शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

केंद्राचा निधीच उपलब्ध न झाल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 21:56 IST

एफटीआयआय ही शासकीय संस्था असल्याने काही प्रवेश एससी/एसटी/ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय आणि राज्य स्तरावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

ठळक मुद्दे२०१६-१७ शैक्षणिक वर्षातील रक्कम मिळालेली नाही 

पुणे : केंद्र शासनाकडून निधीच उपलब्ध न झाल्यामुळे फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया ( एफटीआयआय) मधील तीन वर्षांच्या पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना  २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीची रक्कम अद्यापही मिळालेली नाही.    केंद्राकडून निधी मिळाल्यामुळे यंदाच्या वर्षात ही रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी शिष्यवृत्तीची रक्कम मिळेल का नाही याची शाश्वती नसल्यामुळे विद्यार्थ्याँनी दुस-या वर्षीच्या शिष्यवृतीचे नूतनीकरणच केले नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात सापडले आहे. एफटीआयआय ही शासकीय संस्था असल्याने काही प्रवेश एससी/एसटी/ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय आणि राज्य स्तरावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. केंद्रीय शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी नॅशनल स्कॉलरशीप पोर्टलवर आॅनलाईन माध्यमातून शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करतात. त्यातून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यानंतर केंद्राकडून संस्थेला निधी देण्यात येतो. त्यानुसार त्याची रक्कम विद्यार्थ्यां खात्यात जमा केली जाते. मात्र २०१६-१७ मध्ये दिग्दर्शन, अभिनय यांसारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थ्यांना अद्यापही त्या शैक्षणिक वर्षाची रक्कम मिळाली नसल्याचे समोर आले आहे. या शिष्यवृत्तीची रक्कम ही ८५ हजार ते १ लाख रूपयांपर्यंत असल्याने विद्यार्थ्यांनी संस्थेतील शैक्षणिक विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर केंद्राकडून निधी उपलब्ध झाल्यामुळे शिष्यवृत्तीची रक्कम लवकरच खात्यात जमा होईल असे विभागाकडून सांगण्यात आले आहे. या शैक्षणिक वर्षामधील रक्कम किमान २०१७ च्या जून-जुलै मध्ये तरी मिळणे अपेक्षित होते. मात्र, २०१८ उजाडले तरी ती रक्कम मिळालेली नाही. पहिल्याच वर्षीची रक्कम मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने दुस-या वर्षीच्या शिष्यवृत्तीचे आम्ही नूतनीकरणच केले नाही. यामुळे आमचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाल्याचे विद्यार्थ्यांनी ’लोकमत’शी बोलताना सांगितले.यासंदर्भात एफटीआयआयच्या शैक्षणिक विभागातील संबंधित अधिका-याशी संपर्क साधला असता त्यांनी केंद्राकडून निधीच उपलब्ध न झाल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्याँना शिष्यवृत्तीची रक्कम देण्यास विलंब लागला असल्याची कबुली दिली. दरवर्षी शिष्यवृत्तीचे नूतनीकरण हे जून-जुलै मध्ये करावे लागते विद्यार्थ्यांनी ते केले नसेल तर ते शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :PuneपुणेFTIIएफटीआयआयStudentविद्यार्थी