शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गाढवांची तस्करी करणाऱ्याला बारामती पाेलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 20:17 IST

गाढवांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा बारामती शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

बारामती : गाढवांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा  बारामती शहर पोलिसांनी पकडले आहे. सुमारे १५ गाढवांना घेऊन जाणारा आंध्रप्रदेश येथील आयशर टेम्पो पाठलाग करून पोलिसांनी पकडला. शनिवारी (दि. ११) रात्रीच्या सुमारास लोणंद (ता. फलटण) येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकास ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. 

बारामती शहर पोलिसांनी शनिवारी (दि. ११) रात्री गाढवांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा लावला आहे. या कारवाईत आयशर टेम्पो (क्रमांक ए.पी. ३९ टी. ७५०३) ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच या टेम्पोमध्ये असणाऱ्या १५ पैकी १३ गाढवांची देखील पोलिसांनी सुटका केली आहे. तर २ गाढवे मृत अवस्थेत अढळली.  ही टोळी आंध्र प्रदेशातील असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ते रात्रीच्या वेळी फिरुन गाढवांना भुलीचे इंजेक्शन देऊन त्यांची तस्करी करत होते. यातील मुख्य आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान ज्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे, त्याची भाषा पोलिसांनी कळत नसल्याने चौकशी करण्यात अडथळा येत असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. 

पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक योगेश शेलार, सतीश अस्वर, पोलीस कॉन्स्टेबल नितीन जगताप, रुपेश साळुंखे, नूतन जाधव, अजित राऊत, तुषार सानप, पोपट नाळे,  तुषार चव्हाण यांनी सदर टोळीचा पाठलाग करून सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे आरोपी सह ट्रक पकडला आहे. याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात बारामती येथील वडार समाजाच्या वतीने सदर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच मेलेल्या दोन गाढवांचा नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्याचे  सहायक पोलिस निरिक्षक योगेश शेलार  अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :BaramatiबारामतीPoliceपोलिस