शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

Ashadhi Wari: "ऐक एक सखये बाई..." कृष्णाच्या गवळणींना दिवे घाटात धरला फेर

By नितीन चौधरी | Updated: June 14, 2023 21:01 IST

वारकऱ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मेघांनीही कृपा करत वाऱ्याच्या थंडगार लहरींसोबत वातावरण आणखीनच आल्हाददायक केले...

पुणे : असा कसा देवाचा देव बाई लंगडा, श्रीरंग माझा वेडा त्याला नाही दुसरा जोडा, ऐक एक सखये बाई, नवल मी सांगू काई त्रेलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई, अशा गवळणींमधून कृष्णाला आर्जव करत माऊलींच्या दिंड्यांनी चढणीला अवघड असा दिवे घाट लीलया सर केला. वारकऱ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मेघांनीही कृपा करत वाऱ्याच्या थंडगार लहरींसोबत वातावरण आणखीनच आल्हाददायक केले. 

पुण्यातून सहा वाजता सोहळा हडपसर कडे मार्गस्थ झाल्यानंतर सुमारे ९ च्या सुमारास पहिला विसावा हडपसरमध्ये झाला. तासाभराच्या विश्रांतीनंतर सोहळा सासवड रस्त्याने निघाला. ऊन वाढलेले असल्याने पालखी सोहळ्यात नेहमी सहभागी होणारे पुणेकर यंदा तुलनेने खूपच कमी होते. काही काळ ऊन आणि थोडा वेळ ढगाळ वातावरण असा ऊन सावलीचा खेळ सुरू होता. त्यामुळे वारकऱ्यांना उन्हाचा फारसा त्रास जाणवला नाही. फुरसुंगी पर केल्यानंतर पावसाची एक सर सुखद गारवा देऊन गेली. दिवे घाटाच्या पायथ्यापूर्वी उरुळी देवाची येथे सोहळा काही काळ विसावला. त्यांनतर ऊन पुन्हा वाढू लागले. घाटाला सुरूवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा विसावा घेत वारकऱ्यांनी घाट सर करण्यासाठी अंगात ऊर्जा भरून घेतली.

घाट चढण सुरु करण्यापूर्वी माऊलींच्या पालखी ला आणखी एक बैलजोडी जुमण्यात आली. रथा पुढील दिंड्या सोहळ्याचा वेग ठरवत असतात. घाटाची चढण अवघड असल्याने याच दींड्या वारकऱ्यांना कष्ट होऊ नयेत याची खबरदारी घेतात. त्यासाठीच या दींड्या कृष्णाच्या गवळीनिंचा आधार घेतात. त्यातून वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला. वारकरी गवळणी गाताना फेर धरून नाचू लागले त्यामुळे ऊन चटके मारत होते तरी अधूनमधून येणाऱ्या वाऱ्याच्या थंडगार लहरिंनी वातावरणात एक आगळावेगळा उत्साह संचारला. माऊली माऊली असा नाद हजार करत सुमारे दोन तासांनी सोहळा दिवे घाट सहज पार केला. घाट चढण पार केल्यानंतर वारकऱ्यांनी पुन्हा हरिनामाचा गजर करत विसावा घेतला.

आळंदीहून पुण्यात येताना उशीर झाला असताना सासवडच्या वाटेवर माऊली काहीशी अर्थात तासभर लवकर पोचली होती. झेंडे वाडी येथील विसावा तासभर होता. त्यानंतर सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या सासवड येथे सव्वा नऊला पोचली.

पालखीची अडवली वाटतुकाई दर्शन पासून फुरसुंगी परिसरातील नागरिकांनी पालखी निम्म्याहून अधिक वाट अडवली होती. हे नागरिक रस्त्यातच उभे राहिल्याने दिंद्यांना चालणे अवघड झाले होते. अनेक नागरिक दिंडी व्यवस्थापकांनी सांगूनही बाजूला होत नव्हते. याबाबत वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. हीच स्थिती थेट घाटाच्या पायथ्यापर्यंत होती.

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी