शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'बारामतीत यंदा इतिहास घडणार, कांचन कुल निवडून येणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 15:16 IST

महायुतीतील नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली.

पुणे - बारामतीची जागा 2014 ला महादेव जानकर यांच्याकडे होती. त्यावेळी त्यांच चिन्ह कपबशी होतं. त्यांनी कमळ चिन्ह घेतलं असतं तर पाच ते दहा हजारांच्या मतांनी ते निवडून आले असते, पवारसाहेबांचा बालेकिल्ला ढासळला असता, असे केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. तसेच, यावेळी कांचनताई कुल बारामतीतून कमळाच्या तिकीटावर लढत आहेत. यंदा इतिहास घडण्याची शक्यता असून परिवर्तन घडून येईल, ती जागा आम्हीच जिंकू, असे म्हणत आठवलेंनी बारामतीत कमळ खुलणार असल्याचे म्हटले. 

महायुतीतील नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बारामती आणि राज्यातील भाजपा-शिवसेना महायुतीचं वातावरण असल्याचं ते म्हणाले. तसेच बारामती मतदारसंघात यंदा कमळ खुलणार आहे. गतनिवडणुकीत बारामतीची जागा महादेव जानकर यांच्याकडे होती. त्यावेळी त्यांचं चिन्ह कपबशी होतं. त्यांनी कमळ चिन्ह घेतलं असतं तर पाच ते दहा हजारांच्या मतांनी ते निवडून आले असते. परंतु, यंदा भाजपाकडून कांचन कुल या निवडणूक लढवत आहेत. यंदा परिवर्तन घडणार आहे. आम्ही यंदा बारामती देखील जिंकू. महाराष्ट्रात 40 हून अधिक जागा युतीला मिळतील, असा विश्वासही आठवलेंनी बोलून दाखवला.  

दरम्यान, जी वंचित आघाडी आहे, ती वंचित नसून किंचित आघाडी आहे. कारण, महाराष्ट्राच्या राजकारणावर या आघाडीचा किंचित परिणाम होईल, असे म्हणत प्रकाश आंबेडकरानाही टोला लगावला. मी सगळ्या आघाड्या करुन बसलेलो आहे. 2009 मध्ये मी रिपबल्कीन फ्रंटची आघाडी उभारली होती. त्यामध्ये, सीपीएम, सीपीआय, समाजवादी पार्टी, जनता दल, आरपीआयचे सर्व दल अशी मी आघाडी केली होती. मात्र, महाराष्ट्रातील जनतेला तिसरी आघाडी मान्य नाही. महाराष्ट्रातील जनतेला एका बाजुला भाजपा-सेना आणि दुसऱ्या बाजुला काँग्रेस-आघाडीच मान्य आहे. त्यामुळे मी तिसऱ्या आघाडीचा प्रयोग सोडून भाजप शिवसेनेकडे आल्याचेही ते म्हणाले. वंचित आघाडीच्या मत विभाजनाचा फायदा हा भाजपा आणि शिवसेनेलाच होईल. आम्हाला चांगल्याप्रकारे यश मिळेल. देशात मोदींचेच सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेBaramatiबारामतीbaramati-pcबारामतीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPuneपुणे