शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सैफवर हल्ला ही वस्तूस्थिती; कायदा सुव्यवस्था बिघडली बोलणाऱ्यांनी भान ठेवून बोलावे - दादा भुसे

By राजू इनामदार | Updated: January 17, 2025 18:32 IST

राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असे एका घटनेने म्हणता येणार नाही

पुणे: सैफ अली खान या अभिेनेत्यावर हल्ला झाला ही वस्तुस्थिती आहे, पण याचा अर्थ लगेचच कायदा व सुव्यवस्था बिघडली असे म्हणता येणार नाही. असे बोलणाऱ्याने थोडे आपल्या जबाबदारीचे भान ठेवून बोलावे अशी टीका शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी केली. महापालिका निवडणुक कधीही झाली तरी शिवसेना त्यासाठी तयार आहे असे ते म्हणाले.

शिक्षण संचालकांच्या बैठकीसाठी म्हणून मंत्री भुसे शुक्रवारी पुण्यात आले होते. बैठकीनंतर त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळा क्रमांक ५२ ला भेट दिली. तेथील मुलांनी गाणे गाऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पुण्यात पत्रकारांबरोबर बोलताना भुसे यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असे एका घटनेने म्हणता येणार नाही असे मत व्यक्त केले. घटना घडली, त्याचा तपास सुरू आहे, पोलिस शोध घेत आहेत, कारणे पहात आहेत. मुंबई हे राज्यातील व देशातील महत्वाचे शहर आहे. पोलिस तपासाआधीच राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असे बोलणाऱ्यांनी या शहराच्या महत्वाचे थोडे भान ठेवावे असे ते म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील स्मारकासंबधीच्या समितीवरून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना काढून टाकण्याची मागणी शिंदेसेनेकडून झाली होती, याबाबत विचारले असता भुसे यांनी यावर बोलणे टाळले.

महापालिका निवडणुकीचे तुमचे काय नियोजन यावर भुसे यांनी सांगितले की शिवसैनिक कोणत्याही निवणुकीसाठी कधीही तयार असतो. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या शिकवणुकीनुसार ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण अशीच आमची भूमिका आहे. बोगस शाळांवर आम्ही नक्की कारवाई करू. सीबीएससी पॅटर्न मराठी शाळांमध्ये आणण्याचे नियोजन सुरू आहे. १० वी, १२ वी परिक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत असे ते म्हणाले. खासगी शाळा असल्या तरीही त्यांच्या फि वर काहीतरी मर्यादा ही हवीच असेही भूसे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSaif Ali Khanसैफ अली खान ministerमंत्रीMahayutiमहायुतीShiv SenaशिवसेनाPoliceपोलिसCourtन्यायालय