शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

काळजी घ्या! कात्रज, कोंढवा आंबेगावात फूड पॉयझनिंगचे रुग्ण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 11:35 IST

उघड्यावरील अन्नातून होणारी विषबाधा (फूड पॉयझनिंग) आणि दूषित पाणी यामुळेच ही साथ सुरू झाल्याचे खासगी डॉक्टर सांगतात मात्र महापालिकेकडून अद्याप यावर खुलासा आलेला नाही....

कात्रज : गेल्या काही दिवसांपासून कात्रज, कोंढवा, आंबेगाव परिसरात उलट्या-जुलाबाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. एकीकडे डोळ्यांची साथ आटोक्यात आली नसताना आता उलट्या-जुलाबांची साथ सुरू झाली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उघड्यावरील अन्नातून होणारी विषबाधा (फूड पॉयझनिंग) आणि दूषित पाणी यामुळेच ही साथ सुरू झाल्याचे खासगी डॉक्टर सांगतात मात्र महापालिकेकडून अद्याप यावर खुलासा आलेला नाही.

कात्रज चौक, कोंढवा रोड, दत्तनगर चौक, जांभूळवाडी रोड यावर अनेक ज्युस सेंटर, चहा, वडापाव बनवणाऱ्या टपऱ्या, हॉटेल आहेत यांच्याकडे फूड लायसन्स आहे का? नसेल तर आरोग्य विभाग काय कारवाई करतो, असादेखील प्रश्न उपस्थित होत आहे. परिसरात अनेक ठिकाणी खाऊगल्ल्या व टपऱ्यांमुळे रोगराई पसरत आहे. अस्वच्छता, घाण पाणी आणि कोणतेही फूड लायसन, शाॅप ॲक्ट लायसन नाही त्या साऱ्या गोष्टी प्रशासनाला माहीत असतानादेखील प्रशासनाकडून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणले जाते.

दररोज आपण घरातून बाहेर पडल्यानंतर हॉटेल असेल किंवा हातगाडे असतील अशा अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ खात असतो. त्याचबरोबर पाणीदेखील पीत असतो. परंतु आपण खात असलेले अन्नपदार्थ कितपत खाण्या योग्य आहे याची बरेचजण काळजी घेताना दिसून येत नाही. बऱ्याच ठिकाणी अन्नपदार्थ बनवताना योग्य ती काळजी घेतली जात नाही, असे निदर्शनास दिसून येत आहे.

मागील दोन ते तीन दिवसांपासून घरातील सदस्यांना पोटाचे विकार जाणवू लागले आहेत. यामुळे उलटी जुलाब होत आहेत. दूषित पाण्यामुळे की बाहेरील अन्नपदार्थ खाल्ल्याने हे समजून येत नाही.

दुर्गा कोरे, नागरिक

उच्च आर्द्रता आणि तापमानातील चढउतारांमुळे पावसाळा हा ऋतू जीवाणूंच्या वाढीसाठी योग्य आहे, परिणामी अन्नातून विषबाधाच्या घटनांमध्ये वाढ होते. बॅक्टेरिया, विषाणू आणि पॅरासाइटनी दूषित अन्न किंवा पाण्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते. अतिसार, वेदनादायक पेटके, मळमळ आणि उलट्या ही अन्न विषबाधाची लक्षणे आहेत.

- डॉ. नीलेश गुजर, बालरोगतज्ज्ञ

मागील वीकेंडला लागून सुट्ट्या आल्यामुळे लोक मोठ्या संख्येने पिकनिकसाठी बाहेर पडले होते. बाहेरचे खाण्यात आल्यामुळे फूड पॉयझनिंगचा धोका वाढला आणि फूड पॉयझनिंगसदृश रुग्णांची संख्या वाढली. या आजाराची तीव्रता प्रत्येक व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून असते.

- डॉ. प्रदीप खाबिया

टॅग्स :foodअन्नPuneपुणेkatrajकात्रजambegaonआंबेगावkondhvaकोंढवा