शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

जेएनयूवरील हल्ला अभाविपने केलेला नाही; पुरावे असतील समोर आणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 20:44 IST

विद्यापीठांमध्ये जर कुणी असे हल्ले करीत असेल तर त्याची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी चौकशी करावी.

ठळक मुद्दे अभाविपच्या पुणे महानगरमंत्रीचे स्पष्टीकरणज्या विद्यार्थ्यांवर हल्ला झाला आहे. त्यातील २५ विद्यार्थी हे अभाविपचे

पुणे : जेएनयूवरील हल्ला हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलेला नाही. जर केला असेल तर त्याचे पुरावे द्यावेत आणि ते दिल्यास न्यायालयासमोर त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल, अशा रोखठोक शब्दांत अभाविपचे पुणे महानगरमंत्री अनिल ठोंबरे यांनी विरोधकांना सुनावले.जेएनयूवरील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यात अभाविपचा सहभाग असल्याचा आरोप केला जातोय. एफटीआयआयच्या विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यानेही सात वर्षांपूर्वी एका लघुपटाच्या स्क्रिनिंगवरून विद्यार्थ्यांवर हल्लाबोल केला होता, याचा पुनरूच्चार केला आहे. यापार्श्वभूमीवर अनिल ठोंबरे यांच्याशी 'लोकमत'ने संवाद साधला असता ते म्हणाले २०१३ मधला संदर्भ जर एफटीआयआयचे विद्यार्थी देत असतील तर पश्चिम बंगाल, केरळ, त्रिपुरा राज्यांमध्ये रोज ज्या घटना घडत आहेत. २०१७ मध्ये पश्चिम बंगालमधल्या अभाविपच्या हल्ले केले गेले.  केरळमध्ये त्यांचा मुख्यमंत्री ज्या मतदारसंघात निवडून आला तिथेही अभाविपच्या कार्यकर्त्यावर हल्लाकार्यकर्त्यांवर  झाला. आज जेएनयूमध्ये आमच्या राष्ट्रीय मंत्री असलेल्या विद्यार्थ्यांवर देखील हल्ला झाला आहे. त्याचे पुरावे देखील आहेत. हिंसाचार करण्याची वृत्ती कुणाची राहिली आहे. हे सर्वांना माहिती आहे. आपल्या देशाने माओवाद, नक्षलवाद कधीही स्वीकारलेला नाहीये. त्याला समर्थन करणारे कोण आहेत हे सर्वजण जाणतात. मुळात जेएनयूवरील हल्ला हा पूर्वनियोजित होता. डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी आणि संघटनेच्या अध्यक्षा आयिशा घोष यांच्यासह ३५० कार्यकर्ते व अभाविपचे कार्यकर्ते हॉस्टेलच्या कँम्प्सबाहेर  होते. त्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. विद्यापीठांमध्ये जर कुणी असे हल्ले करीत असेल तर त्याची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी चौकशी करावी. या पूर्वनियोजित कटामध्ये जो कुणी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी. एखादा विशिष्ट अजेंडा घेऊन विद्यापीठांमध्ये हिंसाचार करणे हा त्यांचा एकमेव हेतू आहे. ज्या विद्यार्थ्यांवर हल्ला झाला आहे. त्यातील जे विद्यार्थी एम्स रूग्णालयात अ‍ॅडमिट आहेत. त्यातील २५ विद्यार्थी हे अभाविपचे आहेत. याची चौकशीही करू शकता. त्यामुळे हल्ला करण्याची चौकशी कुणाची राहिली आहे. याची चौकशी करावी आणि त्याची पाळमुळं शोधून काढावी. अभाविप बद्दल न्यायालयासमोर पुरावे आलेले नाहीत किंवा पोलिसांनी रिपोर्ट दिलेला नाहीये. त्यामुळे अभाविपचे नाव घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे ठोंबरे यांनी स्पष्टपणे सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेjnu attackजेएनयू