शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

काळजी घ्या! कात्रज, कोंढवा आंबेगावात फूड पॉयझनिंगचे रुग्ण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 11:35 IST

उघड्यावरील अन्नातून होणारी विषबाधा (फूड पॉयझनिंग) आणि दूषित पाणी यामुळेच ही साथ सुरू झाल्याचे खासगी डॉक्टर सांगतात मात्र महापालिकेकडून अद्याप यावर खुलासा आलेला नाही....

कात्रज : गेल्या काही दिवसांपासून कात्रज, कोंढवा, आंबेगाव परिसरात उलट्या-जुलाबाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. एकीकडे डोळ्यांची साथ आटोक्यात आली नसताना आता उलट्या-जुलाबांची साथ सुरू झाली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उघड्यावरील अन्नातून होणारी विषबाधा (फूड पॉयझनिंग) आणि दूषित पाणी यामुळेच ही साथ सुरू झाल्याचे खासगी डॉक्टर सांगतात मात्र महापालिकेकडून अद्याप यावर खुलासा आलेला नाही.

कात्रज चौक, कोंढवा रोड, दत्तनगर चौक, जांभूळवाडी रोड यावर अनेक ज्युस सेंटर, चहा, वडापाव बनवणाऱ्या टपऱ्या, हॉटेल आहेत यांच्याकडे फूड लायसन्स आहे का? नसेल तर आरोग्य विभाग काय कारवाई करतो, असादेखील प्रश्न उपस्थित होत आहे. परिसरात अनेक ठिकाणी खाऊगल्ल्या व टपऱ्यांमुळे रोगराई पसरत आहे. अस्वच्छता, घाण पाणी आणि कोणतेही फूड लायसन, शाॅप ॲक्ट लायसन नाही त्या साऱ्या गोष्टी प्रशासनाला माहीत असतानादेखील प्रशासनाकडून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले जाते.

दररोज आपण घरातून बाहेर पडल्यानंतर हॉटेल असेल किंवा हातगाडे असतील अशा अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ खात असतो. त्याचबरोबर पाणीदेखील पीत असतो. परंतु आपण खात असलेले अन्नपदार्थ कितपत खाण्या योग्य आहे याची बरेचजण काळजी घेताना दिसून येत नाही. बऱ्याच ठिकाणी अन्नपदार्थ बनवताना योग्य ती काळजी घेतली जात नाही, असे निदर्शनास दिसून येत आहे.

मागील दोन ते तीन दिवसांपासून घरातील सदस्यांना पोटाचे विकार जाणवू लागले आहेत. यामुळे उलटी जुलाब होत आहेत. दूषित पाण्यामुळे की बाहेरील अन्नपदार्थ खाल्ल्याने हे समजून येत नाही.

दुर्गा कोरे, नागरिक

उच्च आर्द्रता आणि तापमानातील चढउतारांमुळे पावसाळा हा ऋतू जीवाणूंच्या वाढीसाठी योग्य आहे, परिणामी अन्नातून विषबाधाच्या घटनांमध्ये वाढ होते. बॅक्टेरिया, विषाणू आणि पॅरासाइटनी दूषित अन्न किंवा पाण्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते. अतिसार, वेदनादायक पेटके, मळमळ आणि उलट्या ही अन्न विषबाधाची लक्षणे आहेत.

- डॉ. नीलेश गुजर, बालरोगतज्ज्ञ

मागील वीकेंडला लागून सुट्ट्या आल्यामुळे लोक मोठ्या संख्येने पिकनिकसाठी बाहेर पडले होते. बाहेरचे खाण्यात आल्यामुळे फूड पॉयझनिंगचा धोका वाढला आणि फूड पॉयझनिंगसदृश रुग्णांची संख्या वाढली. या आजाराची तीव्रता प्रत्येक व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून असते.

- डॉ. प्रदीप खाबिया

टॅग्स :foodअन्नPuneपुणेkatrajकात्रजambegaonआंबेगावkondhvaकोंढवा