शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

बीड पूर्वीही सुरक्षित होते आणि आताही सुरक्षितच : चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 11:05 IST

बीड सुरक्षित राहील. बीडची काळजी करण्याची गरज नाही असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व राज्यकर्त्यांनी आणि विरोधी पक्षांनी असे करणे टाळावे. बीड यापूर्वीही सुरक्षित होते, आताही आहे आणि यापुढेही सुरक्षित राहील. बीडची काळजी करण्याची गरज नाही, असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.एका कार्यक्रमासाठी बुधवारी पुण्यात आले असता बावनकुळे माध्यमांशी बोलत होते. मुंबईमध्ये अदानी कर लादला जात असल्याची टीका शिवसेनेचे (ठाकरे) युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केली होती. त्यासंदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले, त्यांच्याकडे बोलण्यासाठी दुसरे काही शिल्लक नाही. ते सरकारवर बोलू शकत नाहीत. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरी बसून सरकार चालविले. ते केवळ दोन दिवस मंत्रालयात आले होते. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत बोलावे. मोदी आणि शाह यांच्याबद्दल बोलण्याएवढी अंधारे यांची उंची नाही, असेही बावनकुळे म्हणाले.रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून सध्या वाद सुरू आहे. त्यासंदर्भात महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून लवकरच निर्णय घेतील. मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार असताना मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. मराठा समाजाला न्याय मिळावा, हीच सरकारची भूमिका आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण