शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गरीब रुग्णांना मिळेनात बेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 03:18 IST

धर्मादाय रुग्णालयांकडून नकारघंटाच; उपचारांअभावी रुग्णांचा जातोय जीव

- श्रीकिशन काळे पुणे : गरीब रुग्णांना गंभीर आजार झालेला असेल आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागत असेल, तर सरकारी किंवा धर्मादाय रुग्णालयांमध्ये लगेच बेड मिळण्यासाठी नकारघंटाच ऐकावी लागत आहे. त्यामुळे अनेक गरीब रुग्णांना उपचार न मिळाल्याने आपला प्राण गमवावा लागत आहे. याबाबत, धर्मादाय आयुक्तांनी या रुग्णालयांवर कडक कारवाई करून, त्यांच्यावर जरब बसविण्याची गरज निर्माण झाली आहे.येरवडा येथील बारा वर्षांच्या मुलावर अनामत रक्कम भरली नाही म्हणून एका मोठ्या रुग्णालयात उपचारांअभावी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. अशा पद्धतीच्या घटना खासगी व धर्मादाय रुग्णालयांमध्ये वारंवार घडत आहेत. वस्ती परिसरात गरीब रुग्णांसाठी काम करणाऱ्या स्नेह फाउंडेशनच्या वतीने सरकारी व खासगी रुग्णालयात बेडसाठी विचारणा केली जाते. परंतु, त्यांना कायमच नकारघंटा ऐकावी लागत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना गंभीर आजार झाला, तरी ते रुग्णालयात जात नाहीत. कारण, त्यांच्याकडे भरायला पैसे नसतात.यासंदर्भात, स्नेह फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रद्धा देव म्हणाल्या, ‘‘दररोज आम्ही वस्तीमध्ये जाऊन रुग्णांची तपासणी करतो. गंभीर आजार झाल्यास थेट सरकारी किंवा खासगी रुग्णालयात फोन करून बेड आहे का, याची विचारणा करतो; परंतु प्रत्येक वेळी आम्हाला बेड रिकामा नाही, असेच ऐकावे लागते. यात दोष कोणाचा, हे सांगणे महाकठीण आहे. आज लोकसंख्या प्रचंड वाढली आहे, त्या प्रमाणात रुग्णालयांची सेवा कमी पडत आहे. दोन्हींमधील तफावत प्रचंड आहे. सरकारी रुग्णालयात प्रचंड गर्दी असल्याने तिथे अनेक रुग्ण जातच नाहीत. गरीब रुग्ण तर पैसे नसल्यामुळे उपचार घ्यायचे टाळतात. परिणामी, अनेक गंभीर आजारामुळे त्यांचा बळी जात आहे.’’विविध कंपन्यांकडून मदतीची अपेक्षा‘‘विविध कंपन्यांच्या सीएसआर शाखेतून आरोग्याशी निगडित अशा रुग्णांसाठी निधी गोळा करायचे म्हटले, तरी प्रत्येक कंपनीचे सीएसआर उद्दिष्ट ठरलेले असते. बहुतांश वेळा उद्दिष्टे सांख्यिक आणि आकडेवारीशी निगडित असतात. उदा. यंदा आमच्या कंपनीचे उद्दिष्टे हे आहे की, आम्ही १० शाळांना प्रत्येकी १ हजार बाक आणि पुस्तके भेट देणार आहोत. त्यामुळे यंदा आरोग्यावरील प्रकल्पासाठी निधी उपलब्ध नाही. परिणामी, आम्हा आरोग्यविषयक काम करणाºया संस्थांना हतबल व्हावे लागते. जर कंपन्यांनी आरोग्यावर सीएसआरच्या माध्यमातून मदत देणे सुरू केले, तर काही प्रमाणात तरी वस्तीपातळीवर आरोग्य सुधारू शकते,’’ असे श्रद्धा देव यांनी सांगितले.गरीब रुग्णांना उपचार घेणे हा त्यांचा हक्क आहे; परंतु अनेक धर्मादाय रुग्णालये पैशाच्या मागे लागले आहेत. त्यांना गरिबांचा जीव महत्त्वाचा वाटत नाही. गरीब रुग्णांवर धर्मादाय रुग्णालयांनी तातडीने उपचार सुरू केले पाहिजेत. असे न केल्यास त्या रुग्णालयांवर गुन्हा दाखल करायला हवा.- उमेश चव्हाण, राज्य अध्यक्ष, रुग्ण हक्क परिषदस्नेह फाउंडेशनच्या समाजसेवकांचा अनुभवसमाजसेवक : हॅलो, एक गरीब रुग्ण आहे, त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करायचे आहे. बेड रिकामा आहे का ?सरकारी रुग्णालय १ : आता बेड रिकामा नाहीय, एक आठवड्याने फोन करा.सरकारी रुग्णालय २ : अहो आम्हाला माहिती आहे की, तुमचा रुग्ण अत्यावस्थेत आहे. पण, आम्ही तरी काय करणार ? आता एवढ्या रात्री डॉक्टर पण कमी आहेत आणि बेड पण रिकामा नाही.खासगी रुग्णालय : आम्ही करतो दाखल तुमच्या रुग्णाला; पण ३० हजार रुपये जमा करावे लागतील.रुग्णाचे आईवडील : मॅडम, अहो आम्हाला नाही करायचं आमच्या बाळाला रुग्णालयात दाखल. आम्ही आमच्या गावाला नेतो. बरं होईल ते. आमची परिस्थिती नाहीये रुग्णालयात दाखल करायची आणि केलं तरी आमची बिगारी पण बुडणार. त्यापेक्षा राहूदे. आम्ही लसणाची माळ बांधतो त्याला आणि गावी घेऊन जातो.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलPuneपुणे