शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

बालकुमार साहित्य संस्थेचे अखेर पुनरुज्जीवन; अध्यक्षपदी संगीता बर्वे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 17:11 IST

बालकुमार साहित्य संमेलन तसेच बालवाङ्मय पुरस्काराचे आयोजन करणाऱ्या बालकुमार साहित्य संस्थेचे अखेर पुनरुज्जीवन झाले आहे. बालसाहित्यिका डॉ. संगीता बर्वे यांची सर्वानुमते संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअडीच वर्षांनी अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे या नावाने संस्थेला गवसला मुहूर्त डॉ. संगीता बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आले ११ जणांचे कार्यकारी मंडळ

पुणे : बालकुमार साहित्य संमेलन तसेच बालवाङ्मय पुरस्काराचे आयोजन करणाऱ्या बालकुमार साहित्य संस्थेचे अखेर पुनरुज्जीवन झाले आहे. जुन्या आणि नव्या कार्यकारिणीतील वाद, जुनी कार्यकारिणी बरखास्त, अस्थायी समितीची स्थापना, संस्थेची सर्वसाधारण सभा अशा घडामोडींनंतर तब्बल अडीच वर्षांनी अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे या नावाने संस्थेला मुहूर्त गवसला आहे. बालसाहित्यिका डॉ. संगीता बर्वे यांची सर्वानुमते संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आगामी आठवड्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन यंदाच्या बालकुमार साहित्य संमेलनावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.   डॉ. संगीता बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांचे कार्यकारी मंडळ निवडण्यात आले आहे. संस्थेच्या दैनंदिन कामासाठी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेने आपले ‘हिंदी भवन’ दिलेले आहे. त्याचे औपचारिक उद्घाटन लवकरच करण्यात येईल. कार्यकारी मंडळातील सर्व सभासद बालसहित्याशी निगडीत आहेत. संस्थेने पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाचा श्रीगणेशा केला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी अध्यक्ष डॉ. संगीता बर्वे, उपाध्यक्ष माधव राजगुरु, कार्यवाह मुकुंद तेलीचेरी, सहकार्यवाह सुनील महाजन, कोषाध्यक्ष डॉ. दिलीप गरुड आदी पदाधिकारी उपस्थित होते.अमरेंद्र गाडगीळ, भा. रा. भागवत, श्रीधर राजगुरु, सुधाकर प्रभू, पु. ग. वैद्य आदी साहित्यिकांनी मिळून अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन संस्था स्थापन केली. या संस्थेतर्फे बालकुमार साहित्य संमेलने, वाचक मेळावे, कथाकविता लेखन शिबिरे, स्वस्त पुस्तक प्रकाशन असे उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात येत असत. कालांतराने या संस्थेच्या नावात करुन अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था असे नामकरण करण्यात आले. मधील काळात संस्थेकडून फारच कमी काम होऊ लागले. त्यासाठी संस्थेच्या सर्वसाधारण सभेची बैठक न. म. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली. त्यामध्ये मुकुंद तेलीचेरी यांच्या अध्यक्षतेखाली एक अस्थायी समिती नेमण्यात आली. माधव राजगुरु यांच्याकडे घटना तयार करण्याचे काम सोपवण्यात आले. घटना तयार झाल्यानंतर तिच्यातील त्रुटी दूर करुन एक घटना तयार करण्यात आली. त्याला सर्व सभासदांकडून मान्यता घेण्यात आली. संस्थेचे पुनरुज्जीवन करुन संस्था नोंदणीकृत करण्यासाठी कार्यकारी मंडळाची निवड आवश्यक होती. त्यासाठी ११ जून २०१७ रोजी न. म. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेची बैठक बोलावण्यात आली. त्यामध्ये प्रथम संस्थेच्या नवीन नामकरणाला सर्व सदस्यांनी बहुमताने मान्यता दिली आणि संस्थेच्या पुनरुज्जीवनाला अखेर मुहूर्त मिळाला.

टॅग्स :literatureसाहित्यPuneपुणे