शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पृथ्वीवर जन्माला येऊन आपण चूक केलीय! अतुल कुलकर्णींचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 17:00 IST

वडाच्या झाडाखाली निसर्गशाळा पुस्तकाचे प्रकाशन...

पुणे : आपण पृथ्वीवर जन्माला येऊन चूक केली आहे. कारण येथील सर्व पर्यावरण आपण नष्ट करीत जात आहोत. जे घेत आहोत, त्या प्रमाणात आपण देत नाही. नुसतं घेत आहोत. आता आपण केलेली चूक पुढच्या पिढीला भोगावी लागणार आहे. म्हणून त्यांना निसर्ग शिक्षण देऊन संवर्धनासाठी प्रयत्न करायला हवा, असे आवाहन अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी केले.

शिक्षक-पालक यांच्याकरिता तयार केलेल्या निसर्गशाळा या मार्गदर्शक पुस्तक संचाचे प्रकाशन कुलकर्णी यांच्या हस्ते रविवारी भांडारकर संस्थेत झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एमकेसीएलचे संचालक विवेक सावंत होते. आयकाॅस संस्थेच्या केतकी घाटे, मानसी करंदीकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. ग्राममंगल संस्थेच्या सहयोगाने आणि डायमंड प्रकाशनाने ते प्रकाशित केले. ग्राममंगलच्या प्राची नातू उपस्थित होते. केतकी घाटे व मानसी करंदीकर यांनी आपल्या २० वर्षांतील पर्यावरणविषयक कामाचा आढावा घेतला.

अतुल कुलकर्णी म्हणाले, निसर्गावर पुस्तक लिहून चालणार नाही. तसेच केवळ शिक्षकही चालणार नाहीत. कारण निसर्गशिक्षणासाठी पॅशन असलेली माणसं हवीत. पालक, स्वयंसेवक हवीत. अन्यथा पुस्तकं तर धूळ खात पडलेली आहेतच. त्यात आणखी याची भर पडेल. निसर्ग संवर्धनाचे पॅशनचे मिशन व्हायला हवं.

निसर्गावरचं प्रेम काय आहे हो? प्रथम निसर्गप्रेमींनी जंगलात जायचे थांबविले पाहिजे. जर एखादा पेशंट आयसीयूमध्ये असेल, तर आपण तिथे बाहेर थांबून कोणाला आत सोडत नाही. तसेच निसर्गात न जाता शहरातील लोकांना पर्यावरणाचे शिक्षण देण्यासाठी काम केले पाहिजे. केवळ निसर्गात फोटो काढणं म्हणजे निसर्गप्रेम नव्हे, निसर्गात कोणाला जाऊ न देणे म्हणजे निसर्गप्रेम होय, असेही अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.

विवेक सावंत म्हणाले, शाळा निसर्गासारखी हवी. निसर्ग हीच शाळा भविष्यात असेल. हे पुस्तक भिंतीची शाळा पाडून टाकणार आहे. शिक्षणाचे उद्दिष्ट माणूस घडविणं आहे. आता पर्यावरणावर अरिष्ट आलंय. ग्रेटाचे ऐकून एक कोटी मुलांनी शाळा सोडली आहे. शिक्षणाचे उद्दिष्ट हवं की आम्ही निसर्गावर आक्रमण करणार नाही. शोषण करणार नाही तर त्याचे दोहन करणार. ज्ञानासाठी कृती करावी लागते. कृती करणं आवश्यक आहे. शिक्षणशास्त्री लोकांसाठी हे पुस्तक म्हणजे निसर्गाचा वास्तुपाठ आहे.

कोडिंग कोडिंग करत बसू नका !

सध्या निसर्गविषयक बुद्धिमत्ता निर्माण व्हायला हवी. कारण हवामान बदलावर आपल्याला विजय मिळवायचा आहे, अन्यथा त्याची किंमत चुकवावी लागेल. या आपत्तीमधून बाहेर पडण्यासाठी भविष्यात ग्रीन काॅलर जाॅब निर्माण होतील. त्यामुळे त्यासाठी काम करायला हवे. केवळ कोडिंग कोडिंग करीत बसू नये, असे सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAtul Kulkarniअतुल कुलकर्णी