शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

'आरोपींना मदत करणारे प्रशासनातील असो किंवा इतर कोणी त्यांना सहआरोपी करावे'; लेक वैभवीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 12:45 IST

माझ्या वडिलांची हत्या केली, त्या आरोपींना ज्यांनी कोणी मदत केली.

बारामती - मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची दि. ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आतापर्यंत सात आरोपी होते. त्यातील एक कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही सापडलेला नाही त्यामुळे पोलिस तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. अशात आज बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील स्व.सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सर्व धर्मीयांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चा स्व. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख व यांचे बंधू धनंजय देशमुख सहभागी झाले आहेत. यादरम्यान स्व. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख ही माध्यमांशी बोलतांना आरोपींना मदत करणाऱ्याला सुद्धा  सहआरोपी करण्यात यावे अशी मागणी केली. माध्यमांशी बोलतांना वैभवी देशमुख म्हणाली, माझ्या वडिलांची जी हत्या झाली. यानंतर आमचा कोणावर राग द्वेष नाही. पण ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली, त्या आरोपींना ज्यांनी कोणी मदत केली. मग ते प्रशासनातील असतील किंवा इतर कोणी असतील त्यांना सुद्धा यामध्ये सहआरोपी करावे. कारण जी घटना आज घडली आहे ती नंतर घडू नये.' असं म्हणत तिने धनंजय मुंडेंचं नाव न घेता सहआरोपी करण्याची मागणी केली.तर  स्व. सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही फरार कृष्णा आंधळे पोलिसांना कधी सापडणार असा प्रश्न विचारत टीका केली.  ही जी टोळी होती ती सराईत गुन्हेगारांची टोळी होती. ती पोलिसांसोबत सर्रास वावरत होती 307 मध्ये फरार असणारे आरोपी हा कृष्णा आंधळे दोन वर्षापासून फरार आहे तरी तरीदेखील तो केज आणि धारूर पोलिसात त्याचा वावर होता. पोलिसांकडून त्याला अभय मिळत होतं. तो यंत्रणेला घाबरत नाही. तर सर्वसामान्यांना काय घाबरणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचे नाव आल्याने धनंजय मुंडे हे चांगलेच अडचणीत सापडले होते. भाजपसह विरोधीपक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे सांगितले. धनंजय मुंडे यांचा विधीमंडळ सदस्य पदाचा राजीनामा घ्या, अशी मागणी  करण्यात येत आहे. तसेच संतोष देशमुख प्रकरणात मुंडेंनाही सहआरोपी करण्यात यावं असं म्हटलं जात आहे. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ही भाजपचीच मागणी असल्याचे म्हटलं होते. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरण