शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आर्य मूळ भारतीयच! डेक्कन कॉलेजचे संशोधन : डीएनद्वारे सिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 06:26 IST

आर्य मूळचे भारतीय होते की बाहेरून आले, यावर वाद-विवाद झडत असतात.

पुणे : आर्य बाहेरून आले व त्यांनी ‘हडप्पा संस्कृती’चा विकास केला हा ब्रिटिश व काही भारतीय इतिहासकारांनी रुढ केलेला समज डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाने संशोधनाद्वारे खोटा ठरविला आहे. आर्य हे मूळचे भारतीयच होते आणि त्यांनीच ‘हडप्पा संस्कृती’ निर्माण केली असल्याचे ठोस पुरावे डीएनए आणि पुरातत्वशास्त्राचा आधारे मिळाले असल्याचा दावा डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी केला.

आर्य मूळचे भारतीय होते की बाहेरून आले, यावर वाद-विवाद झडत असतात. हडप्पा संस्कृतीच्या काळात दक्षिण आशियात बाहेरून स्थलांतरे झाली, हा दावा प्राचीन डीएनएच्या नव्या संशोधनाने खोडून काढला आहे. हडप्पातील लोकसंख्येचे मूळ प्राचीन इराणी शेतकऱ्यांमध्ये सापडत असल्याचा दावाही नव्या डीएनए संशोधनाने खोटा ठरवला आहे. सन २०११-१२ पासून डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राखीगडी येथे अांतरराष्ट्रीय प्रकल्पाची सुरुवात झाली. हरयाणा सरकारच्या पुरातत्व व संग्रहालय विभागाने उत्खनन केले. हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर आणि मोलेक्युलर बायलॉजी ( सीसीएमबी)चे डॉ. नीरज पै व अमेरिकेतील हार्वर्ड स्कूल आॅफ मेडिसीन विभागातील प्रा. डेव्हिड रिच यांनी प्राचीन डीएनचा अभ्यास केला. यातून नव्याने समोर आलेले निष्कर्ष ‘आर्य बाहेरुन आले,’ या मांडणीला छेद देणारे आहेत.

‘लोकमत’ला डॉ. शिंदे यांनी सांगितले की, डीएनए व पुरातत्वीय पुराव्यांचे आधारे स्पष्ट होते, की येथील विकास स्वदेशी लोकांनीच केला. आर्य हे मुळात भटके होते. दहा ते बारा हजार वर्षांपूर्वीच्या भटक्या जमाती राखीगडी भागात स्थिरस्थावर झाल्या. त्यांच्यात कालपरत्वे विकास होत गेला. याच लोकांची पुढे हडप्पा संस्कृती झाली आणि त्यांनीच नागरीकरण केले, याचे पुरातत्वीय पुरावे सापडले आहेत. सध्याच्या बंगाल ते अफगाणिस्तान आणि काश्मीर ते अंदमानपर्यंतची लोकसंख्या ही जात, धर्माच्या आधारावर हडप्पा संस्कृतीवर आधारित आहे. आर्य लोक बाहेरून आले आणि त्यांनी हडप्पन लोकांवर अतिक्रमण केले असे मानायचे म्हटले तर आर्यांनी आणलेली बाहेरची संस्कृतीही त्यांच्यासोबत आली असती. त्याचे धागेदोरे मिळत नाहीत. आमच्या संशोधनामुळे पूर्वीची थीअरी बदलली जाणार असून, इतिहासाला नवी दिशा मिळाली आहे.

प्राध्यापक डेव्हीड रिच यांच्यासमवेत जर्मनीचे काही शास्त्रज्ञ होते. त्यांचे आणि आमचे अनुमान यात साम्य आहे. हा शोधनिबंध परदेशी जर्नलमध्ये प्रसिद्ध केला. तिथे आमचे संशोधन त्यांनी स्वीकारले आहे. आर्य ही भाषिक संकल्पना आहे, असेही ते म्हणाले.नवा प्रकाश हडप्पा संस्कृतीमधील लोक हेच दक्षिण अशियातल्या लोकसंख्येचे पूर्वज असल्याचे तथ्य प्राचीन डीएनएच्या अभ्यासातून पहिल्यांदाच उजेडात आले आहे. या संशोधनाने पहिल्यांदाच असे सिद्ध केले आहे, की प्राचीन काळातले स्थलांतर हे पश्चिमेकडून पूर्वेकडे झाले नसून पूर्वेकडून पश्चिमेला झाले आहे. हडप्पा संस्कृतीतल्या लोकांचे मेसोपोटेमिया, इजिप्त, पर्शियाचे आखात तसेच जवळपास संपूर्ण दक्षिण आशियाशी व्यापारी संबंध होते. भारत व दक्षिण आशियातील कृषी संस्कृती मध्य अशिया किंवा पश्चिमेकडून आली नाही, तर ती इथेच तयार झाली. यासारख्या बाबी यापूर्वीच्या समजांना पूर्णत: छेद देणाऱ्या आहेत.अतिक्रमणाची थापचआर्यांनी भारतात स्थलांतर केले किंवा आर्य टोळ््यांनी भारतावर आक्रमण केले, ही समजूत नाकारणारे पुरावे आढळले आहेत.मोहेंजोदारोच्या गडातील वरच्या भागात आढळलेल्या सापळ््यावरून ती व्यक्ती आर्यांच्या आक्रमणात मारली गेल्याचे गृहितक सर मॉर्टीमायर व्हिलर यांनी मांडले होते. प्रत्यक्षात ही व्यक्ती पुरात बुडून मृत्युमुखी पडल्याचे सिद्ध झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेDeccan Collegeडेक्कन कॉलेजAry Babbarआर्या बब्बर