शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Maharashtra HSC result 2018 : गुणांच्या स्पर्धेत मुंबईने टाकले सगळयांना मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 15:51 IST

राज्यमंडळाने गेल्या काही वर्षांपासून राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे बंद केले आहे. मात्र ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची विभागनिहाय संख्या मंडळाकडून जाहीर करण्यात आली

ठळक मुद्दे९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण : तब्बल ५ हजार ४८६ विद्यार्थ्यांची बाजी

पुणे : महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेत राज्यभरातून ५ हजार ४८६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत, यामध्ये सर्वाधिक २ हजार २८८ विद्यार्थी एकटया मुंबई विभागाचे आहेत. त्यामुळे यंदा मुंबईच्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण मिळविण्यामध्ये सगळया विभागांना मागे टाकले आहे.  राज्य मंडळाचा बारावीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. राज्यमंडळाने गेल्या काही वर्षांपासून राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे बंद केले आहे. मात्र ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची विभागनिहाय संख्या मंडळाकडून जाहीर करण्यात आली.मुंबई विभागातून ३ लाख ११ हजार ६५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २ हजार २८८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. त्याचबरोबर ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून ३८ हजार २१४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.  पुणे विभागातून २ लाख ३५ हजार ५०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७०० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. ७५टक्क्यांपेक्षा जास्त गूण मिळालेले २० हजार ८७० विद्यार्थी आहेत.  नागपूर विभागामधून १ लाख ६४ हजार ६२७ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत बसले होते. यातील १ लाख ४४ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी ६९८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गूण मिळविणाऱ्यांचे प्रमाण १० हजार ३०२ इतके आहे.औरंगाबाद विभागामधून  १ लाख ५९ हजार ०८६ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. यापैकी २९४ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले तर १६ हजार ०१६ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गूण मिळाले. कोल्हापूर विभागामधून १ लाख २५ हजार ६४८विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३५० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गूण मिळविणाऱ्यांचे प्रमाण ८ हजार ९०५ इतके आहे. अमरावती विभागामधून १ लाख ४४ हजार २३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ५९९ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले तर ७५ टक्क्यांपेक्षा १२ हजार ४०८ विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळाले. नाशिक विभागातील १५६ विद्यार्थ्यांना तर लातूर विभागातील २५९ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. .............५२ हजार विद्यार्थी ४५ टक्क्यांच्या आतराज्यातील ५२ हजार ६६० विद्यार्थ्यांना ३५ ते ४५ टक्क्यांच्या दरम्यान मिळाले आहेत. ४५ ते ६० टकक्क्यांच्या दरम्यान ५ लाख ६७ हजार ८५३ विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहेत.

टॅग्स :PuneपुणेHSC Result 2018बारावी निकाल २०१८educationशैक्षणिकStudentविद्यार्थी