शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Vaari : आळंदीत वारकऱ्यांची लगबग वाढली; अलंकापुरी माऊलींच्या पालखी प्रस्थानासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 10:30 IST

वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी नगरपरिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे...

- भानुदास पऱ्हाड

आळंदी (पुणे) : संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखीचे रविवारी (दि.११) सायंकाळी चारला तीर्थक्षेत्र आळंदीतून प्रस्थान होणार आहे. माऊलींच्या वैभवशाली सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तसेच हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी राज्यभरातून वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदीत दाखल होऊ लागल्या आहेत. तत्पूर्वी वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी नगरपरिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे.

आळंदीत पालखी प्रस्थान सोहळयाच्या एक - दोन दिवस अगोदर असंख्य वारकरी येत असतात. त्यामुळे वारकऱ्यांच्या दर्शनासाठी नदीपलीकडील जागेत तात्पुरती दर्शनबारी उभारण्यात आली आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून त्यावर पत्रे टाकले आहेत. या दर्शनबारीतून वारकऱ्यांना इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलमार्गे मंदिराकडे दर्शनासाठी जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरातही दर्शनबारी उभारली आहे. त्याद्वारे भाविकांना माऊलींच्या समाधीचे सुलभ दर्शन घेता येईल अशी व्यवस्था केली आहे.

दरम्यान आळंदीत दाखल झालेले भाविक ग्रंथ वाचण्यात दंग दिसून येत आहेत. सिध्दबेटमध्ये अजान वृक्षाखाली शीतल छायेत काही भाविक पारायण करत आहेत. आळंदीमधील तुळशी, हार, फुलांची, वारकरी साहित्य मृदुंग, वीणा, टाळ, पेटी, ग्रंथ साहित्य इ. विविध दुकाने सजली आहेत.

पाणीपुरवठा : वारकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेने शहरात विकेंद्रित पद्धतीने ५ टँकर फिलिंग ठिकाणांची व्यवस्था केली आहे. या सर्व ठिकाणी विद्युत पुरवठा व कर्मचारी २४ तास असावेत असे आदेश मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी निर्गमित केले आहेत. वारी काळात एकूण २२ टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जलशुद्धीकण केंद्राची स्वच्छता, मोटारींची दुरुस्ती करण्यात आली आहे. शहरात लावलेल्या शौचालयांना मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी अनेक ठिकाणी स्वतंत्र पाईप लाईन टाकून काम करून घेण्यात आले आहे.

विद्युत विभाग : शहरातील मंदिर व इंद्रायणी घाट परिसरातील तसेच इतर महत्त्वाच्या सर्व ठिकाणचे एकूण १७ हायमास्ट दिवे चालु केले आहे. शहरातील मोबाईल टॉयलेट यांना विद्युत व्यवस्था करून देण्यात आली आहे. रस्त्यावरील दिवाबत्तीची दुरुस्ती करून रात्रीच्या वेळी प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे. पाणी पुरवठा केंद्राच्या ठिकाणी २५० के.व्ही.ए क्षमतेचे जनरेटरची व्यवस्था पालिके मार्फत करण्यात आली आहे.

आरोग्य विभाग : आषाढी वारी कालावधीत गर्दीच्या अनुषंगाने शहरात निर्माण  होणाऱ्या घनकचरा, रस्ते साफसफाई, औषध फवारणी, धुर फवारणी कामे तीन शिफ्टमध्ये करणेत येणार आहेत. नगरपरिषदेच्या १२ घंटागाड्या, ३ कॉम्पाक्टर, ५ टॅक्टर, सक्शन मशीन इत्यादी वाहनांसह साधारण १०० सफाई कर्मचारी २४ तास तैनात असणार आहेत. वारी संपल्यानंतरच्या स्वच्छतेबाबतचे नियोजन देखील केले आहेत. शहरातील नगरपरिषद मालकीचे सर्व सार्वजनिक शौचालय एकूण ३५६ सिट्स, सुलभ शौचालयाच्या एकूण ४९० सिट्ससह, १५०० मोबाईल टॉयलेट्स भाविकांना वापरण्यास उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच ते वापरण्या योग्य राहतील यासाठी पालिकेने तयारी केली आहे. शहरात संसर्गजन्य रोग पसरू नये या करीता शहरात नियमितपणे जंतू नाशक फवारनी व धुर फवारणी केली जात आहे.

बांधकाम विभाग :  आळंदी शहरात आवश्यक त्या सर्व ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे.

अतिक्रमण कारवाई : वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर व सर्व महत्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमण पालिकेमार्फत काढून घेतली आहेत.

पोलीस मदत, टेहळणी केंद्र स्थापन....वारीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून आळंदीतील प्रमुख चौक तसेच आवश्‍यक त्या ठिकाणी पोलीस मदत केंद्र, टेहळणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. यावर्षी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पिंपरी - चिंचवड आयुक्तालयाकडून ३ पोलीस उपायुक्त, ८ सहायक पोलीस आयुक्त, ३९ पोलिस निरीक्षक, १६० उपनिरीक्षक, १८२२ अंमलदार, ३३९ वाहतूक अंमलदार, १ हजार होमगार्ड नेमण्यात आले आहेत. तसेच एसआरपीएफच्या ३ कंपन्या, एनडीआरएफच्या ४ तुकड्या, बीडीडीएसचे ४ पथक, चोरी नियंत्रण १२ पथके, छेडछाडची २ पथके व दामिनी ४ पथके मदतीला पाचारण करण्यात आली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने शहरात ३४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर पालिकेचेही १३० सीसीटीव्ही कॅमेरे आणि ३ मोठ्या स्क्रीन बसविण्यात आले असून पोलिस यंत्रणेस चोरीच्या घटना रोखण्यात व इतर तपासात याची मोठी मदत होणार आहे.

आळंदी आरोग्य केंद्र उपाययोजना : आळंदीत भाविकांच्या सेवेसाठी जादा ९ वैद्यकीय अधिकारी, १६ स्टाफ नर्स, ९ लॅब टेक्निशियन, ५ एक्सरे टेक्निशियन, ५ परिचर, सफाई कामगार, २५ प्रशिक्षणार्थी डॉक्टर, ५ फार्मसिस्टची नेमणूक करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी सांगितले.

* आषाढी यात्रा निमित्ताने सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण भूलतज्ज्ञ डॉ. पाटीलयांच्याकडून देण्यात आले आहे. उष्माघात टाळण्यासाठी शहरात आरोग्यसेवकांकडून जनजागृती करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे शीतकक्ष स्थापन करण्यात आले आहे. अत्यावश्यक संदर्भ सेवेसाठी १०२/ १०८ अंबुलन्सेस तयार ठेवण्यात आल्या आहेत.

* वारीकाळात भाविक व वारकऱ्यांना स्वच्छ व शुध्द खाद्य पदार्थ मिळावे यासाठी हॉटेल चालकांना वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच हॉटेल कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून घेण्यात आली आहे.

जादा बसेस...संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आळंदी येथे जादा बस  पीएमपीएमएलकडून ठेवण्यात आल्या आहेत. आळंदी करिता स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड या ठिकाणावरून प्रतिदिनी एकूण १४२ बसेस संचलनात राहणार आहेत. आळंदीसाठी रविवारी (दि.११) रात्री बारा वाजेपर्यंतपर्यंत ही व्यवस्था करण्यात आली आहे. तर १२ जूनला पहाटे अडीचपासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, मनपा या ठिकाणावरून आळंदीला जाण्यासाठी जादा १८ बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAlandiआळंदीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022