शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

मोदींच्या योजना भुलवण्यासाठीच - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 01:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त लोकांना भुलवण्यासाठी म्हणूनच योजना जाहीर करतात. बोललेले काहीही त्यांना करून दाखवता आलेले नाही. त्यामुळे आता या वेळी कितीही आश्वासने दिली तरी त्यावर मतदार विश्वास ठेवणार नाहीत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त लोकांना भुलवण्यासाठी म्हणूनच योजना जाहीर करतात. बोललेले काहीही त्यांना करून दाखवता आलेले नाही. त्यामुळे आता या वेळी कितीही आश्वासने दिली तरी त्यावर मतदार विश्वास ठेवणार नाहीत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. पुणेकरांचीही भारतीय जनता पार्टीने फसवणूकच केली आहे. असे ते म्हणाले.निवडणूक जाहीर होण्याआधीच काँग्रेसच्या वतीने राज्यात ५० सभा घेण्यात येणार असून त्यातील पहिली सभा शुक्रवारी सायंकाळी पुण्यात झाली. भवानी पेठेत झालेल्या या सभेला माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब शिवरकर, अरविंद शिंदे तसेच पक्षाचे अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते.उन्हाळ्याच्या आधीच पुण्यात पाणीटंचाई सुरू झाली, अशी टीका करून चव्हाण म्हणाले, ‘‘पालकमंत्र्यांनी नियोजन केले नाही; त्यामुळे पाणी कमी झाले व त्यांच्याच म्हणजे भाजपाच्या खासदारावर उपोषणाला बसण्याची वेळ आली होती. हेल्मेट सक्तीमुळे पुणेकर हैराण झाले आहेत; मात्र त्यावर पालकमंत्री आणि आमदार, खासदारही बोलत नाहीत. भाजपाच्या सर्वांनीच पुणेकरांना वारेमाप आश्वासने दिली; पण त्यांची पूर्ती करायचे असते, हे ते विसरूनच गेले.’’ शहराध्यक्ष रमेश बागवे व अन्य वक्त्यांनीही या वेळी केंद्र व राज्य सरकारांवर हल्ला करून भारतीय जनता पार्टीवर टीका केली.मोदी यांनी गेल्या साडेचार वर्षांच्या काळात ढीगभर योजना जाहीर केल्या. त्यातील अनेक प्रत्यक्षात आल्याच नाहीत. ज्या आल्या त्या लोकांना दिसल्याच नाहीत, कारण त्यात काहीच काम झाले नाही. स्मार्ट सिटी योजनाही अशीच आहे. त्यातील कोणते काम दिसते, हे कोणालाच सांगता येत नाही. आकडे कोट्यवधीचे सांगितले जातात; पण ते कामातून दिसायला तयार नाहीत.-अशोक चव्हाण 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस