न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

By Admin | Updated: November 30, 2015 01:57 IST2015-11-30T01:57:59+5:302015-11-30T01:57:59+5:30

जिल्ह्यातील चार धरणांमधून सोलापूरमधील उजनी धरणात १० टीमएसी पाणी सोडण्याचा आदेश कायम ठेवत तत्काळ पाणी सोडण्याच्या सक्त सूचना जलसंपत्ती प्राधिकरणाने दिल्या आहेत

Attention to the court's decision | न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

पुणे : जिल्ह्यातील चार धरणांमधून सोलापूरमधील उजनी धरणात १० टीमएसी पाणी सोडण्याचा आदेश कायम ठेवत तत्काळ पाणी सोडण्याच्या सक्त सूचना जलसंपत्ती प्राधिकरणाने दिल्या आहेत. त्यामुळे आता सोमवारी ३0 नोव्हेंबरला होणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
२६ आॅक्टोबर रोजी प्राधिकरणाने चासकमान, भामा आसखेड, मुळशी, आंद्रा या धरणांतून १0 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले होते. धरणांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याबरोबरच, ‘रास्तो रोका’ आंदोलनेही झाली. प्राधिकरणाकडे पुनर्विचार याचिका दाखल झाल्या. यावर प्राधिकरणाने आपला आदेश कायम ठेवला. त्यानंतर काही लोकप्रतिनिधी उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने वरील निर्णयाला स्थगिती न देता, ३0 नोव्हेंबरला पुढील सुनावणी ठेवली आहे. दरम्यान, २६ नोव्हेंबर रोजी प्राधिकरणाने तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, दोन दिवस शनिवार व रविवारच्या सुट्या असल्याने पाणी सोडले गेले नाही; तसेच न्यायालयाचा निर्णयही बाकी होता. आता उद्या न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून आहेत. जर न्यायालयाने पाणी सोडण्याचा निर्णय कायम ठेवला, तर मात्र प्रशासनाला तत्काळ पाणी सोडावे लागणार आहे. याचा सर्वाधिक फटका चासकमानच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना बसणार आहे.(प्रतिनिधी)
मुळशी हे धरण टाटांच्या मालकीचे आहे. यातील मुळशीकरांसाठी ३४ दलघमी पाणी राखीव आहे. यात यंदा पाऊस कमी पडल्याने फक्त ३0 दलघमी पाणी मुळशीच्या वाट्याला आले आहे. यातील २६ दलघमी पाणी सोडले, तर फक्त ४ दलघमी पाणी मुळशीकरांना शिल्लक राहणार आहे. यात २0११च्या जनगणनेनुसार १ लाख ७३ हजार लोकसंख्या व त्यानंतर वाढलेली धरून ३ लाख लोकसंख्या आहे. ३५ हजार जनावरे आहेत. त्यांच्यासाठी चारापिके आहेत.
ऊस वगळता, ३३ हेक्टरवर रब्बी पीक आहे. याच्यासाठी फक्त ४ दलघमी पाणी कसे पुरणार, असा सवाल मुळशी पंचायत समितीचे सभापती रवींद्र कंधारे यांनी केला. आमच्या तोंडचे काढून सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडले जाणार आहे. पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगांसाठी हा पाण्याचा क्रम आहे. मग, मुळशी धरणावरील वीजनिर्मिती हे उद्योगात येते. मग त्यातील पाणी सोडा. मुळशीकरांच्या तोंडचे पाणी का पळवताय, असा सवालही शेतकरी करीत आहेत.

Web Title: Attention to the court's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.