शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बीड पूर्वीही सुरक्षित होते आणि आताही सुरक्षितच : चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 11:05 IST

बीड सुरक्षित राहील. बीडची काळजी करण्याची गरज नाही असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व राज्यकर्त्यांनी आणि विरोधी पक्षांनी असे करणे टाळावे. बीड यापूर्वीही सुरक्षित होते, आताही आहे आणि यापुढेही सुरक्षित राहील. बीडची काळजी करण्याची गरज नाही, असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.एका कार्यक्रमासाठी बुधवारी पुण्यात आले असता बावनकुळे माध्यमांशी बोलत होते. मुंबईमध्ये अदानी कर लादला जात असल्याची टीका शिवसेनेचे (ठाकरे) युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केली होती. त्यासंदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले, त्यांच्याकडे बोलण्यासाठी दुसरे काही शिल्लक नाही. ते सरकारवर बोलू शकत नाहीत. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरी बसून सरकार चालविले. ते केवळ दोन दिवस मंत्रालयात आले होते. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत बोलावे. मोदी आणि शाह यांच्याबद्दल बोलण्याएवढी अंधारे यांची उंची नाही, असेही बावनकुळे म्हणाले.रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून सध्या वाद सुरू आहे. त्यासंदर्भात महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून लवकरच निर्णय घेतील. मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार असताना मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. मराठा समाजाला न्याय मिळावा, हीच सरकारची भूमिका आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण