शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पुण्यात झाला होता गांधीजींवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 11:50 IST

असे वाचले होते गांधीजी....

जुलै १९३२ मध्ये महात्मा गांधी हरिजनमुक्ती प्रचारासाठी म्हणून पुण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन पुणे नगरपालिकेने त्यांना मानपत्र देण्याचे ठरवले. त्याला विरोध करण्यात आला. काँग्रेसचे पुण्यातील पुढारी काकासाहेब गाडगीळ यांनी विरोधकांशी बौलून कसाबसा हा विरोध शमवला. मानपत्राचा ठराव मंजूर झाला. ९ जुुलैला गांधीजी पुण्यात आले. सोमवार ११ जुलैला पालिकेच्या त्यावेळच्या विश्रामबागवाडा येथील कार्यालयातील सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सभागृहात गर्दी झाली होती. बरोबर ६ वाजून २० मिनिटांनी एक गाडी कार्यालयासमोर आली. तिच्यातील व्यक्ती गाडीतून उतरताच कोणीतरी वरून एक बॉम्ब फेकला. सुदैवाने ती गाडी पुण्यातील त्यावेळचे एक नेते भोपटकर यांची होती. वाकडेवाडी फाट्यावर रेल्वेफाटक बंद असल्यामुळे गांधीजींच्या गाडीला थोडा विलंब होणार होता. भोपटकर त्यात जखमी झाले. गाडगीळ यांनी खाली झालेल्या बॉम्बस्फोटाची माहिती वर बसलेल्या गर्दीत जाऊ दिली नाही. पंधरा मिनिटांतच गांधीजींची गाडी आली. गाडगीळ यांनी पोलिसांना सांगून त्यांच्याभोवती कडे केले व त्यांना सभागृहात नेले. जाताना गांधीजींना काय झाले, याची माहिती दिली. ते समजल्यानंतरही गांधीजींनी पंधरा मिनिटे शांतपणे भाषण केले. मानपत्राचा करंडक जास्तीत जास्त पैशांना विकत घ्या, काकांना त्यात कमिशन मिळेल, असा विनोदही केली. कार्यक्रम संपल्यानंतर तिथून रवाना होताना त्यांनी काकासाहेबांना तसेच पोलिसांनाही ‘हल्लेखोर सापडले तर मी त्यांना क्षमा केली आहे,’ असा माझा निरोप द्या, असे सांगितले. 

..........

संदर्भ- पथिक, भाग १ प्रकरण ११, पान क्रमांक २८६ लेखक : काकासाहेब गाडगीळ

टॅग्स :PuneपुणेMahatma Gandhiमहात्मा गांधी