शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुर्देवाने दलितांना स्वामी विवेकानंद माहीत नाहीत: बी.जी.कोळसे पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 13:06 IST

दलितांसाठी १०० टक्के आरक्षण मागणारा माणूस दुर्देवाने दलितांना माहीत नाही.

ठळक मुद्देधार्मिक सलोखा दिन 

पुणे : स्वामी विवेकानंदांनी दलितांना न्याय मिळावा, यासाठी लढा दिला. दलितांसाठी १०० टक्के आरक्षण मागणारा माणूस दुर्देवाने दलितांना माहीत नाही. विवेकानंद, शाहू महाराज, महाराज सयाजीराव गायकवाड, संत तुकाराम यांनी कायम बहुजनांची बाजू मांडली. ही नावे घेतली तर आंदोलन व्यापक होते, हे मी आंबेडकरवाद्यांना सांगू इच्छितो. संत हे शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी समाजातील समानतेसाठी लढा दिला, असे मत माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी व्यक्त केले. दोन टक्के कर वाढवला तर अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या गोष्टी समाजाला मोफत पुरवता येतील, याबाबत मंत्र्यांना पत्र लिहिले आहे, असेही त्यांनी नमूद केले. स्वामी विवेकानंदांच्या ११७ व्या स्मृतिदिनानिमित्त लोकायत, जनता दल सेक्युलर, अभिव्यक्ती, बहुसांस्कृतिक एकता मंच आदी संस्था-संघटनांच्या वतीने ४ जुलै हा दिवस धार्मिक सलोखा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गुरुवारी गूडलक चौक येथे सलोखा सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून कोळसे पाटील बोलत होते. ‘ना भगव्यांचे, ना हिंदूंचे, विवेकांनंद सर्वांचे’, ‘प्यार बाटते चलो’, ‘जातीधर्माचे बंधन तोडू, माणसामाणसातील नाते जोडू’ अशा घोषणा यावेळी तरुण-तरुणींनी दिल्या. कोळसे पाटील म्हणाले, ‘आपल्या देशात खरे बोलणे हा गुन्हा ठरतो. परंतु, चुकीच्या गोष्टींविरोधात बोलले पाहिजे. धार्मिक सलोख्यासाठी अनेक संघटना रस्त्यावर येऊन काम करत आहेत,समाजात जागृती घडवत आहेत. धर्माच्या नावावर वाढणा-या बांडगुळांनी आपला मेंदू सडवला आहे. हा मेंदू जागृत केला पाहिजे.’आझम कँपसचे ऋषी आचार्य म्हणाले, ‘आज धर्माच्या नावाखाली कटुता पसरवली जात आहे. राम म्हटले नाही म्हणून हत्या केली जात आहे. अशा परिस्थितीत सांप्रदायिक सौहार्द ही भारताची ओळख कायम राहिले पाहिजे. कट्टरता सहन केली जाणार नाही, हा संदेश सर्वदूर पसरला पाहिजे.’जमात ए इस्लामचे आझीम शेख म्हणाले, ‘आपण सर्वांनी द्वेष बाजूला ठेवून माणुसकी जपु या. धर्माच्या नावाखाली षड्यंत्र रचले जात असताना धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून एकमेकांना समजून घेतले पाहिजे. बंधुभावाचा संदेश पसरवला पाहिजे. भारत बलशाली बनवण्यासाठी, सोनेरी दिवस परत आणण्यासाठी संघटित होण्याची गरज आहे.’अखिल भारतीय बहुजन सेनेचे निलेश वाघमारे म्हणाले, ‘भारत देश अखंड ठेवायचा असेल तर धार्मिक सलोखा ही काळाची गरज आहे.  विवेकांनंदांच्या स्वप्नातील भारत निर्माण करावा लागेल. जगावर राज्य करायचे असेल तर धर्माधर्मातील मतभेद मिटले पाहिजेत. धर्माच्या ठेकेदारांनी सलोख्याचे विचार कैद केले आहेत. त्यातून बाहेर पडून देशाच्या विकासाला चालना देणारे विचार पुढे यावेत.’अलका जोशी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नीरज जैैन तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :PuneपुणेSwami Vivekanandaस्वामी विवेकानंद