसा कडक ऊन अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. विहिरीतील पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत.

तलावात पाणी नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. ऊसपिकाला अधिक फटका बसला आहे. सध्या खडकवासला कालव्याचे आवर्तन सुरू आहे. त्या आशेवर शेतकरी बसला आहे. मात्र तलावांमध्ये पाणी काही येत नाही. शेतीसह पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तलावात पाणी सोडण्याबाबत जलसंपदा खाते दुजाभाव करीत आहे. तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी तलावात पाणी सोडण्याबाबत निष्क्रिय आहेत. एकमेकांवर टीका करण्यापलीकडे त्यांना काही जमत नाही. अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकºयांनी व्यक्त केल्या.पाणीप्रश्न गंभीर बनला असताना त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. हिवाळ्यात ही परिस्थिती तर उन्हाळ्यात काय होणार, याचा प्रत्यय आताच येऊ लागला आहे. गाय, म्हैस या जनावरांना चारा नसल्याने भटकंती करावी लागत आहे. वन्यप्राणी चारयासाठी व पाण्याच्या शोधार्थ सैरभैर फिरताना दिसतात. जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी दुष्काळी परिस्थितीची जाण ठेवून तरी तलावांमध्ये पाणी सोडावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.भादलवाडी येथील तलावातील मच्छीमार चिंताग्रस्त४भादलवाडी येथील ब्रिटिशकालीन तलावावर येथील मच्छीमार अवलंबून आहे. या तलावात सुमारे अडीच लाख रुपये खर्च करून मत्स्यबीज सोडण्यात आले होते. मात्र पाणी आटल्याने हे मत्स्यबीज मृत्युमुखी पडत आहे.४तसेच पक्ष्यांच्या भक्ष्यस्थानी शिकार ठरत आहे. तरी या तलावात पाणी सोडण्याची मागणी माजी सरपंच अशोक भंडलकर यांनी केली आहे.

टॅग्स :Puneपुणे