शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

दुष्काळी ४० तालुक्यांसाठी केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 20:52 IST

रविवारी उपमुख्यमंत्री  पवार बारामतीत उपस्थित होते.

बारामतीराज्यात  ४० तालुक्यांमध्ये  दुष्काळ जाहीर कऱण्यात आला आहे. यासाठी केंद्राकडे पाठवलेला  निधी प्रस्ताव मंजूर झाल्यावर भरीव मदत होईल. याशिवाय  दुष्काळसद्रुश्य स्थीती  असणाऱ्याइतर  तालुक्यात राज्य शासनाकडून मदत दिली जाणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

रविवारी उपमुख्यमंत्री  पवार बारामतीत उपस्थित होते. यावेळी  पत्रकारांशी बोलताना  पवार म्हणाले, बारामती तालुक्यातही यंदा पाऊस झालेला नाही. परिणामी तालुका निकषानुसार दुष्काळी तालुक्यांच्या यादीत गेला. तो घातला गेलेला नाही. या ४० तालुक्यांच्या व्यतिरिक्त जे तालुके यादीत दुष्काळी गावांच्या यादीत आले नाहीत, तेथेही परिस्थिती भिषण रुप घेते आहे.  महसूलमंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, ग्रामविकास मंत्री, जलसंपदा मंत्री यांची त्यासाठी समिती आहे. त्यांनी बैठक घेवून  हजारो मंडलांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. तेथेही सवलती दिल्या जातील ,असे पवार म्हणाले.

राज्यात दूधाचे दर कोसळले आहेत. बारामती दौऱयावर येथील दूध संघाचे पदाधिकारी मला भेटून गेले. यापूर्वी अशी स्थिती निर्माण झाली असताना अनुदान दिले गेले होते. आता दुष्काळी स्थितीत हिरवा चारा, खुराक, पशुखाद्य हा खर्च वाढला आहे. त्यामुळे सरकारने पुढाकार घेत मदत करावी अशी शेतकऱयांची मागणी आहे. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधितांची यासाठी बैठक घेतली होती. परंतु त्यातून मार्ग निघालेला नाही. आता मंगळवारी यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू,असे उपमुख्यमंत्री   पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लोकसभा निवडणूकीसाठी जागा वाटपाचा फाॅर्म्यूला ठरला असल्याचे सांगितले आहे, या पत्रकारांच्या प्रश्नावर पवार यांनी , मी यासंबंधी काहीही स्टेटमेंट करू इच्छित नसल्याचे  सांगितले. राज्यात मराठा, अोबीसी आरक्षणावरून समाजात तेढ निर्माण होत असल्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची घडी बसवली. त्यानंतर अनेकांनी या राज्याला पुढे नेले. आता विकासाचे प्रश्न बाजूला पडले आहेत.  रोज वेगवेगळे नेतेगण, प्रवक्ते, मान्यवर, राजकीय पदाधिकारी, सत्ताधारी, विरोधक बोलत आहेत.  समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी असे वक्तव्य कोणीही करु नये. प्रत्येकाने आपापली भूमिका मांडावी. आपल्या मागण्या सरकारकडे मांडाव्यात. सरकार त्यात लक्ष घालेल,असे पवार म्हणाले. 

माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूरात ऊस दर आंदोलन ऊभे केले होते. परंतु तेथील निर्णय झालेला आहे. काही अंशी तोडगा निघाला आहे. मी यासंबंधी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह तेथील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह साखर आयुक्तांशी चर्चा केल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले . 

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवार