शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Vaari : आळंदीत वारकऱ्यांची लगबग वाढली; अलंकापुरी माऊलींच्या पालखी प्रस्थानासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 10:30 IST

वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी नगरपरिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे...

- भानुदास पऱ्हाड

आळंदी (पुणे) : संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखीचे रविवारी (दि.११) सायंकाळी चारला तीर्थक्षेत्र आळंदीतून प्रस्थान होणार आहे. माऊलींच्या वैभवशाली सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तसेच हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी राज्यभरातून वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदीत दाखल होऊ लागल्या आहेत. तत्पूर्वी वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी नगरपरिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे.

आळंदीत पालखी प्रस्थान सोहळयाच्या एक - दोन दिवस अगोदर असंख्य वारकरी येत असतात. त्यामुळे वारकऱ्यांच्या दर्शनासाठी नदीपलीकडील जागेत तात्पुरती दर्शनबारी उभारण्यात आली आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून त्यावर पत्रे टाकले आहेत. या दर्शनबारीतून वारकऱ्यांना इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलमार्गे मंदिराकडे दर्शनासाठी जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरातही दर्शनबारी उभारली आहे. त्याद्वारे भाविकांना माऊलींच्या समाधीचे सुलभ दर्शन घेता येईल अशी व्यवस्था केली आहे.

दरम्यान आळंदीत दाखल झालेले भाविक ग्रंथ वाचण्यात दंग दिसून येत आहेत. सिध्दबेटमध्ये अजान वृक्षाखाली शीतल छायेत काही भाविक पारायण करत आहेत. आळंदीमधील तुळशी, हार, फुलांची, वारकरी साहित्य मृदुंग, वीणा, टाळ, पेटी, ग्रंथ साहित्य इ. विविध दुकाने सजली आहेत.

पाणीपुरवठा : वारकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेने शहरात विकेंद्रित पद्धतीने ५ टँकर फिलिंग ठिकाणांची व्यवस्था केली आहे. या सर्व ठिकाणी विद्युत पुरवठा व कर्मचारी २४ तास असावेत असे आदेश मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी निर्गमित केले आहेत. वारी काळात एकूण २२ टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जलशुद्धीकण केंद्राची स्वच्छता, मोटारींची दुरुस्ती करण्यात आली आहे. शहरात लावलेल्या शौचालयांना मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी अनेक ठिकाणी स्वतंत्र पाईप लाईन टाकून काम करून घेण्यात आले आहे.

विद्युत विभाग : शहरातील मंदिर व इंद्रायणी घाट परिसरातील तसेच इतर महत्त्वाच्या सर्व ठिकाणचे एकूण १७ हायमास्ट दिवे चालु केले आहे. शहरातील मोबाईल टॉयलेट यांना विद्युत व्यवस्था करून देण्यात आली आहे. रस्त्यावरील दिवाबत्तीची दुरुस्ती करून रात्रीच्या वेळी प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे. पाणी पुरवठा केंद्राच्या ठिकाणी २५० के.व्ही.ए क्षमतेचे जनरेटरची व्यवस्था पालिके मार्फत करण्यात आली आहे.

आरोग्य विभाग : आषाढी वारी कालावधीत गर्दीच्या अनुषंगाने शहरात निर्माण  होणाऱ्या घनकचरा, रस्ते साफसफाई, औषध फवारणी, धुर फवारणी कामे तीन शिफ्टमध्ये करणेत येणार आहेत. नगरपरिषदेच्या १२ घंटागाड्या, ३ कॉम्पाक्टर, ५ टॅक्टर, सक्शन मशीन इत्यादी वाहनांसह साधारण १०० सफाई कर्मचारी २४ तास तैनात असणार आहेत. वारी संपल्यानंतरच्या स्वच्छतेबाबतचे नियोजन देखील केले आहेत. शहरातील नगरपरिषद मालकीचे सर्व सार्वजनिक शौचालय एकूण ३५६ सिट्स, सुलभ शौचालयाच्या एकूण ४९० सिट्ससह, १५०० मोबाईल टॉयलेट्स भाविकांना वापरण्यास उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच ते वापरण्या योग्य राहतील यासाठी पालिकेने तयारी केली आहे. शहरात संसर्गजन्य रोग पसरू नये या करीता शहरात नियमितपणे जंतू नाशक फवारनी व धुर फवारणी केली जात आहे.

बांधकाम विभाग :  आळंदी शहरात आवश्यक त्या सर्व ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे.

अतिक्रमण कारवाई : वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर व सर्व महत्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमण पालिकेमार्फत काढून घेतली आहेत.

पोलीस मदत, टेहळणी केंद्र स्थापन....वारीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून आळंदीतील प्रमुख चौक तसेच आवश्‍यक त्या ठिकाणी पोलीस मदत केंद्र, टेहळणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. यावर्षी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पिंपरी - चिंचवड आयुक्तालयाकडून ३ पोलीस उपायुक्त, ८ सहायक पोलीस आयुक्त, ३९ पोलिस निरीक्षक, १६० उपनिरीक्षक, १८२२ अंमलदार, ३३९ वाहतूक अंमलदार, १ हजार होमगार्ड नेमण्यात आले आहेत. तसेच एसआरपीएफच्या ३ कंपन्या, एनडीआरएफच्या ४ तुकड्या, बीडीडीएसचे ४ पथक, चोरी नियंत्रण १२ पथके, छेडछाडची २ पथके व दामिनी ४ पथके मदतीला पाचारण करण्यात आली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने शहरात ३४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर पालिकेचेही १३० सीसीटीव्ही कॅमेरे आणि ३ मोठ्या स्क्रीन बसविण्यात आले असून पोलिस यंत्रणेस चोरीच्या घटना रोखण्यात व इतर तपासात याची मोठी मदत होणार आहे.

आळंदी आरोग्य केंद्र उपाययोजना : आळंदीत भाविकांच्या सेवेसाठी जादा ९ वैद्यकीय अधिकारी, १६ स्टाफ नर्स, ९ लॅब टेक्निशियन, ५ एक्सरे टेक्निशियन, ५ परिचर, सफाई कामगार, २५ प्रशिक्षणार्थी डॉक्टर, ५ फार्मसिस्टची नेमणूक करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी सांगितले.

* आषाढी यात्रा निमित्ताने सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण भूलतज्ज्ञ डॉ. पाटीलयांच्याकडून देण्यात आले आहे. उष्माघात टाळण्यासाठी शहरात आरोग्यसेवकांकडून जनजागृती करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे शीतकक्ष स्थापन करण्यात आले आहे. अत्यावश्यक संदर्भ सेवेसाठी १०२/ १०८ अंबुलन्सेस तयार ठेवण्यात आल्या आहेत.

* वारीकाळात भाविक व वारकऱ्यांना स्वच्छ व शुध्द खाद्य पदार्थ मिळावे यासाठी हॉटेल चालकांना वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच हॉटेल कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून घेण्यात आली आहे.

जादा बसेस...संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आळंदी येथे जादा बस  पीएमपीएमएलकडून ठेवण्यात आल्या आहेत. आळंदी करिता स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड या ठिकाणावरून प्रतिदिनी एकूण १४२ बसेस संचलनात राहणार आहेत. आळंदीसाठी रविवारी (दि.११) रात्री बारा वाजेपर्यंतपर्यंत ही व्यवस्था करण्यात आली आहे. तर १२ जूनला पहाटे अडीचपासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, मनपा या ठिकाणावरून आळंदीला जाण्यासाठी जादा १८ बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAlandiआळंदीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022