शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

काळजी घ्या! कात्रज, कोंढवा आंबेगावात फूड पॉयझनिंगचे रुग्ण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 11:35 IST

उघड्यावरील अन्नातून होणारी विषबाधा (फूड पॉयझनिंग) आणि दूषित पाणी यामुळेच ही साथ सुरू झाल्याचे खासगी डॉक्टर सांगतात मात्र महापालिकेकडून अद्याप यावर खुलासा आलेला नाही....

कात्रज : गेल्या काही दिवसांपासून कात्रज, कोंढवा, आंबेगाव परिसरात उलट्या-जुलाबाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. एकीकडे डोळ्यांची साथ आटोक्यात आली नसताना आता उलट्या-जुलाबांची साथ सुरू झाली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उघड्यावरील अन्नातून होणारी विषबाधा (फूड पॉयझनिंग) आणि दूषित पाणी यामुळेच ही साथ सुरू झाल्याचे खासगी डॉक्टर सांगतात मात्र महापालिकेकडून अद्याप यावर खुलासा आलेला नाही.

कात्रज चौक, कोंढवा रोड, दत्तनगर चौक, जांभूळवाडी रोड यावर अनेक ज्युस सेंटर, चहा, वडापाव बनवणाऱ्या टपऱ्या, हॉटेल आहेत यांच्याकडे फूड लायसन्स आहे का? नसेल तर आरोग्य विभाग काय कारवाई करतो, असादेखील प्रश्न उपस्थित होत आहे. परिसरात अनेक ठिकाणी खाऊगल्ल्या व टपऱ्यांमुळे रोगराई पसरत आहे. अस्वच्छता, घाण पाणी आणि कोणतेही फूड लायसन, शाॅप ॲक्ट लायसन नाही त्या साऱ्या गोष्टी प्रशासनाला माहीत असतानादेखील प्रशासनाकडून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले जाते.

दररोज आपण घरातून बाहेर पडल्यानंतर हॉटेल असेल किंवा हातगाडे असतील अशा अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ खात असतो. त्याचबरोबर पाणीदेखील पीत असतो. परंतु आपण खात असलेले अन्नपदार्थ कितपत खाण्या योग्य आहे याची बरेचजण काळजी घेताना दिसून येत नाही. बऱ्याच ठिकाणी अन्नपदार्थ बनवताना योग्य ती काळजी घेतली जात नाही, असे निदर्शनास दिसून येत आहे.

मागील दोन ते तीन दिवसांपासून घरातील सदस्यांना पोटाचे विकार जाणवू लागले आहेत. यामुळे उलटी जुलाब होत आहेत. दूषित पाण्यामुळे की बाहेरील अन्नपदार्थ खाल्ल्याने हे समजून येत नाही.

दुर्गा कोरे, नागरिक

उच्च आर्द्रता आणि तापमानातील चढउतारांमुळे पावसाळा हा ऋतू जीवाणूंच्या वाढीसाठी योग्य आहे, परिणामी अन्नातून विषबाधाच्या घटनांमध्ये वाढ होते. बॅक्टेरिया, विषाणू आणि पॅरासाइटनी दूषित अन्न किंवा पाण्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते. अतिसार, वेदनादायक पेटके, मळमळ आणि उलट्या ही अन्न विषबाधाची लक्षणे आहेत.

- डॉ. नीलेश गुजर, बालरोगतज्ज्ञ

मागील वीकेंडला लागून सुट्ट्या आल्यामुळे लोक मोठ्या संख्येने पिकनिकसाठी बाहेर पडले होते. बाहेरचे खाण्यात आल्यामुळे फूड पॉयझनिंगचा धोका वाढला आणि फूड पॉयझनिंगसदृश रुग्णांची संख्या वाढली. या आजाराची तीव्रता प्रत्येक व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून असते.

- डॉ. प्रदीप खाबिया

टॅग्स :foodअन्नPuneपुणेkatrajकात्रजambegaonआंबेगावkondhvaकोंढवा