शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

मोदींच्या योजना भुलवण्यासाठीच - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 01:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त लोकांना भुलवण्यासाठी म्हणूनच योजना जाहीर करतात. बोललेले काहीही त्यांना करून दाखवता आलेले नाही. त्यामुळे आता या वेळी कितीही आश्वासने दिली तरी त्यावर मतदार विश्वास ठेवणार नाहीत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त लोकांना भुलवण्यासाठी म्हणूनच योजना जाहीर करतात. बोललेले काहीही त्यांना करून दाखवता आलेले नाही. त्यामुळे आता या वेळी कितीही आश्वासने दिली तरी त्यावर मतदार विश्वास ठेवणार नाहीत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. पुणेकरांचीही भारतीय जनता पार्टीने फसवणूकच केली आहे. असे ते म्हणाले.निवडणूक जाहीर होण्याआधीच काँग्रेसच्या वतीने राज्यात ५० सभा घेण्यात येणार असून त्यातील पहिली सभा शुक्रवारी सायंकाळी पुण्यात झाली. भवानी पेठेत झालेल्या या सभेला माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब शिवरकर, अरविंद शिंदे तसेच पक्षाचे अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते.उन्हाळ्याच्या आधीच पुण्यात पाणीटंचाई सुरू झाली, अशी टीका करून चव्हाण म्हणाले, ‘‘पालकमंत्र्यांनी नियोजन केले नाही; त्यामुळे पाणी कमी झाले व त्यांच्याच म्हणजे भाजपाच्या खासदारावर उपोषणाला बसण्याची वेळ आली होती. हेल्मेट सक्तीमुळे पुणेकर हैराण झाले आहेत; मात्र त्यावर पालकमंत्री आणि आमदार, खासदारही बोलत नाहीत. भाजपाच्या सर्वांनीच पुणेकरांना वारेमाप आश्वासने दिली; पण त्यांची पूर्ती करायचे असते, हे ते विसरूनच गेले.’’ शहराध्यक्ष रमेश बागवे व अन्य वक्त्यांनीही या वेळी केंद्र व राज्य सरकारांवर हल्ला करून भारतीय जनता पार्टीवर टीका केली.मोदी यांनी गेल्या साडेचार वर्षांच्या काळात ढीगभर योजना जाहीर केल्या. त्यातील अनेक प्रत्यक्षात आल्याच नाहीत. ज्या आल्या त्या लोकांना दिसल्याच नाहीत, कारण त्यात काहीच काम झाले नाही. स्मार्ट सिटी योजनाही अशीच आहे. त्यातील कोणते काम दिसते, हे कोणालाच सांगता येत नाही. आकडे कोट्यवधीचे सांगितले जातात; पण ते कामातून दिसायला तयार नाहीत.-अशोक चव्हाण 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस