शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

बेबी कालवा फुटण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 23:39 IST

पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष : पुण्यातील कालवाफुटी घटनेच्या पुनरावृत्तीची भीती

उरुळी कांचन : खडकवासला पाटबंधारे विभागाच्या बेबी कालव्यातून (जुन्या) वाहणारे घाण पाणी जलपर्णीमुळे अडले आहे. हे पाणी पाझरून आजूबाजूच्या शेतात साचत असल्यामुळे कालवा परिसरातील शेती संकटात सापडली आहे. पाण्याचा दबाब वाढल्यास हा कालवा फूटून पुण्यात दांडेकर पुलाजवळ नवा कालवा फुटल्याने जो जलप्रलय झाला तसाच प्रकार या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. मात्र, याकडे पाटबंधारे खात्याने दुर्लक्ष केले आहे.आघाडी सरकारच्या काळात पुण्याचे सांडपाणी शुद्ध करून जुन्या कालव्याच्या माध्यमातून हवेली व दौंड या तालुक्यांच्या शेतीसाठी वापरण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला. या कालव्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे ७५ कोटी रुपये खर्च करूनही त्यावरील छोटे पूल अन्य काही कामे न झाल्याने एवढा मोठा खर्च करूनही या कालव्यातून पाणी शेतीपर्यंत पोहोचले नाही.

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिल्यावर त्यांनी तातडीने अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला व पुलांऐवजी पाईप टाकून पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला. तसेच, या कालव्यातून पाणी सोडण्यात आले; पण हा कालवा बरीच वर्षे बंद असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. तीन वर्षांपूर्वी जुन्या मुळा-मुठा (बेबी कालव्याची) कालव्याची किरकोळ दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर व मुंढवा जॅकवेलमधून चार पंपाच्या साह्याने कालव्यात पाणी सोडण्यात आले. सुरुवातीच्या काळात कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होते. सध्या जॅकवेलमधील पंपांची संख्या वाढविल्याने त्यतून वाहणाºया पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे आणि जलपर्णीच्या अडथळ्याने दिवसेंदिवस कालव्याच्या परिसरात पाणीगळती वाढत आहे. सातत्याने होणाºया गळतीमुळे शेतकºयांच्या जमिनी नापीक झाल्या आहेत. तर, कालव्याच्या परिसरातील घरांमध्ये पाणी पाझरत आहे. कालव्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली असल्याने पाण्याचा दबाव वाढून कालवा फुटण्याची शक्यता आहे. मोठी दुर्घटना होण्याआधी या कालव्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.जुन्या (बेबी) कालव्यातून घाण पाणी पाझरून उरुळी कांचन गावाच्या शेतकºयांच्या शेतात साठल्याने उभ्या पिकाचे नुकसान होत आहे. कालव्याच्या शेजारी फूलशेती आहे. मात्र, कालव्याचे पाणी शेतात साठत असल्याने शेतकºयांना गुलाबाची फुले तोडून बाजारात नेणे अवघड झाले आहे. या गळतीमुळे कालव्याच्या परिसरातील शेतकºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.याबाबत मुठा कालवा उपविभागाचे उपविभागीय अभियंता आर. बी. व्यवहारे म्हणालेसंबंधित कालवादुरुस्तीचे काम हे काम उपविभागाकडे येत नाही. हे काम यवत उपविभागाकडे आहे.यवत उपविभागाचे उपअभियंता बनकर म्हणाले, की ही बाब खरी असून लवकरच जेसीबी मशीनच्या साह्याने जलपर्णी काढून पाण्याचा अडथळा दूर करण्यात येईल.

टॅग्स :Puneपुणे