शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

दुष्काळी ४० तालुक्यांसाठी केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 20:52 IST

रविवारी उपमुख्यमंत्री  पवार बारामतीत उपस्थित होते.

बारामतीराज्यात  ४० तालुक्यांमध्ये  दुष्काळ जाहीर कऱण्यात आला आहे. यासाठी केंद्राकडे पाठवलेला  निधी प्रस्ताव मंजूर झाल्यावर भरीव मदत होईल. याशिवाय  दुष्काळसद्रुश्य स्थीती  असणाऱ्याइतर  तालुक्यात राज्य शासनाकडून मदत दिली जाणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

रविवारी उपमुख्यमंत्री  पवार बारामतीत उपस्थित होते. यावेळी  पत्रकारांशी बोलताना  पवार म्हणाले, बारामती तालुक्यातही यंदा पाऊस झालेला नाही. परिणामी तालुका निकषानुसार दुष्काळी तालुक्यांच्या यादीत गेला. तो घातला गेलेला नाही. या ४० तालुक्यांच्या व्यतिरिक्त जे तालुके यादीत दुष्काळी गावांच्या यादीत आले नाहीत, तेथेही परिस्थिती भिषण रुप घेते आहे.  महसूलमंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, ग्रामविकास मंत्री, जलसंपदा मंत्री यांची त्यासाठी समिती आहे. त्यांनी बैठक घेवून  हजारो मंडलांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. तेथेही सवलती दिल्या जातील ,असे पवार म्हणाले.

राज्यात दूधाचे दर कोसळले आहेत. बारामती दौऱयावर येथील दूध संघाचे पदाधिकारी मला भेटून गेले. यापूर्वी अशी स्थिती निर्माण झाली असताना अनुदान दिले गेले होते. आता दुष्काळी स्थितीत हिरवा चारा, खुराक, पशुखाद्य हा खर्च वाढला आहे. त्यामुळे सरकारने पुढाकार घेत मदत करावी अशी शेतकऱयांची मागणी आहे. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधितांची यासाठी बैठक घेतली होती. परंतु त्यातून मार्ग निघालेला नाही. आता मंगळवारी यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू,असे उपमुख्यमंत्री   पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लोकसभा निवडणूकीसाठी जागा वाटपाचा फाॅर्म्यूला ठरला असल्याचे सांगितले आहे, या पत्रकारांच्या प्रश्नावर पवार यांनी , मी यासंबंधी काहीही स्टेटमेंट करू इच्छित नसल्याचे  सांगितले. राज्यात मराठा, अोबीसी आरक्षणावरून समाजात तेढ निर्माण होत असल्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची घडी बसवली. त्यानंतर अनेकांनी या राज्याला पुढे नेले. आता विकासाचे प्रश्न बाजूला पडले आहेत.  रोज वेगवेगळे नेतेगण, प्रवक्ते, मान्यवर, राजकीय पदाधिकारी, सत्ताधारी, विरोधक बोलत आहेत.  समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी असे वक्तव्य कोणीही करु नये. प्रत्येकाने आपापली भूमिका मांडावी. आपल्या मागण्या सरकारकडे मांडाव्यात. सरकार त्यात लक्ष घालेल,असे पवार म्हणाले. 

माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूरात ऊस दर आंदोलन ऊभे केले होते. परंतु तेथील निर्णय झालेला आहे. काही अंशी तोडगा निघाला आहे. मी यासंबंधी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह तेथील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह साखर आयुक्तांशी चर्चा केल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले . 

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवार