शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

दुष्काळी ४० तालुक्यांसाठी केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 20:52 IST

रविवारी उपमुख्यमंत्री  पवार बारामतीत उपस्थित होते.

बारामतीराज्यात  ४० तालुक्यांमध्ये  दुष्काळ जाहीर कऱण्यात आला आहे. यासाठी केंद्राकडे पाठवलेला  निधी प्रस्ताव मंजूर झाल्यावर भरीव मदत होईल. याशिवाय  दुष्काळसद्रुश्य स्थीती  असणाऱ्याइतर  तालुक्यात राज्य शासनाकडून मदत दिली जाणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

रविवारी उपमुख्यमंत्री  पवार बारामतीत उपस्थित होते. यावेळी  पत्रकारांशी बोलताना  पवार म्हणाले, बारामती तालुक्यातही यंदा पाऊस झालेला नाही. परिणामी तालुका निकषानुसार दुष्काळी तालुक्यांच्या यादीत गेला. तो घातला गेलेला नाही. या ४० तालुक्यांच्या व्यतिरिक्त जे तालुके यादीत दुष्काळी गावांच्या यादीत आले नाहीत, तेथेही परिस्थिती भिषण रुप घेते आहे.  महसूलमंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, ग्रामविकास मंत्री, जलसंपदा मंत्री यांची त्यासाठी समिती आहे. त्यांनी बैठक घेवून  हजारो मंडलांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. तेथेही सवलती दिल्या जातील ,असे पवार म्हणाले.

राज्यात दूधाचे दर कोसळले आहेत. बारामती दौऱयावर येथील दूध संघाचे पदाधिकारी मला भेटून गेले. यापूर्वी अशी स्थिती निर्माण झाली असताना अनुदान दिले गेले होते. आता दुष्काळी स्थितीत हिरवा चारा, खुराक, पशुखाद्य हा खर्च वाढला आहे. त्यामुळे सरकारने पुढाकार घेत मदत करावी अशी शेतकऱयांची मागणी आहे. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधितांची यासाठी बैठक घेतली होती. परंतु त्यातून मार्ग निघालेला नाही. आता मंगळवारी यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू,असे उपमुख्यमंत्री   पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लोकसभा निवडणूकीसाठी जागा वाटपाचा फाॅर्म्यूला ठरला असल्याचे सांगितले आहे, या पत्रकारांच्या प्रश्नावर पवार यांनी , मी यासंबंधी काहीही स्टेटमेंट करू इच्छित नसल्याचे  सांगितले. राज्यात मराठा, अोबीसी आरक्षणावरून समाजात तेढ निर्माण होत असल्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची घडी बसवली. त्यानंतर अनेकांनी या राज्याला पुढे नेले. आता विकासाचे प्रश्न बाजूला पडले आहेत.  रोज वेगवेगळे नेतेगण, प्रवक्ते, मान्यवर, राजकीय पदाधिकारी, सत्ताधारी, विरोधक बोलत आहेत.  समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी असे वक्तव्य कोणीही करु नये. प्रत्येकाने आपापली भूमिका मांडावी. आपल्या मागण्या सरकारकडे मांडाव्यात. सरकार त्यात लक्ष घालेल,असे पवार म्हणाले. 

माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूरात ऊस दर आंदोलन ऊभे केले होते. परंतु तेथील निर्णय झालेला आहे. काही अंशी तोडगा निघाला आहे. मी यासंबंधी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह तेथील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह साखर आयुक्तांशी चर्चा केल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले . 

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवार