शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ट्रेकिंगसाठी राजगड किल्ल्यावर गेलेल्या औरंगाबादमधील युवकाचा हृदयविकाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 13:49 IST

वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्यावर सुट्टीनिमित्त ट्रेकिंगसाठी आलेल्या गणेश दुगार्दास देशमुख (वय २८) या युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देशवविच्छेदन करुन औरंगाबाद येथील मूळ घरी पाठविण्यात आला मृतदेहराजगड किल्ल्यावर चढताना अचानक गणेशच्या छातीत दुखायला लागले

वेल्हे : वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्यावर सुट्टीनिमित्त ट्रेकिंगसाठी आलेल्या गणेश दुगार्दास देशमुख (वय २८, सध्या रा. वारजे, मूळ रा. औरंगाबाद) या युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भोर उपजिल्हा रुग्णालयात युवकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन औरंगाबाद येथील मूळ घरी पाठविण्यात आला.याबाबत वेल्हे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी पुण्यातून गणेश देशमुख हा मित्रांसह आला होता. रविवारी दुपारी २च्या सुमारास किल्ल्यावर चढताना अचानक गणेशच्या छातीत दुखायला लागले. मित्रांनी गणेशला पायथ्याशी आणले मात्र हदयविकाराचा झटका आल्याने तो बेशुद्ध पडला. मित्रांनी १०८ क्रमांकाला फोन करुन वेल्ह्यातून रुग्णवाहिका मागवून वेल्हे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वेल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमार यांनी युवक मृत झाल्याचे घोषित केले. वेल्हे पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. भोर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेAurangabadऔरंगाबाद