शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

Maharashtra HSC result 2018 : गुणांच्या स्पर्धेत मुंबईने टाकले सगळयांना मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 15:51 IST

राज्यमंडळाने गेल्या काही वर्षांपासून राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे बंद केले आहे. मात्र ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची विभागनिहाय संख्या मंडळाकडून जाहीर करण्यात आली

ठळक मुद्दे९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण : तब्बल ५ हजार ४८६ विद्यार्थ्यांची बाजी

पुणे : महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेत राज्यभरातून ५ हजार ४८६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत, यामध्ये सर्वाधिक २ हजार २८८ विद्यार्थी एकटया मुंबई विभागाचे आहेत. त्यामुळे यंदा मुंबईच्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण मिळविण्यामध्ये सगळया विभागांना मागे टाकले आहे.  राज्य मंडळाचा बारावीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. राज्यमंडळाने गेल्या काही वर्षांपासून राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे बंद केले आहे. मात्र ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची विभागनिहाय संख्या मंडळाकडून जाहीर करण्यात आली.मुंबई विभागातून ३ लाख ११ हजार ६५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २ हजार २८८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. त्याचबरोबर ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून ३८ हजार २१४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.  पुणे विभागातून २ लाख ३५ हजार ५०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७०० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. ७५टक्क्यांपेक्षा जास्त गूण मिळालेले २० हजार ८७० विद्यार्थी आहेत.  नागपूर विभागामधून १ लाख ६४ हजार ६२७ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत बसले होते. यातील १ लाख ४४ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी ६९८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गूण मिळविणाऱ्यांचे प्रमाण १० हजार ३०२ इतके आहे.औरंगाबाद विभागामधून  १ लाख ५९ हजार ०८६ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. यापैकी २९४ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले तर १६ हजार ०१६ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गूण मिळाले. कोल्हापूर विभागामधून १ लाख २५ हजार ६४८विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३५० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गूण मिळविणाऱ्यांचे प्रमाण ८ हजार ९०५ इतके आहे. अमरावती विभागामधून १ लाख ४४ हजार २३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ५९९ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले तर ७५ टक्क्यांपेक्षा १२ हजार ४०८ विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळाले. नाशिक विभागातील १५६ विद्यार्थ्यांना तर लातूर विभागातील २५९ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. .............५२ हजार विद्यार्थी ४५ टक्क्यांच्या आतराज्यातील ५२ हजार ६६० विद्यार्थ्यांना ३५ ते ४५ टक्क्यांच्या दरम्यान मिळाले आहेत. ४५ ते ६० टकक्क्यांच्या दरम्यान ५ लाख ६७ हजार ८५३ विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहेत.

टॅग्स :PuneपुणेHSC Result 2018बारावी निकाल २०१८educationशैक्षणिकStudentविद्यार्थी