शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
2
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
3
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
4
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
5
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
6
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
7
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
9
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
10
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
11
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
12
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
13
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
14
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
15
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
16
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!
17
दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी!
18
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या कथित लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे

बेळगावच्या आशा होताहेत धुसर - लक्ष्मीकांत देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 03:47 IST

महाराष्ट्रातील समाजकारण, राजकारण बदलत असताना विकास फक्त पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला. महाराष्ट्राने आम्हाला न्याय दिला नाही, ही भावना विदर्भ, मराठवाड्याच्या लोकांच्या मनात आजही घर करून आहे.

पुणे - महाराष्ट्रातील समाजकारण, राजकारण बदलत असताना विकास फक्त पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला. महाराष्ट्राने आम्हाला न्याय दिला नाही, ही भावना विदर्भ, मराठवाड्याच्या लोकांच्या मनात आजही घर करून आहे. आचार्य अत्रेंच्या पुढाकाराने साकार झालेले संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न, ओजस्वी पर्व विस्मरणात गेले आहे की काय, असा प्रश्न पडतो. बेळगाव महाराष्ट्रात येण्याच्या आशा धूसर होत चालल्या आहेत. महाराष्ट्र एकसंध राहू शकलेला नाही, अशी खंत संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी बुधवारी व्यक्त केली. विकासाचे समन्यायी वाटप झाले पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानतर्फे साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या ४९ व्या स्मृतिदिनानिमित्त साहित्य संमेलनाध्यक्षांचे महासंमेलन आणि गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, बाल मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ल. म. कडू, आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. बाबूराव कानडे आदी मान्यवर उपस्थित होते.अ‍ॅड. बाबूराव कानडे यांनी प्रास्ताविकात आचार्य अत्रेंच्या कार्यकर्तृत्त्वाला उजाळा दिला.देशमुख म्हणाले, ‘बुद्धी आणि भावनेला आवाहन करणारे लेखन हे अत्रेंचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या लेखनामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळ जोमदार झाली आणि महाराष्ट्र आकाराला आला. सध्या संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न विरले आहे. स्वतंत्र विदर्भ मागणी होत असून त्याला भाजपाचा पाठिंबा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या तत्त्वाचे पालन झाले नाही, हे वास्तव आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या ध्येयापासून आपण किती दूर गेलो, याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. अत्रे यांच्याकडून निर्भयता शिकली पाहिजे.लेखक हा समाजाचा आरसा असेल तर त्याने लेखनातून समाजाचे आक्रंदन, व्यथा मांडल्या पाहिजेत. अत्रे यांच्या ‘घराबाहेर’ नाटकावर पुढे महेश भट यांनी ‘अर्थ’ चित्रपटाची निर्मिती केली होती. आता काळ असा आहे की मोठे नेते होणार नाहीत. त्यामुळे समाजातील प्रत्येकाने मोठे होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिक्षण, राजकारण या क्षेत्रात घसरण होत आहे. अत्रे यांच्या साहित्याचे वाचन, चिंतन, मनन करून त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. हे साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे.’बालसाहित्याची होतेय परवडअत्रेंसारखा माणूस गेल्या १० हजार वर्षांत झाला नाही आणि पुढेही होणार नाही. त्यांच्यासारखे होणे हे येड्यागबाळ्याचे काम नव्हे. दिग्गजांची जयंती, स्मृतीदिन तात्पुरते साजरे होतात आणि नंतर विस्मरणात जातात. मुलांवर संस्कार करणारे साहित्य आजवर निर्माण झाले, मात्र मुलांना काय आवडते हे लक्षात घेतले जात नाही.मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते. त्याच्यावर मालकी हक्क न गाजवता त्याला केवळ पैलू पाडण्याची जबाबदारी पालकांची असते. काळाच्या ओघात मराठी भाषेचे मातेरे होत असून, बालसाहित्याची परवड होत आहे. आपली भाषा, संस्कृती जपली जाणार असेल तरच बालसाहित्याला चांगले दिवस येतील, असे ल. म. कडू याप्रसंगी म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या