शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या राम मंदिर परिसराच्या विकासासाठी ‘बड्या’ कुटुंबाची विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिराचा खर्च किती असावा याचा विचार आम्ही केलेला नाही. माझा स्वतःचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिराचा खर्च किती असावा याचा विचार आम्ही केलेला नाही. माझा स्वतःचा अंदाज असा आहे की मंदिराच्या आतील बाजूच्या कामासाठी सुमारे ३०० ते ४०० कोटी खर्च होईल. मंदिर परिसराच्या विकासासाठी अंदाजे अकराशे कोटी रुपये लागू शकतात,” असा अंदाज श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी सांगितले.

अयोध्या परिसराच्या विकासासाठी एका ‘बड्या’ कुटुंबाने विचारणा केली होती. मात्र हे नाव मी जाहीर करणार नाही, असे सांगून त्यांनी यासंंबंधी मौन पाळले. गुुरवारी (दि. ३१) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशातील सामान्य व्यक्तीला देखील मंदिरासाठी दान करता यावे, त्याच्या दानातून मंदिर उभारले जावे. ही बाब सामान्य व्यक्तीच्या रामभक्तीला समाधान देणारी आहे. मंदिरासाठी जनतेकडून दान स्विकारण्याचा मूळ हेतू हाच आहे, असे स्वामी गोविंददेव यांनी सांगितले. विश्व हिंदू परिषदेचे मुंबई प्रदेश मंत्री शंकर गायकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव , प्रांत अभियान प्रमुख संजय मुदराळे , प्रांत अभियान सहप्रमुख मिलींद देशपांडे , शहर अभियान सहप्रमुख महेश पोहनेरकर यावेळी उपस्थित होते.

स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले की, अयोध्या मंदिरासाठी येत्या मकर संक्रांतीपासून माघ पौर्णिमेपर्यंत (दि. १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी) निधी संकलन केले जाणार आहे. यासाठी एक हजार रुपये, शंभर रुपये आणि दहा रुपयांची कुपन छापली आहे. एकूण ५०० कोटी रुपयांची ही कुपन छापलेली आहेत. या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यातील १० हजार गावातील ५० लाख कुटुंबांपर्यत पोहचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी दोन हजार संत आणि ५० हजारांहुन अधिक स्वयंसेवक कार्य करणार आहेत.

मंदिरासाठी केंद्र सरकार निधी देणार नसून सर्वसामान्य नागरिकांकडून हा निधी गोळा केला जात आहे. परदेशी निधी घेण्याची परवानगी सध्या नाही. ती मिळाल्यास परदेशातील भक्तांचा निधी स्वीकारला जाईल. या अभियानातून अंदाजे हजार ते अकराशे कोटी रुपयांचा निधी जमा होण्याचा अंदाज स्वामी गोविंददेव गिरी यांनी वर्तविला.