शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

Video : राजू शेट्टींचे आंदोलन मागे, रात्री 10.30 वाजता साखर आयुक्तांकडून लेखी आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 22:47 IST

ऊसाला एफआरपी मिळावी या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पुण्यातील अलका चौकापासून ते साखर संकुल पर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला.

पुणे - साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखर कारखान्यांवर कारवाईचे तसेच शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी रात्री 10.30 वाजता खासदार राजू शेट्टी यांच्याकडे लेखी पत्र दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली. मात्र, लेखी आश्वासनानंतरही कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारात राजू शेट्टींनी दिला. 

ऊसाला एफआरपी मिळावी या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पुण्यातील अलका चौकापासून ते साखर संकुल पर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी योगेंद्र यादव यांच्यासोबतच हजारो शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यांना विकल्यानंतरही अनेक कारखान्यांकडून त्यांना अद्याप एफआरपीचा एक रुपया सुद्धा मिळाला नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला. एफआरपी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये कारखान्यांमध्ये अडकून पडले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ऊसाची एफआरपी मिळावी अशी मागणी या मोर्चाच्या वतीने करण्यात आली. दुपारी 1.30 च्या सुमारास या मोर्चाला सुरुवात झाली होती. हजारो शेतकरी अलका चौकात जमा झाले होते. खासदार राजू शेट्टी आल्यानंतर त्यांनी नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेत मोर्चा काढण्याचे आवाहन केले. पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयाजवळ राजू शेट्टींच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले होते. अखेर, रात्री 10.30 वाजता साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखर कारखान्यांवर कारवाईचे तसेच शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. कारवाईचे पत्रच शेखर गायकवाड यांनी राजू शेट्टींना दिले आहे. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीPuneपुणेagitationआंदोलन