शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Baramati Vidhan Sabha Election 2024: चारवेळा उपमुख्यमंत्रीपद, सगळी सत्ता त्यांच्याकडे आणि अन्याय झाला म्हणता ? शरद पवार यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 16:05 IST

युगेंद्र पवार हे नवखे आहेत. त्यांना संधी मिळायला हवी, असे देखील पवार म्हणाले.

बारामती : अन्याय काय झाला,सत्ता त्यांच्याकडे आहे. चारवेळा उपमुख्यमंत्री पद, अनेक वर्ष मंत्रीपद, सगळी सत्ता त्यांच्याकडे आणि अन्याय झाला म्हणता ? असा उपरोधिक सवाल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव येथे शंभू सिंह हायस्कूल आणि कॉलेजमध्ये शरद पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला.त्यानंतर पत्रकारांशी पवार बोलत होते.

यावेळी पत्रकारांनी त्यांना अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी लिहिलेले एक पत्र सांगता सभेत वाचून दाखवण्यात आले होते. त्यामध्ये अजित पवार यांच्यावर मोठा अन्याय झाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. याचा संदर्भ देत विचारलेल्या प्रश्नावर पवार यांनी कसला अन्याय झाला,कोणाकडुन झाला,असा उपरोधिक सवाल केला आहे ? युगेंद्र पवार हे नवखे आहेत. त्यांना संधी मिळायला हवी, असे देखील पवार यांनी यावेळी नमुद केले.विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत शरद पवार पुढे म्हणाले, 'लाेकांना बदल हवा आहे, राज्यात परिवर्तन होऊन महाविकास आघाडीचे सरकार येईल,लोकांना बदल हवा आहे. मी काय ज्योतिषी नाही,जागा निश्चित सांगणार नाही. परंतु राज्यात बहुमताचे सरकार येईल. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.काटेवाडीत मतदानानंतर आज अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना महायुतीचे सरकार राज्यात येणार असून, १७५ जागा मिळतील असा दावा केला होता. त्यावर शरद पवार यांनी टोला लगावला. त्यांनी फक्त १७५ सांगितल्या २८० जागा सांगायला पाहिजे होत्या,असा टोला पवार यांनी लगावला.खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरील आरोपाबाबत ज्येष्ठ नेते पवार यांनी तुरुंंगात असणार्या व्यक्तीच्या आरोपाची नोंद घेण्याची गरज नाही,असे मत व्यक्त केले.तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला अस्वस`थ करणारा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.'

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४baramati-acबारामतीSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार