शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

जिवंत झऱ्यांना हवाय ‘हेरिटेज’चा आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:39 IST

दिवसेंदिवस पाण्यासाठी मारामारी होत असताना, दुसरीकडे नैसर्गिक झरे, विहिरी बुजविण्याचे काम केले जात आहे.

- श्रीकिशन काळेपुणे : दिवसेंदिवस पाण्यासाठी मारामारी होत असताना, दुसरीकडे नैसर्गिक झरे, विहिरी बुजविण्याचे काम केले जात आहे. खरं तर हे झरे, विहिरी नैसर्गिक ठेवा असून, तो कायम जपला पाहिजे. त्यामुळे कायमस्वरूपी पिण्याचे पाणी मिळू शकते. परंतु, हा ठेवाच गायब होत असल्याने त्यांना ‘हेरिटेज’चा दर्जा दिल्यास ते जिवंत राहतील. त्यासाठी पर्यावरणप्रेमींकडून महापौर, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याकडे पत्राद्वारे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. पण, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना याबद्दल काहीच आस्था दिसत नसल्याने त्यांच्याकडून काहीच पावले उचलली जात नाहीत.बावधन येथील राम नदीमध्ये अनेक जिवंत झरे व विहिरी आहेत. त्यातील अनेक झरे, विहिरी बुजविण्यात आल्या असून, सध्या ड्रेनेजलाइन टाकण्यात येत आहे. त्यामुळे तर जे जिवंत झरे आहेत, तेदेखील त्याकडे मरून जात आहेत. त्यामुळे राम नदीत येणारे पाणी कमी होत आहे. परिणामी नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. काही दिवसांनंतर ही नदी गायब होईल की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. हे झरे वाचविणे गरजेचे बनले आहे. या झºयांना हेरिटेज म्हणून घोषित करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी शैलेश पटेल, गणेश कलापुरे व इतर पर्यावरणप्रेमींनी केली आहे.पटेल म्हणाले, ‘‘नदी ही जीवनदायिनी आहे. पूर्वी तिचे पाणी पिण्यासाठी वापरत असत. परंतु आजची अवस्था खूपच वाईट झाली आहे. पिण्यासाठी तर सोडाच, पण वापरण्यालायकदेखील नाही. ही अवस्था आपणच केली आहे. नदी वाचविण्यापूर्वी अगोदर हे जिवंत झरे, विहिरी वाचविल्या पाहिजेत. कारण जर पाणीच नसेल, तर नदी असून उपयोग काय? नाल्यावर किंवा नदीपात्रावर रस्ता करण्यास मी विरोध करीत नाही. परंतु, नदीच्या किंवा झºयांच्या प्रवाहाला धोका पोहोचू नये. सध्या जमिनीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे सर्वत्र बांधकामाला ऊत आला आहे. प्रशासनाने झरे, विहिरी, ओढे यांच्यावर आरक्षण टाकून ते जपावेत आणि त्यांची वेळोवेळी तपासणीही केली पाहिजे.’’>दरवाजेच होताहेत बंदराम नदीवरील पुलाखालील अनेक दरवाजेदेखील बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे पावसाळ््यात येथून पाणीच जाणार नाही. नदीपात्रात बांधकाम सुरू असल्याने नदीच्या एकेक भागावर घाव घातला जात आहे. छायाचित्रात एक दरवाजा बांधकाम केल्याने बंद झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे तेथून पाणी वाहणार कसे ?>नदीची स्वच्छता नदीचे प्रदूषण याबाबत सरकार एका बाजूला मोठमोठ्या घोषणा करीत आहे. नमामि गंगेसारख्या योजना पंतप्रधान राबवत आहेत. महाराष्ट्रात नमामि चंद्रभागेसारखी योजना मुख्यमंत्री राबवत आहेत; पण या नद्या ज्या छोट्या नद्यांनी ओढ्यांनी आणि जलस्रोतांनी प्रवाहित झाल्या आहेत. ते मूळचे छोटे प्रवाह आज नष्ट केले जात आहेत. नदीच्या योजना करताना पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांना सहभागी करून घेतले पाहिजे. राम नदीतील नैसर्गिक झरे बुजवले जात आहेत. ते संरक्षित केले पाहिजेत. त्यासाठी नागरिकांनीच पाठपुरावा करणे आवश्यक आहे.- गणेश कलापुरे, पर्यावरणप्रेमी, औंध-बावधन>झºयातून दररोज एक लाख लिटर पाणीराम नदी भुकूमजवळील डोंगरातून उगम पावते. तेथून बावधन-पाषाण-बाणेर भागातून पुणे शहरातील मुळा नदीला मिळते. सुमारे १८ किलोमीटरचा ती प्रवास करते. ही नदी वाचविण्यासाठी इंदू गुप्ता, सारंग यादवडकर, उपेंद्र धोंडे आदींनी लढा दिला आहे व देत आहेत. राम नदीमध्ये सुमारे १७ झरे शोधले आहेत. परंतु, त्यातील अनेक झरे बुजले गेले आहेत. येथील झरा दिवसाला एक लाख लिटर स्वच्छ पाणी देते.>नैसर्गिक पाण्याचे स्रोत आरक्षित व्हावेतराज्य सरकारकडून मैदाने, क्रीडांगण, रुग्णालय आदींसाठी जागा आरक्षित केली जाते. कारण या आवश्यक गोष्टी आहेत. परंतु, पाणी तर सर्वात आवश्यक गोष्ट आहे. पाणी हे जीवन आहे. त्यामुळे जे जिवंत झरे, विहिरी आहेत, त्यांना जिवंत ठेवण्यासाठी तेदेखील आरक्षित केले पाहिजेत, तरच ते जिवंत राहतील. ज्यांच्या जागेत हे झरे, विहिरी असतील, त्यांना योग्य मोबदला देऊन ते जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे शैलेश पटेल यांनी सांगितले.>गुजरात सरकारमध्ये नदीबाबत जागरूकतानैसर्गिक पाण्याचे झरे, विहिरी आरक्षित व्हावे, यासाठी मुख्यमंत्री, पंतप्रधान, जलसंपदा विभाग यांना पत्र पाठविले आहे. अद्याप त्यांच्याकडून काही उत्तर आलेले नाही. गुजरात मुख्यमंत्र्यांना एका नदीविषयी मी पत्र पाठवले होते, तर त्यांनी मला संपर्क साधून त्या नदीविषयी काही प्रकल्प करता येईल का? असे विचारले आणि किती निधी लागेल, तेदेखील विचारले. गुजरात सरकारकडून त्वरित प्रतिसाद मिळाला, पण आपल्या महापौरांनी स्थानिक झरे, विहिरी यांबाबत काहीच उत्तर दिलेले नाही याची खंत वाटते, असे पटेल म्हणाले.>झºयाचे संवर्धनकरू : महापौरया संदर्भात महापौर मुक्ता टिळक यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, ‘‘बावधन झºयाबाबत आम्ही तेथील पाण्याची पातळी तपासणार आहोत. त्यानंतर झºयाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.’’