शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बारामतीत सलग ४ दिवस धुवाधार, शहर, बागायती भागात सरासरी ओलांडली, जिरायती भाग मात्र कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 02:19 IST

बारामती शहराला सलग चार दिवस जोरदार पावसाने झोडपले आहे. दिवसभराचा उकाडा, रखरखीत उन्हाचे चटके घेतल्यानंतर सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लावणे, हा दिनक्रम मागील चार दिवसांपासून बारामतीकर अनुभवत आहे.

 बारामती : बारामती शहराला सलग चार दिवस जोरदार पावसाने झोडपले आहे. दिवसभराचा उकाडा, रखरखीत उन्हाचे चटके घेतल्यानंतर सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लावणे, हा दिनक्रम मागील चार दिवसांपासून बारामतीकर अनुभवत आहे.तालुक्यातील जिरायती भागाच्या पट्ट्यात मागील आठवड्यात पाऊस पडला. त्यानंतर मात्र, पावसाने दडी मारली आहे. परंतु, शहर, बागायती भागात पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे शहरातील सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद आहे. पर्जन्यमापन केंद्र निहाय साधारणत: ५१५ ते ५२६ मिमी इतका पाऊस आज तागायत पडला आहे. काल सोनगावच्या परिसरात एकाच दिवसात १०५ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, जिरायती भागातील सोनवडी सुपे, अंजनगाव, मोरगाव, जळगाव कडेपठार, सुपे या परिसरात आणखी दमदार पावसाची गरज आहे. परंतु, बारामती परिसरातील नागरिकांनी या सततच्या पावसामुळे समाधान व्यक्त केले आहे. त्याचबरोबर धरण क्षेत्रात पडलेल्या दमदार पावसाने धरणाचा पाणीसाठा वाढला. त्याचा देखील दिलासा बारामतीकरांना आहे.बारामती पुन्हा तुंबली...आज सायंकाळी पुन्हा बारामती परिसरात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून जोरदार पावसाने झोडपण्यास सुरुवात केली. वादळी वाºयासह सायंकाळी सुरू झालेला पाऊस थांबतच नव्हता. बारामती शहरातील रस्ते पुन्हा पाण्याखाली गेले.सर्वदूर पाऊसइंदापूर तालुक्यात मात्र सर्वदूर पाऊस झाला आहे. तालुक्यातील बहुतेक भागातील ओढे-नाले तुडुंब भरले आहेत, तर नीरा व भीमा नदीला पाणी सोडले आहे.द्राक्ष, डाळिंब, केळीसाठी हानीकारकशेतक-यांनी नुकत्याच उसाच्या लागवडी केल्या आहेत. शहरालगतच्या पिंपळी, गुणवडी, लिमटेक, काटेवाडीसह माळेगाव, सोमेश्वर, छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात नव्याने झालेल्या उसाच्या लागवडी पावसाच्या पाण्याने भरून गेल्या आहेत. सगळीकडे पाणीच पाणी असे चित्र दिसत आहे. खरीपाच्या बाजरी, मका व ऊस,कडधान्याला पोषक वातावरण असले तरी द्राक्ष,डाळिंब,केळी सारख्या अगदी पिकाला हा पाऊस नुकसान कारक ठरल्याचे दिसत आहे. सध्या द्राक्षबागा मणी धरण्याच्या अवस्थेत आहे.काही ठिकाणी छाटण्या झाल्या आहेत.या पावसामुळे मण्यांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. डाळिंबाच्या बागांवर फळकूज,कुजवा व इतर बुरशीजन्य रोग पडण्याची शक्ता वाढू लागली आहे. खरीप केंद्राच्या लागवडीवर पावसाचा दुष्परिणाम झाल्याचे जाणवत आहे. अश्या पावसाने कांद्याची उगवण ४० टक्क्यांनी कमी होते. बियाणे व छतावर झालेला खर्च वाया जातो.केळीच्या लागवडीला ही पावसामुळे अडचण निर्माण झाली आहे.पाणी जाण्यासाठी सोयच केली नसल्याचे उघडरस्ते विकास महामंडळाने चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या क-हानदीच्या पुलावर पावसाचे पाणी वाहून जाण्याची सोयच नाही. गेल्या पाच वर्षात नगरपालिकेने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही उताराला साठलेल्या पाण्यामुळे दुचाकी, चारचाकी गाड्या आज देखील बंद पडण्याचे प्रकार घडले. भूमिगत गटार यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी साठले होते. सलग चार दिवस घराघरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार घडले आहेत. नगरपालिका प्रशासन पावसाच्या साठलेल्या पाण्याचा निचरा करण्यात अयशस्वी ठरली आहे. गटाराचे पाणी कºहानदीत सोडणाºया नगरपालिका प्रशासनाने पावसाचे पाणी कºहानदीत सोडण्यात कोणतीही उपाय योजना केलेली नाही. त्यामुळे संपूर्ण यंत्रणाच कोलमडत असल्याचे चित्र आहे.जिरायती भाग मात्र अद्यापही प्रतीक्षेतमोरगाव : बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील गावात गेल्या आठवडाभरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.यामुळे या भागातील रब्बी हंगामाला उपयुक्त पाऊस आहे. परंतु, दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकºयांना आहे. मोरगाव परिसरातील कºहा नदीचे पात्र कोरडेच आहे. त्याचबरोबर ओढे, पाझर तलाव, विहिरी कोरड्या आहेत. बारामती, इंदापूरच्या नीरा खोºयात धरणाचे पाणी नीरा नदीत सोडल्यामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे. तालुक्यातील सोनेश्वर येथील नीरा-कºहाचा संगम तसेच इंदापूर तालुक्यातील नीरा नृसिंहपूर येथील नीरा-भीमा नदीवरील संगामावरील पाण्याचे पात्र विस्तीर्ण झाले आहे.बारामतीतील पाऊस१ जून ते १३ सप्टेंबर २०१७ पर्यंत एकूण- बुधवार दि. १३ सप्टेंबर २०१७ पर्जन्यमान : बारामती ४० (एकूण - ५२६), लाटे ३१ (एकूण - ३२५), सुपे ३१ (एकूण - ३३५), लोणी भापकर - ४२ (एकूण ४६४), बºहाणपूर ३५ (एकूण ४३८), सोमेश्वर कारखाना ४३ (एकूण - २४६), पणदरे - ५५ (एकूण ४३२), जळगाव कडेपठार २७ (एकूण ४४६), वडगाव निंबाळकर - २५ (एकूण २९७), मोरगाव १७ (एकूण २८६), ८ फाटा होळ १३.८ (एकूण ३३२.३), उंडवडी कडेपठार १९ (एकूण १३२), माळेगाव कारखाना ४५ (एकूण-२४७), माळेगाव कॉलनी ९६ (एकूण ४३४), मानाजीनगर ३४ (एकूण ३७१), चांदगुडेवाडी ४४ (एकूण ४८४), काटेवाडी ३५ (एकूण ३९०), सोनगाव १०५.६ (एकूण ५८९.१), के.व्ही.के १०४.४ (एकूण ५१५), कटफळ ३१, अंजनगाव ३०, सोनवडी सुपे ३२.

टॅग्स :Puneपुणे