शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वासुंदेत नवजात अर्भकाचा मृत्यू, आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा मातेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 02:24 IST

एकीकडे नवजात मुलांच्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. मात्र, वासुंदे येथील आरोग्य केंद्रात योग्य आणि वेळेत सुविधा न मिळाल्याने दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या नवजात अर्भकाचा शनिवारी पहाटे मृत्यू झाल्याचा आरोप नवजात अर्भकाच्या मातेने केला.

वासुंदे - एकीकडे नवजात मुलांच्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. मात्र, वासुंदे येथील आरोग्य केंद्रात योग्य आणि वेळेत सुविधा न मिळाल्याने दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या नवजात अर्भकाचा शनिवारी पहाटे मृत्यू झाल्याचा आरोप नवजात अर्भकाच्या मातेने केला.वासुंदे येथील मनीषा राजेंद्र जांबले ही माता गुरुवारी (दि. २४) पहाटे घरीच सुखरूप प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. त्यानंतर मुलाचे वजन कमी असल्याचा संशय आल्याने तिने तत्काळ १०८ नंबरला फोन करून माहिती दिली. तसेच, गावातील उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेल्या आरोग्यसेविकेसही याबाबतची कल्पना दिली. यानंतर १०८ नंबरच्या गाडीत बसून बाळंतीण, तिचा पती व कुटुंबातील इतर व्यक्ती पुढील उपचारांसाठी कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होण्यासाठी गेले. मात्र, पहाटेच्या सुमारास कुरकुंभ येथील आरोग्य केंद्राचे मेन गेट बंद दिसल्याने ही रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालय दौंड येथे गेली. या वेळी या रुग्णालयात उपस्थित असलेल्या कर्मचाºयांनी नॉर्मल डिलिव्हरी झाली असताना आपण कशासाठी आलात, असा प्रश्न विचारला. त्या वेळी अर्भकाच्या मातेने सांगितले, की ‘मला बाळाचे वजन कमी असल्याचे वाटते. तसेच पहिल्या बाळंतपणा वेळी माझा रक्तदाब कमीजास्त होत होता. त्यामुळे आम्ही दवाखान्यात आलो असून, मला पुढील उपचारांसाठी अ‍ॅडमिट करून घ्या.’यानंतर रुग्णालयातील कर्मचाºयांनी बाळाचे वजन व्यवस्थित असल्याचे सांगितले व भरती करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याचे कारण सांगून बाळ-बाळंतणीला घरी पाठविले. मात्र, परत येताना कोणतीही गाडीची व्यवस्था नसल्याने एसटी बस व खासगी वाहनाने या मातेला घरी यावे लागले.त्यानंतर शनिवारी पहाटे या अर्भकाचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांनीच योग्य दखल न घेतल्याने मुलाचा मृत्यू झालाचा आरोप मातेने केला आहे.मूकबधिर वडील व्यथा सागणार तरी कशी..?- हे कुटुंब मोलमजुरी करून आपली उपजीविका करते. या नवजात अर्भकाचे वडील राजेंद्र बाबूराव जांबले हे मूकबधिर आहेत. ते स्वत: मूकबधिर असल्याने त्यांना येत असलेल्या अडचणी समजत असूनही आपली व्यथा व्यक्त करू शकले नाहीत. त्यामुळे १०८ नंबरला फोन करण्यापासून ते दवाखान्यातील कर्मचाºयांना अडचण सांगण्यापर्यंत सर्व गोष्टी या प्रसूत झालेल्या मातेला कराव्या लागल्या.सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना योग्य शासकीय सेवा मिळत नसेल, तर शासकीय रुग्णालये कशासाठी आहेत? आज एका मूकबधिर कुटुंबावर आरोग्य विभागाच्या असंवेदनशीलतेमुळे एका निष्पाप मुलाला मुकावे लागले आहे. आजच्या प्रगत युगात मुलं होण्यासाठी कितीतरी मातापित्यांना लाखो रुपयांचा खर्च होऊनही पुत्रप्राप्ती होत नसल्याच्या अनेक घटना समाजासमोर आहेत. त्यामुळे नवजात अर्भकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.-नंदा जांबले, सरपंच ग्रामपंचायत वासुंदेमला या घटनेची माहिती मिळाली आहे. सध्या मी रजेवर असल्याने दोन दिवसांत घटनेची सविस्तर माहिती घेण्यात येईल.- राजेंद्र पाखरे, आरोग्य अधिकारीमी सध्या सुटीवर आहे. मला याबाबत रुग्णालयातील कर्मचाºयांनी माहिती दिली आहे. घडलेल्या घटनेची माहिती घेऊन जबाबदार असणाºया कर्मचाºयांवर कारवाई करण्यात येईल.- डॉ. रूपाली पाखरे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक, दौंड

टॅग्स :Deathमृत्यूPuneपुणे