शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

पृथ्वीवर जन्माला येऊन आपण चूक केलीय! अतुल कुलकर्णींचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 17:00 IST

वडाच्या झाडाखाली निसर्गशाळा पुस्तकाचे प्रकाशन...

पुणे : आपण पृथ्वीवर जन्माला येऊन चूक केली आहे. कारण येथील सर्व पर्यावरण आपण नष्ट करीत जात आहोत. जे घेत आहोत, त्या प्रमाणात आपण देत नाही. नुसतं घेत आहोत. आता आपण केलेली चूक पुढच्या पिढीला भोगावी लागणार आहे. म्हणून त्यांना निसर्ग शिक्षण देऊन संवर्धनासाठी प्रयत्न करायला हवा, असे आवाहन अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी केले.

शिक्षक-पालक यांच्याकरिता तयार केलेल्या निसर्गशाळा या मार्गदर्शक पुस्तक संचाचे प्रकाशन कुलकर्णी यांच्या हस्ते रविवारी भांडारकर संस्थेत झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एमकेसीएलचे संचालक विवेक सावंत होते. आयकाॅस संस्थेच्या केतकी घाटे, मानसी करंदीकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. ग्राममंगल संस्थेच्या सहयोगाने आणि डायमंड प्रकाशनाने ते प्रकाशित केले. ग्राममंगलच्या प्राची नातू उपस्थित होते. केतकी घाटे व मानसी करंदीकर यांनी आपल्या २० वर्षांतील पर्यावरणविषयक कामाचा आढावा घेतला.

अतुल कुलकर्णी म्हणाले, निसर्गावर पुस्तक लिहून चालणार नाही. तसेच केवळ शिक्षकही चालणार नाहीत. कारण निसर्गशिक्षणासाठी पॅशन असलेली माणसं हवीत. पालक, स्वयंसेवक हवीत. अन्यथा पुस्तकं तर धूळ खात पडलेली आहेतच. त्यात आणखी याची भर पडेल. निसर्ग संवर्धनाचे पॅशनचे मिशन व्हायला हवं.

निसर्गावरचं प्रेम काय आहे हो? प्रथम निसर्गप्रेमींनी जंगलात जायचे थांबविले पाहिजे. जर एखादा पेशंट आयसीयूमध्ये असेल, तर आपण तिथे बाहेर थांबून कोणाला आत सोडत नाही. तसेच निसर्गात न जाता शहरातील लोकांना पर्यावरणाचे शिक्षण देण्यासाठी काम केले पाहिजे. केवळ निसर्गात फोटो काढणं म्हणजे निसर्गप्रेम नव्हे, निसर्गात कोणाला जाऊ न देणे म्हणजे निसर्गप्रेम होय, असेही अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.

विवेक सावंत म्हणाले, शाळा निसर्गासारखी हवी. निसर्ग हीच शाळा भविष्यात असेल. हे पुस्तक भिंतीची शाळा पाडून टाकणार आहे. शिक्षणाचे उद्दिष्ट माणूस घडविणं आहे. आता पर्यावरणावर अरिष्ट आलंय. ग्रेटाचे ऐकून एक कोटी मुलांनी शाळा सोडली आहे. शिक्षणाचे उद्दिष्ट हवं की आम्ही निसर्गावर आक्रमण करणार नाही. शोषण करणार नाही तर त्याचे दोहन करणार. ज्ञानासाठी कृती करावी लागते. कृती करणं आवश्यक आहे. शिक्षणशास्त्री लोकांसाठी हे पुस्तक म्हणजे निसर्गाचा वास्तुपाठ आहे.

कोडिंग कोडिंग करत बसू नका !

सध्या निसर्गविषयक बुद्धिमत्ता निर्माण व्हायला हवी. कारण हवामान बदलावर आपल्याला विजय मिळवायचा आहे, अन्यथा त्याची किंमत चुकवावी लागेल. या आपत्तीमधून बाहेर पडण्यासाठी भविष्यात ग्रीन काॅलर जाॅब निर्माण होतील. त्यामुळे त्यासाठी काम करायला हवे. केवळ कोडिंग कोडिंग करीत बसू नये, असे सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAtul Kulkarniअतुल कुलकर्णी