शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

बळीराजा पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

By admin | Updated: June 11, 2017 03:42 IST

राज्यात सुरू असणारा शेतकरी संप आणि सुकाणू समितीच्या निर्णयानुसार बारा जूनपासून शेतकरी आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. त्याबाबतचा इशारा बळीराजाने

- लोकमत न्यूज नेटवर्क

आंबेठाण : राज्यात सुरू असणारा शेतकरी संप आणि सुकाणू समितीच्या निर्णयानुसार बारा जूनपासून शेतकरी आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. त्याबाबतचा इशारा बळीराजाने आज शासनव्यवस्थेला दिला.शेतकऱ्यांच्या वतीने सर्व तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानुसार खेड तालुक्यात सोमवारी दिवसभर तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष जय प्रकाश परदेशी यांनी दिली आहे.चाकण येथे नुकत्याच झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. याप्रसंगी बाजार समिती सदस्य राम गोरे, काळुराम कड, अनिल देशमुख, जमीर काजी, विजय डोळस, माऊली शेवकरी, रमेश गोरे, अशोक बिरदवडे, मच्छिंद्र गोरे, दशरथ काचोळे, सिद्धार्थ परदेशी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.सोमवारी सकाळी आठ वाजता तालुक्यातील शेतकरी खेड येथील राजगुरू यांच्या पुतळ्याला आणि आंबेडकर पुतळ्याला हार घालून त्यानंतर तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे.मंगळवारी रास्ता रोको केला जाणार असून, त्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले आहे.