शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

बंधा-यातील पाणीसाठा कमी, हजारो हेक्टर शेती जळण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 02:36 IST

इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील निरवांगी, दगडवाडी, रासकरमळा तर माळशिरस तालुक्यातील पळसमंडळ करेवस्ती परिसरातील हजारो शेतक-यांना हा बंधारा वरदान आहे. या बंधा-यातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याने या नदीच्या किनारी असलेल्या गावातील हजारो हेक्टर क्षेत्र जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे .

निरवांगी : इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील निरवांगी, दगडवाडी, रासकरमळा तर माळशिरस तालुक्यातील पळसमंडळ करेवस्ती परिसरातील हजारो शेतक-यांना हा बंधारा वरदान आहे. या बंधा-यातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याने या नदीच्या किनारी असलेल्या गावातील हजारो हेक्टर क्षेत्र जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे .इंदापुर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, रासकरमळा तर माळशिरस तालुक्यातील पळसमंडळ करे वस्ती परिसरातील हजारो हेक्टर शेती येथील निरा नदीच्या पात्रातील पाण्यावर अवलंबून आहे.या नदीच्या पात्रात पुर्वी कमी प्रमाणात विद्यूत मोटरा होत्या. परंतु दर वर्षी मोठ्या प्रमाणात या नदीच्या पात्रातुन विद्युुत मोटर संख्या मोठ्या प्रमाणात होऊ लागली. तसेच बंधारामधुन ही थोड्या प्रमाणात पाण्याची गळती होत असते. या पात्रातुन मोठ्या प्रमाणात झालेला वाळू उपसा या सर्व कारणामुळे या नदीच्या पात्रातील पाणी हे जुन ते फेब्रुवारी या महीन्या पर्यत च असते.या मुळेदर वर्षी आमच्या शेती साठी मार्च ते जुन या महिने नदी च्या पात्रात राहण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात भाटघर धरणातून पाणी सोडण्यात यावे. असेच नियोजन संबंधीत खात्याने करणे गरजे असल्याचे मत निरवांगी बरोबरच निमसाखर, दगडवाडी, रासकरमळा, खोरोची, बोराटवाडी, चाकाटी, कंळब परिसरातील नदीच्या किनारी असलेल्या शेतकरी वर्गाची मागणी आहे .निरवांगी येथील आनेक शेतकरी म्हणाले की, नदीपात्रातील पाण्यावर हजारो हेक्टर क्षेत्र आहे. नदीपात्रातील काही ठिकाणी पाणी संपलेले आहे. ज्या ठिकाणी पाणी आहे तेही दररोज मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याने जून महिन्यापर्यंत पिके कशी राहतील, याकरिता पाणी सोडण्याचे योग्य नियोजन गरजेचे आहे . धरणातून पाणी सोडण्याचे लवकरच नियोजन करावे, अशी मागणी येथील शेतकºयांनी बोलून दाखवली.निरवांगी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यातील पाणी मोठ्या प्रमाणावर कमी होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेतातील पिकावर हजारो रुपये खर्च केले आहेत . परंतु सध्या नदीपात्रातील काही क्षेत्र पाण्याअभावी कोरडे पडलेले आहे. ज्या पात्रात थोडे पाणी आहे ते काही दिवसच राहील असे चित्र दिसून येत आहे .यामुळे संबंधित खात्याने धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन करावे, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीWaterपाणी