शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

निवडणुका जवळ आल्या की सरकार मते मिळवण्यासाठी करते वैद्यकीय घाेषणा; डॉ. शरद कुमार अग्रवाल यांची टीका

By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: April 2, 2023 19:23 IST

सरकार गाेरगरिबांचे मते मिळण्यासाठी जे शक्यच नाही त्या घाेषणा करतात पण प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र शक्य नसते

पुणे : निवडणुक जवळ आली की सरकार सर्वसामान्यांची मते मिळवण्यासाठी ‘आयएमए’ किंवा डाॅक्टरांच्या संघटनांना विश्वासात न घेता माेफत किंवा सवलतींमध्ये उपचार देण्याची अव्यवहार्य याेजनांच्या घाेषणा करतात. मात्र प्रत्यक्षात त्यानुसार कृती होत नाही. राजस्थानमधे नुकताच आणलेला आराेग्य हक्क कायदा हा त्यातीलच एक प्रकार आहे. म्हणून वैद्यकीय सुविधांच्या लोकप्रिय घोषणा करून मते मिळवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याची टीका, इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद कुमार अग्रवाल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

आयएमए पुणेच्या अध्यक्षपदी नवनियुक्त अध्यक्ष डॉ. राजू वरयानी यांची नियुक्ती समारंभ आयएमए हाॅल येथे पार पडला त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी, महाराष्ट्र आयएमए चे अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे, पुणे आयएमएच्या मावळत्या अध्यक्ष डॉ. मिनाक्षी देशपांडे, ‘आयएमए’चे कार्यकारी विश्वस्त डॉ. संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

डाॅ. अग्रवाल म्हणाले की, केंद्र शासन असाे की राज्य शासन हे निवडणुका जवळ आल्या की गाेरगरिबांचे मते मिळण्यासाठी जे शक्यच नाही त्या लाेकप्रिय घाेषणा करतात. ज्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र शक्य नसते. त्याचा त्रास आम्हाला हाेताे. काेरोना काळात सरकारला डॉक्टरांची गरज होती. त्यामुळे त्यांच्याकडून काम काढून घेतले परंतू, या काेराेना काळात आमचे देशभरात दाेन हजार डाॅक्टरांचा मृत्यू झाला मात्र, त्यांना आधी घाेषणा केलेले अनुदानही शासनाने दिलेले नाही,असेही ते म्हणाले.

देशात रुग्णसेवेचा ७० टक्के भार हा खासगी डॉक्टरांवर आहे, मात्र सरकारला जेव्हा गरज असते तेव्हा संवाद साधला जातो. वैद्यकीय धोरणांबाबत सरकारी समित्यांमध्ये खासगी डॉक्टारांच्या प्रतिनिधींचा समावेश असणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री जनआराेग्य याेजनेतून पैसे मिळण्यासाठी वर्षभराची वाट पहावी लागते असेही डाॅ. अग्रवाल म्हणाले.

वाढत्या काेराेनाची काळजी नकाे

सध्या देशभरात प्रमाणात काेरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही. मात्र नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. मात्र, नागरिकांनी करोना विषय नियमांचे पालन केले पाहिजे. तसेच काेरोनानंतर हृदय, सांधेदुखी व इतर आजार वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच, करोना काळात लहान मुलांच्या दैनंदिन लसीकरणात खंड पडल्याने मुलांना आजार होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे, असेही निरीक्षण त्यांनी नाेंदवले.

टॅग्स :PuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकारMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टरBJPभाजपा